एक्स्प्लोर

Chhatrapati Shivaji Maharaj : बी-बियाणं पुरवली, संकटकाळी करबंदी राबवली, जमीन मोजली, छत्रपती शिवाजी महाराजांचं कृषी धोरण कसं होतं?

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जयंती राज्यभर सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती राज्यासह देशभरात उत्साहात साजरी केली जाते. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये शेतकऱ्यांच्या सैन्याचा समावेश होता. शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याच्या कार्यात कृषी विषयक अशी धोरणं राबवली ज्यामुळं शेतकऱ्यांना राजांबद्दल आस्था निर्माण झाली. शेतकऱ्याचं सैन्य राजांसाठी लढायला उभं राहिलं. पुणे परगण्यात राजांनी शेतकऱ्यांना जमीन कसण्यास बी बियाणे दिली, शेतीला प्रोत्साहन दिलं, महसूल कमी केला. जमीन मोजणीची पद्धत बदलली. मोजणी केलेल्या क्षेत्रातील पिकाचा महसूल निश्चित केला. याशिवाय शेतकऱ्यांकडून गवत देखील योग्य किंमत देऊन विकत घ्यावं, असा आदेश दिला. 

छत्रपती महाराजांनी लढाईमुळं उद्धवस्त झालेली गावे कौलनामे देऊन पुन्हा वसवली. त्या ठिकाणी जमीन नव्यानं कसणाऱ्यांना बी-बियाणं आणि औतफाट्यास मदत केली. शेती कसायला प्रोत्साहन दिलं. नव्यानं लागवड होणाऱ्या जमिनींसाठी सुरुवातीचा चार ते पाच वर्ष महसूल कमी ठेवला. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी जमिनी मोजून घेतला. मोजणी झालेल्या जमिनींचा महसूल ठरवून दिला. निश्चित केलेला महसूलच वसूल करावा असा नियम करुन त्याची अंमलबजावणी केली.जमीन मोजण्यासाठी काठी केली ती पाच हात, पाच मुठी लांब असेल. एका हाताची लांबी चौदा तसू  असून काठीची लांबी 82 तसू असे. वीस काठ्यांचा एक  बिघा व एकशेवीस बिघ्यांचा एक चावर असे मोजणीचे प्रमाण निश्चित केले. यानंतर एका बिघ्यात किती पीक येईल हे उभ्या असणाऱ्या पिकाची पाहणी करुन निश्चित केलं जाई. याशिवाय शेतीतून आलेल्या उत्पन्नाचे पाच भाग करुन तीन  भाग शेतकऱ्याला तर दोन भाग सरकारला द्यावेत, अशी पद्धत रुढ केली.

अवर्षणाचं संकट आल्यास त्यावेळी शेतकऱ्यांना तगाई दिली जायची. तगाईची रक्कम पुढील चार पाच वर्षांपर्यंत परत करण्याची मुभा शेतकऱ्यांना दिली जायची. 
 
एखाद्या वर्षी दुष्काळ पडला, तर त्याचा परिणाम शेतीवर होऊन  पीक आलं नाही तर शेतकरी महसूल कसा देईल या विचारानं दुष्काळाच्या काळात महसूल माफ केला. या संकटप्रसंगी शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांना मदत केली जायची.  

छत्रपती शिवाजी महाराजांनी 19 मे 1673 ला चिपळूणच्या जुमलेदार, हवालदार व कारकुनास लिहिलेलं पत्र प्रसिद्ध आहे. या पत्रात दाभोळच्या सुभ्यात सैन्याचा मुक्काम असताना  कशी व्यवस्था असावी यासंदर्भातील सूचना शिवाजी महाराजांनी केलेल्या आढळून येतात. त्या पत्रात शिवाजी महाराजांनी म्हटलंय, "हे तुम्ही बरे जाणून, सिपाही हो अगर पावखलक हो, गाव राहिले असाल  त्याणी रयतेस काडीचा अजार द्यावचा गरज नाही. साहेबी खजानांतून वाटणिया पदरी घातलिया आहे ती ज्याला जे पाहिजे, दाणा हो अगर गुरेंढोरे वागवीत असतील असाल त्यास गवत हो, अगर फाटे, भाजीपाले व वरकड विकावया येईल ते रास घ्यावे, बाजारास जावे, रास विकत आणावे, कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही व पागेस सामा केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे."

या पत्रातून शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांकडून सैन्यानं गवत, भाजीपाला देखील रोख रक्कम देऊन विकत घ्यावी ते करताना कुणावर जुलूम करु नये असं म्हटलंय. 

महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. सोयाबीनचे दर गेल्या तीन वर्षात होते त्यापेक्षा कित्येक पटीनं घटलेत. शेतकऱ्यांना हमीभावानं सोयाबीन खरेदी व्हावी यासाठी रांगा लावाव्या लागतात. दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दरासाठी आंदोलन करावं लागतं. राज्यातील ऊस उत्पादक एकरकमी एफआरपीसाठी न्यायालयीन लढा लढत आहेत. शेतकरी जेव्हा चांगलं पीक घेतो तेव्हा ते योग्य अन् रास्त भावात विकलं जात नाही, परिणामी शेतकरी कर्जात दबून जातोय. महाराष्ट्रात गेली कित्येक वर्ष शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय, अशा स्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी राबवलेलं कृषी धोरण प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरु शकतं. 

इतर बातम्या : 

Shiv Jayanti Wishes 2025 : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; महाराजांच्या शौर्याचं करा स्मरण, पाठवा 'हे' मेसेजेस

मोठी बातमी : मोदी सरकारचा शिवजयंतीनिमित्त जम्बो प्लॅन, प्रत्येक जिल्ह्यात ‘जय शिवाजी, जय भारत‘ पदयात्रा काढण्याचे आदेश

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

व्हिडीओ

Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती
Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Solapur Crime: रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
Sanjay Raut On Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
Solapur Crime: कपड्याला शी लागल्याने संतापला, अकबरने प्रेयसीच्या चिमुकल्या मुलाला गळा दाबून संपवलं, सोलापूर हादरलं
कपड्याला शी लागल्याने संतापला, अकबरने प्रेयसीच्या चिमुकल्या मुलाला गळा दाबून संपवलं, सोलापूर हादरलं
Pune Prashant Jagtap: प्रशांत जगतापांच्या राजीनामा अस्त्राकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाही, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक
प्रशांत जगतापांच्या राजीनामा अस्त्राकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाही, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक
Embed widget