एक्स्प्लोर

Temperature Update: उन्हाचा चटका तीव्र.. मध्य महाराष्ट्र, विदर्भात गेल्या 24 तासांत 4 ते 5 अंशांनी वाढ, कुठे कसे राहणार तापमान? वाचा IMDने सांगितलं..

Temperature today: प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील काही भागांत तापमानात वाढ होणार आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटे हलका गारवा आणि दुपारी प्रचंड उन्हाच्या झळा जाणवत आहेत. बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 35 ते 40 वर पोहोचले आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात  सर्वाधिक तापमानाच्या नोंदी होत आहेत. गेल्या 24 तासांत तापमानात मोठा बदल जाणवत असून साधारण 4 ते 5 अंशांनी तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 35.8 अंश सेल्सियसवर होता. तर ठाण्यात 36.6 अंश तापमानाची नोंद झाली. सांगलीत 37.1 अंश एवढ्या सर्वाधिक तापमानाची नोंद होतेय.हवामान विभागाच्या अंदाजानुसार,येत्या 3-4 दिवसांत तापमान चढेच राहणार असून उष्णतेचा चटका अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. (Temperature)

हवामान विभागाचा अंदाज काय?

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम येथे पुढील 7 दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. एक पश्चिमी चक्रावात(Western Disturbance) पाकिस्तान व त्याच्या शेजारील भागावर चक्रीय स्थितीच्या स्वरूपात आहे आणि दुसरीकडे चक्राकार वाऱ्यांची स्थिती वायव्य राजस्थानमध्ये स्थित आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत राज्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा प्रभाव अधिक जाणवेल. सध्या उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा नाही, मात्र उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत जाईल.

विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद

विदर्भात गेल्या 24तासांत सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद होत असून उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय.हवामान विभागाचे पुणे विभाग प्रमुख के. एस होसाळीकर यांनी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाच्या नोंदी झाल्या, याविषयी x माध्यमावर पोस्ट केली आहे. त्यानुसार, 18 फेब्रुवारीला अकोल्यात सर्वाधिक म्हणजेच 37.8 अंश सेल्सियसची नोंद झाली. ब्रम्हपुरीतही साधारण असेच तापमान होते. अमरावतीत 36.4 अंश सेल्सियस तापमान होते. वाशिम जिल्ह्याचा पारा 37 अंशांवर गेला होता. तर चंद्रपूर,भंडारा,गोंदिया, गडचिरोली, वर्धा,यवतमाळ या जिल्ह्यांचा पारा 35 - 37 अंशांपर्यंत गेला होता. दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागानुसार, विदर्भात दोन दिवसांनी काहीसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हलक्या पावसाचीही चिन्हे आहेत.

महाराष्ट्रात सांगली 37.1 Klp 35.1 सातारा 35.3 Slp 37.5 परभणी 36.5 नाशिक 35.7 बारामती 34.4 उदगीर 35.4 पुणे 35.8 जालना 36.2 ठाणे 36.6337 जेऊरगाव 35.2 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.

 

उष्ण झळांसह तापमान वाढणार

प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील काही भागांत तापमानात वाढ होणार आहे. विशेषतः दक्षिण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस कमाल तापमान १ ते २ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही. विदर्भात मात्र पुढील पाच दिवस कमाल तापमान स्थिर राहील. किमान तापमानातही पुढील तीन दिवस कोणताही मोठा बदल होणार नाही, मात्र त्यानंतर तापमान 2 ते 3 अंशांनी घटू शकते. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील किमान तापमान पुढील तीन दिवसांपर्यंत स्थिर राहील. मात्र, उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान 1ते 2 अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.

 

हेही वाचा:

Maharashtra Weather: मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
Embed widget