Nitin Gadkari : नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक...; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
Nagpur : इतर कुठल्याही समाजापेक्षा मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाची सर्वाधिक गरज आहे. असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपूरमध्ये आयोजित दीक्षांत समारोह कार्यक्रमात ते बोलत होते.

Nagpur News : इतर कुठल्याही समाजापेक्षा मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाची सर्वाधिक गरज आहे. असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलं आहे. नागपूरमध्ये आयोजित दीक्षांत समारोह कार्यक्रमात ते बोलत होते. दिवसातून अनेक वेळा नमाज पठण करा. मात्र नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचे आहे. इंजिनीयर, डॉक्टर, आयएएस तयार झाले तरच समाजाचा विकास होईल. जात, पंत, भाषा लिंग आणि धर्मामुळे माणूस ओळखला जात नाही तर माणसाकडे असलेल्या गुणांमुळे माणूस मोठा होतो, असेही नितीन गडकरी ( Minister Nitin Gadkari) म्हणाले.
'जो करेगा जाति की बात, उसको मारूंगा लात' : नितीन गडकरी
सार्वजनिक चर्चेत आपण कधी जात आणि धर्म आणत नाही, कारण माझा विश्वास आहे की लोक समाजसेवा सर्वांपेक्षा श्रेष्ठ मानतात. आम्ही या गोष्टींमध्ये (धर्म/राजकारण) कधीही भेदभाव करत नाही. मी राजकारणात आहे आणि इथे खूप काही बोलले जातं, पण मी ठरवले की मी माझ्या पद्धतीने काम करेल. शिवाय मला कोणी मतं देईल की नाही याचा विचार मी करत नाही. असे ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले. ते जातीबाबत गडकरींनी आपल्या एका जुन्या घोषणांचाही उल्लेख केला. त्यात ते म्हणाले की, मी सुरुवातीपासून म्हणत आलो आहे 'जो करेगा जाति की बात, उसको मारूंगा लात'. निवडणुकीत हरलो किंवा मंत्रीपद गमवावे लागल्यानंतरही मी ही भूमिका कायम ठेवल्याचे ते म्हणाले.
मंत्रिपद न मिळाल्यास मी काय मरणार नाही : नितीन गडकरी
पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, 'तुम्ही असे बोलायला नको होतं, असे माझे मित्र म्हणाले, पण मी आयुष्यात याच तत्त्वानुसार जगायचे ठरवले आहे. मी निवडणूक हरलो किंवा मंत्रिपद मिळाले नाही तर मी काय मरणार नाही. मात्र मी माझ्या भूमिकेवर आधीपासून ठाम आहे आणि राहील असेही ते म्हणाले.
मुस्लीम समाजाला शिक्षणाची सर्वाधिक गरज- नितीन गडकरी
यावेळी गडकरींनी आठवण करून दिली की, मी आमदार असताना अंजुमन-ए-इस्लाम इन्स्टिट्यूट (नागपूर) इंजिनिअरिंग कॉलेजला परवानगी दिली होती. मुस्लीम समाजाला याची गरज आहे, असे मला वाटत असल्याचे ते म्हणाले.'मुस्लीम समाजातून अधिकाधिक अभियंते, आयपीएस, आयएएस अधिकारी निर्माण झाले तर सर्वांचा विकास होईल. माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण आपल्यासमोर आहे. अंजुमन-ए-इस्लामच्या बॅनरखाली आज हजारो विद्यार्थी इंजिनिअर झाले आहेत. असेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

