एक्स्प्लोर

जीएसटी भवनच्या आगीचे मनपात पडसाद, पायाभूत सुविधा कमी पडत असल्याची प्रशासनाची कबुली

मुंबईतील माझगाव परिसरात असलेल्या जीएसटी भवनच्या आठव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 20 ते 22 गाड्या घटनास्थळी जाऊन ही आग आटोक्यात आणली. या आगीच अनेक महत्वाच्या फाईल्स जळल्या असल्याची शक्यता आहे.

मुंबई : भायखळा येथे जीएसटी भवनला आग लागून महत्वाच्या फायली जळाल्या असल्याचा संशय आहे. या आगीचे पडसाद स्थायी समितीतही उमटले. नगरसेवकांनी मुंबईत अशा आगी लागत आहेत आणि अग्निशमन दल केवळ विकासकांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात गुंतले असल्याचा आरोप करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. परंतु अग्निशमन दल चांगले काम करत असले तरी पायाभूत सुविधांचा अभाव असल्याची कबुली पालिका अतिरिक्त आयुकत पी.वेलारासु यांनी दिली. परंतु त्यांच्या या कबुलीने सर्वच नगरसेवक संतप्त झाले आणि त्यांनी प्रशासनाचा हा निष्क्रियपणा आहे.तो असाच सुरू राहिला तर मुंबईकरांच्या जीवितांचे रक्षण कोण करणार? असा सवाल केला. मुंबईत गेल्या 8 दिवसांत 10 ठिकाणी आगी लागल्या. भायखळा येथील जीएसटी भवनला लागलेली आग मोठी होती. अशा आगी लागत राहिल्यातर मुंबई सुरक्षित राहिल का? असा सवाल पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आणि याला अग्निशमन दलाचे अधिकारी आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला. जीएसटी भवनच्या नवव्या आणि दहाव्या मजल्यावर आग लागली तिथे महत्वाची कागदपत्रे होती. तर, 10 वा मजला अतिरिक्त बांधकाम केला होता याचा प्रथम प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
तर जीएसटी भवनने अग्नी सुरक्षेचे नियम पाळले होते का?आणि ही आग कशी लागली याचा अहवाल स्थायी समिती पुढे आला पाहिजे अशी मागणी केली. नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी 364 अहवाल काय म्हणतो? याचे वाचनच करून दाखविले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आगीचे कारण आयुक्तांना सांगणे बंधनकारक असते. पण तसे काही घडलेच नाही.
जीएसटी भवनच्या आगीचे मनपात पडसाद, पायाभूत सुविधा कमी पडत असल्याची प्रशासनाची कबुली
नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी देखील अशा आगीच्या घटना आपण रोखू शकत नसू तर आपण करदात्या मुंबईकरांचे रक्षण कसे करणार असा प्रश्न उपस्थित केला. नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी आगीच्या घटनेबदल नाराजी व्यक्त केली. आपण कोट्यवधी रूपयांची सामुग्री खरीदी करतो आणि त्यानंतरही आगीच्या घटना घडत असतील तर त्याला जबाबदार कोण? असे ते म्हणाले. सपाचे गटनेते आणि आमदार रईस शेख यांनी अग्निशमन दलाचे अधिकारी केवळ विकासकांना एनओसी देतात असा आरोप केला.
जीएसटी भवनच्या आगीचे मनपात पडसाद, पायाभूत सुविधा कमी पडत असल्याची प्रशासनाची कबुली
अग्निशमन दलाचे काम चांगले: अतिरिक्त आयुक्त अग्निशमन दलाचे कार्य चांगले आहे. मात्र मुंबईतील साडेचार लाख प्रॉपर्टीजपर्यंत प्रॅक्टिकली ते पोहोचू शकत नाहीत. कारण त्यांना पायाभूत सुविधा कमी पडत असल्याचा खुलासा अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासु यांनी केला. अग्निशमन दल बिल्डरांना एनओसी देते असा आरोप होता. तो खोडताना त्यांनी आपण नियमांच्या अधिन राहूनच ते काम करत असतो असे ते म्हणाले. मुंबईला 70 अग्निशमन केंद्राची गरज: प्रभात रहांगदळे मुंबईत आता 34 अग्निशमन केंद्रे आहेत. शहरात 60 ते 70 अग्निशमन दल केंद्राची आवश्यकता असून मिनीफायर स्टेशन वाढविल्यास आगी रोखण्यात दलाला यश येईल, असे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी स्थायी समितीत सांगितले. अग्निशमन दलाकडे 700 मनुष्यबळ आहे. आणखी मनुष्य बळाची गरज असून स्वयंसेवकांनी मदत करून आगी संदर्भात मदत केल्यास आगीचे प्रमाण रोखण्यात पालिकेला यश येईल असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत,तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत, तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
सोलापूर-मुंबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार, आठवड्यातील चार दिवस विमानसेवा उपलब्ध 
सोलापूर-मुंबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार, आठवड्यातील चार दिवस विमानसेवा उपलब्ध 
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
बेकायदेशीर स्कूल व्हॅन प्रकरण! एसबीओएकडून परिवहन विभागाविरोधात याचिका दाखल, नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा 
बेकायदेशीर स्कूल व्हॅन प्रकरण! एसबीओएकडून परिवहन विभागाविरोधात याचिका दाखल, नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा 

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget