एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

नव्या वातावरण बदलांना सामोरे जायला शहरं तयार आहेत? दीर्घकालीन नियोजन आवश्यक

महाराष्ट्रातल्या महानगरांना वातावरण बदलांमुळे निर्माण होणाऱ्या संकटांना खंबीरपणे तोंड द्यायचं असेल तर दीर्घकालिन नियोजन आवश्यक आहे. महानगरं उभारताना केवळ विकासाचा हव्यास डोळ्यासमोर ठेऊन चालणार नाही.

मुंबई : निसर्ग कोपला की तो कसं तांडव करतो हे गेल्या काही वर्षात जगानं पाहिलंय. विशेषत: निसर्ग रचनेतल्या मानवी हस्तक्षेपामुळे त्याच्या रौद्र रुपाचा जगभरातल्या महानगरांना फटका बसलाय. भारतातली, युरोपातली आणि चीनमधली महानगरं सध्या एकाचवेळी महापुरांच्या विळख्यात सापडली आहेत. विदेशातल्या अनेक शहरांनी वातावरण बदलांशी स्वत:ला जुळवून घेतलंय. मात्र, नव्या वातावरण बदलांना सामोरे जायला शहरं तयार आहेत काय? 

इंग्लंडची राजधानी लंडन, चीनमधलं हेनान आणि भारतातली महानगरं ही एकाच वेळी निसर्गाच्या रौद्र रुपाला सामोरी जातायेत. सध्या महाराष्ट्रात पश्चिम घाटावर निसर्गाच्या रौद्र रुपानं थैमान घातलंय. पश्चिम महाराष्ट्र, कोकण , विदर्भ आणि राजधानी मुंबई सातत्यानं वातावरण बदलामुळे निर्माण झालेल्या संकटांना सामोरी जातेय.

मुंबई
मुंबई ही 7 बेटांपासून बनवली आहे. मुंबईत बशीच्या आकाराचे बेटं तयार झालीत. अशातच उंच भागातून सखल भागात पाणी जातं आणि म्हणूनच मुंबईच्या रस्त्यांचा दरवर्षीच समुद्र होतो. पण ही झाली मुंबईची भौगोलिक रचना. मात्र, दरवर्षी मुंबईत होणाऱ्या दुर्घटनांसाठी मानवी हस्तक्षेपही तितकाच जबाबदार आहे. तुलनाच करायची झाली तर ती लंडनच्या थेम्स नदीची आणि मुंबईतल्या मिठी नदीची होईल. एकीकडे लंडनमध्ये थेम्स नदीचं पाणी शहरात शिरायचं म्हणून तिथे थेम्सची खोली वाढवली गेली. मुंबईत मात्र मिठी नदीचं आहे तेवढं पात्रही अरुंद होत चाललंय आणि मिठी नदीचा नाला झालाय.

पुणे
पुणे हे मूळ टेकड्यांचं आणि मुळा-मुठेसोबतच लहानमोठ्या ओढे आणि ओहोळांचं शहर. मात्र, बेसुमार काँक्रिटीकरणानं पुण्यात नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बुजवण्यात आलेय. आंबील ओढा हे त्याचं जिवंत उदाहरण. शहर वसवण्यासाठी नैसर्गीक ओढे-ओहोळ यांवर अतिक्रमण झालं.

कोल्हापूर
पंचगंगेची दरवर्षी वाढणारी पातळी ही संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठीच धोक्याची घंटा आहे. पंचगंगेच्या रेडझोनमध्ये बेसुमार बांधकामं झालीयेत. माणसानं स्वत:चं घर नदीच्या घरात बांधलं आणि आता नदी तितं घर सोडून जागा मिळेल तिथे निघालीय. कमी वेळात होणाऱ्या जास्त पावसानं पंचगंगा फुगते आणि तिच्या लगतचा पुणे-बंगरुळु महामार्गावरही पावसाळ्यात दिसेनासा होतो.

सांगली
कोयना धरणाची पातळी किती ठेवायची याबाबत जलआयोगाचे काही विशीष्ट निर्देश आहेत. मात्र, कोयनेतून होणाऱ्या वीजनिर्मीतीच्या हव्यासापोटी आणि जादा पाणीसाठ्यासाठी कोयना धरणातून योग्य वेळीच विसर्ग केला जात नाही. आणि वातावरण बदलामुळे जेव्हा कमी वेळात जास्त प्रमाणात पाऊस होतो तेव्हा कोयना धरणातली पाणी पातळी वाढते आणि नाईलाजानं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करावा लागतो...

नागपूर
काही वर्षांपूर्वी नागपूरमध्ये फारशी पाणी साचण्याची उदाहरणं पाहायला मिळत नव्हती. गेल्या काही वर्षात नागपूरमध्ये विकासाचा पाठलाग करतांना मोठ्या संख्येनं  सिंमेंटचे रस्ते तयार झाले. कोणत्याही शहराच्या विकासासाठी चांगले रस्ते आवश्यक असतातच. मात्र, या रस्त्यांचा आराखडाही स्थानिक भौगोलिक परिस्थितीशी समतोल साधणारा असावा लागतो. नागपुरात हाच समतोल साधला गेला नाही...त्यामुळेच, आजुबाजूच्या वस्तीपेक्षा रस्त्यांची उंची जास्त झाली आणि शहरात पाणी साचायला मदत झाली.

नाशिक 
गोदावरीला दरवर्षीच पूर येतोय. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग झाला तर गोदावरीला पूर येणारच, मात्र त्या विसर्गाचं नीट नियोजन झालं नाही तर 2008 सारखी पूरस्थिती उद्भऊ शकते.सोबतच, गोदावरीच्या पात्रातले नैसर्गिक स्त्रोत हे सिमेंट काँक्रिटीकरणानं दाबले गेलेत. त्यामुळे गंगापूर धरणापासून ते तपोवनापर्यंत गोदावरीतला गाळ काढून उथळ झालेलं पात्र खोल करण्याची गरज आहे.

महाराष्ट्रातल्या महानगरांना जर वातावरण बदलांमुळे निर्माण होणाऱ्या संकटांना खंबीरपणे तोंड द्यायचं असेल तर त्यासाठी दीर्घकालिन नियोजन आवश्यक आहे.महानगरं निर्माण करताना केवळ विकासाचा हव्यास डोळ्यासमोर ठेऊन चालणार नाही. जर हा विकास शाश्वत आणि निसर्गस्नेही राहिला तरच महानगरं येणाऱ्या काळात तग धरु शकतील.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
सोलापूरमध्ये बस अन् डंपरचा अपघात; धडकेत दोघे जागीच ठार, जळगावमध्येही पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत
सोलापूरमध्ये बस अन् डंपरचा अपघात; धडकेत दोघे जागीच ठार, जळगावमध्येही पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत
Mumbai Pune Expressway Missing Link: नियम केवळ सामान्यांसाठी? पिंपरीचे महापौर रवी लांडगेंचा मिसिंग लिंकवर फोटो, महामार्ग पोलिसांनी कारवाई केली का? जनतेचा प्रश्न
नियम केवळ सामान्यांसाठी? पिंपरीचे महापौर रवी लांडगेंचा मिसिंग लिंकवर फोटो, महामार्ग पोलिसांनी कारवाई केली का? जनतेचा प्रश्न
Sunetra Pawar On Baramati By Election Result 2026: देशातील सर्वाधिक मताधिक्याने जिंकल्या, अजितदादांचाही रेकॉर्ड मोडला; सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
देशातील सर्वाधिक मताधिक्याने जिंकल्या, अजितदादांचाही रेकॉर्ड मोडला; सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

व्हिडीओ

Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
Himanta Biswa Sarma : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
Rahul Gandhi : आम्ही ममता बॅनर्जींसोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी, भाजपकडून निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं आसाम आणि बंगालमधील निवडणुकीची चोरी : राहुल गांधी
आम्ही ममता बॅनर्जी यांच्या सोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी : राहुल गांधी 
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन
West Bengal : सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
Vijay Thalapathy : तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
Embed widget