एक्स्प्लोर

Rain Update : मुंबईसह कोकणाला रेड अलर्ट, रात्रभर सुरु असलेल्या संततधारेनंतर सध्या पावसाची उसंत

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि लगतच्या उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत होता. परंतु, आज पावसानं विश्रांती घेतली आहे.

मुंबई : मुंबईसह कोकणात पावसाचा रेड अलर्ट आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकणात सर्वदूर पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर, कोल्हापूर साताऱ्यातील घाट परिसर आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार परिसरात रात्रभर रिमझिम पाऊस सुरु होता. मात्र सध्या पावसानं उसंत घेतली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात सध्या रिमझिम पाऊस सुरु आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि लगतच्या उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत होता. परंतु, आज पावसानं विश्रांती घेतली आहे. तीन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच मुंबईची लाईफलाईन असणारी रेल्वे सेवाही विस्कळीत झाली होती. आज तीन दिवसानंतर पावसानं विश्रांती घेतल्यानं मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

मुंबईच्या मुसळधार पावसात एक नाही, दोन नाही... तर तब्बल 400 गाड्या पाण्याखाली

दोन दिवस मुंबईत बरसणाऱ्या धुवांधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय तर काही ठिकाणी मोठ्या दुर्घटना होऊन जीवतहानीही झाली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं आतापर्यंत 30 मुबईकरांचा जीव घेतला आहे. या पावसानं जीवितहानीबरोबरच मोठं आर्थिक नुकसान देखील केलं आहे. असाच काहीसा प्रकार घडलाय मुंबईतील कांदिवली भागात. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 400 हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. 

मुंबईच्या कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमधल्या 400 पेक्षा जास्त गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. मुसळधार पावसामुळे कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं. त्यामुळे पार्किंगमध्ये असलेल्या 400 हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पार्किंगमधलं पाणी कमी झालं. अन् गाड्यांची झालेली दुरावस्था पाहून धक्काच बसला. वाहनांची अवस्था पाहून, महापालिकेला नक्की आपण कशासाठी पैसे मोजले होते? असा सवाल वाहनमालकांना नक्कीच पडला असणार. 

भांडुप जलशुद्धीकरण संकुलाभोवती बांधणार पूर प्रतिबंधक भिंत बांधणार

तीन दिवसांपासून मुंबईत पाणीपुरवठा विस्कळीत आहे. याचं कारण म्हणजे भांडूप जलशुद्धीकरण संकुलात तुंबलेलं पाणी. तलाव आणि धरणांमधील पाणी शुध्द करुन मुंबईला पुरवठा केल्या जाणाऱ्या भांडुप संकुलात पाणी तुंबल्याने संपूर्ण मुंबईचा पाणीपुरवठा खंडित करावा लागला. भांडूप परिसरात 1 जुलैच्या रात्रीनंतर अवघ्या काही तासांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भांडूप जलशुद्धीकरण संकुलामध्ये पावसाचे पाणी शिरुन झालेल्या नुकसानीची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी पाहणी केली आहे.  

संपूर्ण संकुलाभोवती पूर प्रतिबंधक भिंत बांधणे, संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरातून येणारे पुराचे पाणी तुळशी तलावाकडे वळते करण्यासाठी विशेष प्रवाह मार्ग बांधण्यासाठी उद्यान प्रशासनाकडे निवेदन देण्याबाबत निर्देश दिले आहेत. भांडुप जलशुद्धीकरण संकूल हा संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठा असा जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. संपूर्ण मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यापैकी सुमारे 65 टक्के पाण्याचे शुद्धीकरण या एकट्या प्रकल्पामध्ये केले जाते. 

महत्त्वाच्या बातम्या

Mankhurd Chawl Collapse : धोकादायक चाळ रिकामी करण्यासाठी सामान आवरायला गेले, पण पावसाने घात केला; मानखुर्दमध्ये सहा मुलं, एक महिलेसह आठ जण ढिगाऱ्याखाली गाडले
धोकादायक चाळ रिकामी करण्यासाठी सामान आवरायला गेले, पण पावसाने घात केला; मानखुर्दमध्ये सहा मुलं, एक महिलेसह आठ जण ढिगाऱ्याखाली गाडले
मानखुर्द परिसरात झोपडपट्टी कोसळली, ढिगाऱ्याखाली सापडलेल्या सहा जणांचा मृत्यू, तर काहीजण जखमी
मानखुर्द परिसरात झोपडपट्टी कोसळली, ढिगाऱ्याखाली सापडलेल्या सहा जणांचा मृत्यू, तर काहीजण जखमी
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावासाचा इशारा, मुंबईसह ठाण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन 
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावासाचा इशारा, मुंबईसह ठाण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन 
धक्कादायक! कचरा फेकण्यासाठी गेला, पाय घसरुन नदीत पडला, भिवंडीत कामवारी नदीत बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
धक्कादायक! कचरा फेकण्यासाठी गेला, पाय घसरुन नदीत पडला, भिवंडीत कामवारी नदीत बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget