एक्स्प्लोर

Ambadas Danve: केंद्रात, राज्यात सरकार तुमचंच, मग समाजात अशांतता कशासाठी? औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून अंबादास दानवे कडाडले, म्हणाले..

Ambadas Danve: कोरटकर, सोलापूरकर याच्या विरोधात भाजप का आंदोलन करत नाही? मुख्यमंत्री फडणवीस हाऊसमध्ये बोलले होते अटक करणार. मात्र त्यांनी अटक केली का? असा सवाल करत अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. 

Ambadas Danve :  छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb tomb) हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर (Aurangzeb tomb)  हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानं दिला आहे. दरम्यान याच मुद्यावरून आता राजकारण देखील तापले आहे. महाराजांनी प्रतापगडाजवळ अफजलखानची कबर का ठेवली?  इतिहास लोकांना माहिती पाहिजे, जे स्वराज्यावर आले त्यांना इथचं गाढलं. तसंच औरंगजेबलाही मराठ्यांच्या विरोधात आला त्यालाही इथे गाढलं हा इतिहास आहे. आम्ही कबर असावी, की नसावी याबाबत आमचं काही मत नाही. मूळात केंद्रात सरकार याचं आहे. एकीकडे संरक्षण द्यायचं आणि दुसरीकडे विरोध करायचा ही दुहेरी भूमिका का? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी टीका केली आहे.

प्रशांत कोरटकर असो किंवा राहुल सोलापूरकर याच्या विरोधात भाजप का आंदोलन करत नाही? मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) हाऊसमध्ये बोलले होते अटक करणार. मात्र त्यांनी अटक केली का? हॅलोच्या जागी वंदेमातरम् बोला असे मुनगंटीवार बोलले होते त्याचं काय झालं? असा सवाल ही  त्यांनी यावेळी केला आहे.  

केंद्रात, राज्यात सरकार तुमचंच, मग समाजात अशांतता कशासाठी? 

औंरगजेबची कबर संदर्भात छत्रपती संभाजी नगरमध्ये तसं वातावरण नाही. काही हिंदु संघटना जरूर काही मागणी करत आहेत. मात्र राज्यात आणि केंद्रात त्यांचंचं सरकार आहे. एकीकडे केंद्राकडून निधी दिला जातो. दुसरीकडे आंदोलनाच हाक दिली जात आहे.  म्हणजे दोन्ही बाजूने ढोल वाजवले जात आहे. औरंगजेबच्या विचाराचे विरोध नक्कीच आहे. मुख्यमंत्री त्यांचेच आहे, एक पत्र लिहा आणि काढून टाका समाजात अशांतता कशासाठी? असा सवाल ही अंबादास दानवे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. बाबरी पाडताना ते आमचे लोक नाही म्हणणारे हेच आहेत. महाराष्ट्रात अराजकता पसरवण्याचा हा डाव असल्याचे ही अंबादास दानवे म्हणाले. दरम्यान, नितेश राणे यांच्याविषयी बोलणं म्हणजे आपलं तोंड खराब करण्यासारखं आहे. ते मेच्युअर नाहीत. अशी बोचरी टीका ही अंबादास दानावे यांनी नितेश राणेंवर केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ambadas Danve: केंद्रात, राज्यात सरकार तुमचंच, मग समाजात अशंतता कशासाठी? औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून अंबादास दानवे कडाडले, म्हणाले..
केंद्रात, राज्यात सरकार तुमचंच, मग समाजात अशंतता कशासाठी? औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून अंबादास दानवे कडाडले, म्हणाले..
Sunita Williams : नऊ महिन्यांच्या कर्मभूमीतून मायभूमीत परतीची लगीनघाई! सुनीता विल्यम्स यांना घेण्यासाठी स्पेसक्राप्ट स्पेस स्टेशनवर पोहोचलं
नऊ महिन्यांच्या कर्मभूमीतून मायभूमीत परतीची लगीनघाई! सुनीता विल्यम्स यांना घेण्यासाठी स्पेसक्राप्ट स्पेस स्टेशनवर पोहोचलं
Dattatray Bharne & Nitesh Rane: मंत्रीपद रुबाब करायला नसतं, काळ तुम्हाला उत्तर देईल! मुस्लिमांवर आगपाखड करणाऱ्या नितेश राणेंना अजितदादांच्या मंत्र्याने सुनावलं
मंत्रीपद रुबाब करायला नसतं, काळ तुम्हाला उत्तर देईल! मुस्लिमांवर आगपाखड करणाऱ्या नितेश राणेंना अजितदादांच्या मंत्र्याने सुनावलं
Manikrao Kokate : न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे मूर्खपणा; माणिकराव कोकाटे पत्रकारांवर भडकले, नेमकं काय घडलं?
न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे मूर्खपणा; माणिकराव कोकाटे पत्रकारांवर भडकले, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 16 March 2025Sunita Williams & Wilmore To Return | सुनिता विल्यम्स आणि बूच विलमोर पृथ्वीवर परतणारABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 16 March 2025BJP Vidhan Parishad Candidate List : भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं जाहीर, संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचेंना संधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve: केंद्रात, राज्यात सरकार तुमचंच, मग समाजात अशंतता कशासाठी? औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून अंबादास दानवे कडाडले, म्हणाले..
केंद्रात, राज्यात सरकार तुमचंच, मग समाजात अशंतता कशासाठी? औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून अंबादास दानवे कडाडले, म्हणाले..
Sunita Williams : नऊ महिन्यांच्या कर्मभूमीतून मायभूमीत परतीची लगीनघाई! सुनीता विल्यम्स यांना घेण्यासाठी स्पेसक्राप्ट स्पेस स्टेशनवर पोहोचलं
नऊ महिन्यांच्या कर्मभूमीतून मायभूमीत परतीची लगीनघाई! सुनीता विल्यम्स यांना घेण्यासाठी स्पेसक्राप्ट स्पेस स्टेशनवर पोहोचलं
Dattatray Bharne & Nitesh Rane: मंत्रीपद रुबाब करायला नसतं, काळ तुम्हाला उत्तर देईल! मुस्लिमांवर आगपाखड करणाऱ्या नितेश राणेंना अजितदादांच्या मंत्र्याने सुनावलं
मंत्रीपद रुबाब करायला नसतं, काळ तुम्हाला उत्तर देईल! मुस्लिमांवर आगपाखड करणाऱ्या नितेश राणेंना अजितदादांच्या मंत्र्याने सुनावलं
Manikrao Kokate : न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे मूर्खपणा; माणिकराव कोकाटे पत्रकारांवर भडकले, नेमकं काय घडलं?
न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे मूर्खपणा; माणिकराव कोकाटे पत्रकारांवर भडकले, नेमकं काय घडलं?
Nashik Crime : बीडनंतर आता नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची दादागिरी! दाम्पत्याला धमकी देत मागितली 50 लाखांची खंडणी; पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्... 
बीडनंतर आता नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची दादागिरी! दाम्पत्याला धमकी देत मागितली 50 लाखांची खंडणी; पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्... 
शेतकऱ्याच्या 14 वर्षीय मुलाचे अपहरण, 60 लाख रुपयांची मागणी; 5 दिवसांपासून तपास पण थांगपत्ता नाही
शेतकऱ्याच्या 14 वर्षीय मुलाचे अपहरण, 60 लाख रुपयांची मागणी; 5 दिवसांपासून तपास पण थांगपत्ता नाही
Vidhan Parishad Election 2025: एकनाथ शिंदेंनी मोहरा निवडला, विधानपरिषदेवर कोणाला पाठवणार?
एकनाथ शिंदेंनी मोहरा निवडला, विधानपरिषदेवर कोणाला पाठवणार?
Harshvardhan Sapkal : देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबाइतकेच क्रूर शासक, त्यांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचाय; काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबाइतकेच क्रूर शासक, त्यांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचाय; काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
Embed widget