एक्स्प्लोर

Mumbai Airport : मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवलं; ताबा घेताच अदानींचा निर्णय

मुंबई विमानतळाचा ताबा आता अदानी कंपनीकडे गेला असून त्याचे मुख्यालय गुजरातमधील अहमदाबादला हलवण्याचा निर्णय अदांनींनी घेतला आहे. नवी मुंबई विमानतळाचा ताबाही अदानी कंपनीकडे देण्यात आला आहे. 

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेताच अदानींनी आता कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील अहमदाबादला हलवलं आहे. त्यामुळे विमानतळ महाराष्ट्रातील मुंबईत तर त्याचे मुख्यालय हे गुजरातमधील अहमदाबादमध्ये असं काहीसं चित्र निर्माण झालं आहे. 

मुंबईच्या विमानतळाचा ताबा आता जीव्हीके कडून पूर्णपणे अदानी कंपनीकडे गेला आहे. अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा संपादन करण्याची घोषणा केली होती. सध्या बांधकाम सुरु असलेल्या नवी मुंबईच्या विमानतळाचा ताबाही अदानी यांच्या कंपनीकडे गेला आहे. अदानींच्या या निर्णयामुळे एक मोठी कंपनी आता पुन्हा मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट झाली आहे. 

कंपनीच्या कामकाजात सुसूत्रता यावी, ते सुलभ व्हावं यासाठी कंपनीचे मुख्यालय हे मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया अदानी कंपनीकडून देण्यात आली आहे. मात्र यामागचे खरं कारण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

मुंबई विमानतळावर दांडियाच्या गाण्यावर फ्लॅशमॉब
मुंबई विमानतळाचा ताबा हा अदानी कंपनीकडे जाणार याची चर्चा सुरु असतानाच केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका झाली होती. त्यानंतर 13 जुलै रोजी या विमानतळाचा ताबा अदानींना मिळाला. त्यानंतर अवध्या आठवड्याभरातच विमानतळाचं मुख्यालय हे अहमदाबादला हलवण्यात आलं आहे. मुंबई विमानतळावर सोमवारी दांडियाच्या गाण्यावर करण्यात आलेल्या फ्लॅशमॉबवरही टीका झाली होती.

अदानी उद्योग समूहाकडे मुंबईसह देशातील प्रमुख सहा विमानतळांचा ताबा आहे. त्यामध्ये लखनऊ, जयपूर, गुवाहाटी, अहमदाबाद, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरु या विमानतळांचा समावेश आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड ही भारताची सर्वात मोठी विमानतळ पायाभूत सुविधा कंपनी आहे, जी विमानतळांवर येणारे 25 टक्के आणि भारताच्या विमान वाहतुकीच्या 33 टक्के नियंत्रणाखाली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: जीबीएस सिंड्रोमचा धोका वाढल्याने सरकार राज्यातील यात्रांवर निर्बंध लादणार?
मोठी बातमी: जीबीएस सिंड्रोमचा धोका वाढल्याने सरकार राज्यातील यात्रांवर निर्बंध लादणार?
Chhaava Worldwide Box office Collection: विक्की कौशलच्या 'छावा'ची जगभरात गर्जना; 200 कोटींच्या जवळ पोहोचली फिल्म, विक्रमांचे रचलेत डोंगर
विक्की कौशलच्या 'छावा'ची जगभरात गर्जना; 200 कोटींच्या जवळ पोहोचली फिल्म, विक्रमांचे रचलेत डोंगर
NTPC : सलग 32 व्या वर्षी परंपरा जपली, एनटीपीसीकडून 2424 कोटींच्या लाभांशाचं वाटप, वर्षभरात 8000 कोटींचा टप्पा पूर्ण
एनटीपीसीकडून शेअरधारकांना लाभांश वाटप, 2424 कोटी वर्ग, 32 व्या वर्षी परंपरा जपली
Chhatrapati Shivaji Maharaj : बी-बियाणं पुरवली, संकटकाळी करबंदी राबवली, जमीन मोजली, छत्रपती शिवाजी महाराजांचं कृषी धोरण कसं होतं?
छत्रपती शिवाजी महाराजांचं कृषी धोरण कसं होतं? ज्यानं रयत राजांसाठी लढायला अन् मरायला तयार झाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 19 February 2025ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 18 February 2024Santosh Deshmukh Case | 'अनैतिक' कट, संतोष देशमुख प्रकरणावरून वर्दीवर आरोप Special ReportDevendra Fadnavis on MLA's Security | आमदारांची सुरक्षा घटली, कुणाकुणाची सटकली? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: जीबीएस सिंड्रोमचा धोका वाढल्याने सरकार राज्यातील यात्रांवर निर्बंध लादणार?
मोठी बातमी: जीबीएस सिंड्रोमचा धोका वाढल्याने सरकार राज्यातील यात्रांवर निर्बंध लादणार?
Chhaava Worldwide Box office Collection: विक्की कौशलच्या 'छावा'ची जगभरात गर्जना; 200 कोटींच्या जवळ पोहोचली फिल्म, विक्रमांचे रचलेत डोंगर
विक्की कौशलच्या 'छावा'ची जगभरात गर्जना; 200 कोटींच्या जवळ पोहोचली फिल्म, विक्रमांचे रचलेत डोंगर
NTPC : सलग 32 व्या वर्षी परंपरा जपली, एनटीपीसीकडून 2424 कोटींच्या लाभांशाचं वाटप, वर्षभरात 8000 कोटींचा टप्पा पूर्ण
एनटीपीसीकडून शेअरधारकांना लाभांश वाटप, 2424 कोटी वर्ग, 32 व्या वर्षी परंपरा जपली
Chhatrapati Shivaji Maharaj : बी-बियाणं पुरवली, संकटकाळी करबंदी राबवली, जमीन मोजली, छत्रपती शिवाजी महाराजांचं कृषी धोरण कसं होतं?
छत्रपती शिवाजी महाराजांचं कृषी धोरण कसं होतं? ज्यानं रयत राजांसाठी लढायला अन् मरायला तयार झाली
Temperature Update: उन्हाचा चटका तीव्र.. मध्य महाराष्ट्र, विदर्भात गेल्या 24 तासांत 4 ते 5 अंशांनी वाढ, कुठे कसे राहणार तापमान? वाचा IMDने सांगितलं..
उन्हाचा चटका तीव्र.. मध्य महाराष्ट्र, विदर्भात गेल्या 24 तासांत 4 ते 5 अंशांनी वाढ, कुठे कसे राहणार तापमान? वाचा IMDने सांगितलं..
Pune Crime: पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमधील साहिती रेड्डीने आयुष्य का संपवलं? बॉयफ्रेंडकडून त्रास, पोलिसांनी सांगितलं खरं कारण
पिंपरी चिंचवडच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील साहिती रेड्डीने आयुष्य का संपवलं? पोलिसांची महत्त्वाची माहिती
लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
Bhiwandi : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.