Virat kohli : विराट कोहलीच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मोठा चमत्कार! पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकताच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रचला इतिहास
India vs Pakistan Champions Trophy 2025 : विराट कोहलीचं खणखणीत शतक अन् भारतानं उडवला पाकिस्तानचा धुव्वा उडवला.

Virat Kohli first Century in Champions Trophy : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिलाच, पण या पाकिस्तानविरुद्ध त्याने आपले शतकही पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या बॅटवरून हे 82 वे शतक आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विराट कोहलीने त्याच्या फॉर्मवर टीका करणाऱ्यांच्या तोंडावर चापट मारली आहे. त्याच्या नाबाद 100 धावांच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला.
A rollicking 💯 in an age-old rivalry from Virat Kohli 🫡#ChampionsTrophy #PAKvIND ✍️: https://t.co/O9lMfFTkQy pic.twitter.com/58uoVGIXBD
— ICC (@ICC) February 23, 2025
पाकिस्तानविरुद्ध चौथे शतक
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहलीने 111 चेंडूत चौकार मारून आपले शतक पूर्ण केले आणि यादरम्यान त्याने संथ खेळपट्टीवर संयमाने खेळताना 7 चौकारही मारले. हे कोहलीचे एकदिवसीय सामन्यातील 51 वे शतक होते, तर किंग कोहलीचे पाकिस्तानविरुद्धचे एकदिवसीय सामन्यातील हे चौथे शतक होते.
Virat Kohli's sensational ton secured a six-wicket win for India 🤩#ChampionsTrophy
— ICC (@ICC) February 23, 2025
Match Highlights for the #PAKvIND contest 🎥 ➡ https://t.co/Xw9bLvbWFH pic.twitter.com/C7GIS293s5
16 वर्षांची प्रतीक्षा संपली
विराट कोहली 2009मध्ये पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळला होता. पण या स्पर्धेत विराटने पहिल्यांदाच शतक झळकावले आहे. म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करण्यासाठी त्याला 16 वर्षे वाट पहावी लागली. त्याच वेळी, 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर त्याने प्रथमच एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले आहे. याशिवाय, त्याने 531 दिवसांनंतर परदेशी भूमीवर एकदिवसीय शतक झळकावले आहे, म्हणजेच ही खेळी त्याच्यासाठी अनेक प्रकारे खास आहे.
51st ODI Century 📸📸
— BCCI (@BCCI) February 23, 2025
Updates ▶️ https://t.co/llR6bWyvZN#TeamIndia | #PAKvIND | #ChampionsTrophy | @imVkohli pic.twitter.com/soSfEBiiWk
भारताचा पाकिस्तानवर विजय
विराट कोहलीच्या शतकामुळे भारताने या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा संघ पूर्ण षटके न खेळताच 241 धावांवर बाद झाला. पाकिस्तानला मोठे धावांपासून रोखण्यात कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांनी मोठी भूमिका बजावली. लक्ष्याचा पाठलाग करताना, विराट कोहलीचे शतक आणि श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्या खेळींमुळे भारताने सहज विजय मिळवला. भारताने 42.3 षटकांत 244 धावा करून सामना जिंकला.
हे ही वाचा -




















