एक्स्प्लोर

स्वतःसाठी वेळच कुठे?

आज महिलांनी नोकरी करणं म्हणजे महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल वैगरे काही म्हणू नये. घर चालवण्यासाठी नवरा बायकोचं काम करत राहणं गरजेचं आहे. पण दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत तिचा संपूर्ण दिवस कामात, कामात आणि फक्त कामात जातो. हे काम घरातलं, ऑफिसमधलं आणि परत घरी परतल्यानंतर... गेला तिचा दिवस. तिच्याकडे तिच्यासाठी वेळ आहेच कुठे?

माझी आणि तिची ट्रेन पकडण्याची वेळ एकच. नेहमी ती आणि मी एकमेकींकडे पाहून हसतो. तोंडदेखीच ओळख. तिचा चेहरा नेहमीच हसरा. आज मात्र ती थोडी चिंतेत वाटली. तिचे डोळे भरुन आले होते. स्कार्फ बांधून तिचा अश्रू लपवण्याचा प्रयत्न होता. मात्र मी न राहून तिला विचारलं, तर ती मनमोकळेपणाने बोलू लागली. तिच्या लग्नाला 7 वर्ष उलटली. नवरा मल्टिनॅशनल कंपनीत कामाला. बँकेतली तिची नोकरी. सासू सासऱ्यांचं आजारपण, मोठे दीर, हाऊसवाईफ जाऊ, त्यांची 2 मुलं.. हे तिचं कुटुंब... हे तिचं कुटुंब यासाठी म्हटलं कारण आजही तिच्या कुटुंबात तिच्या माहेरच्यांना स्थान दिलं की अनेकांचे कान टवकारतात. नवरा दिवस रात्र कामात गुंतलेला.. ती तिच्या नोकरीत.. नवरा कधी घरी असला की त्याचं रहाटगाडं आरामात चालणार, मात्र तिला काही ब्रेक नाही. सुट्टीचा दिवस असला की घरातली आणखी 4 कामं निघणार. नवरा घरी म्हटलं की त्याच्या आवडीचं खाणंपिणं बनवणं आलं. सूनबाई आज घरी म्हटल्यावर 2 पक्वान्नं जास्त बनवा, अशी फर्माईश असणारच. शिवाय तिची आठवड्याची कामं उरकणं आलंच. रोज सकाळी उठून कामं आटोपून 10 वाजता ऑफिसला पोहोचणारी ती दुपार होऊन गेली तरी तिच्या आंघोळीचा पत्ता नाही. स्वतःसाठी वेळ द्यावा म्हटलं, थोडं बाहेर जावंसं म्हटलं की सुट्टीचा एक दिवस घरातल्यांसोबत घालवायला नको का? हा प्रश्न विचारला जाणार. तिच्यासाठी तिच्याकडे वेळ आहेच कुठे? चल जरा बागेत फिरुन येऊ, तिने नवऱ्याला सांगितलं की नवऱ्याचं उत्तर ठरलेलं मला ब्रेक मिळत नाही, मी थकतो. आज मला काहीही सांगू नकोस. मी फक्त आराम करणार. आरामाची व्याख्या फक्त नवऱ्यांपुरती? बायकोचा विचार का होत नाही? ती ही थकते. रोज थकते. नवरा उठायच्या आधी तिचा दिवस सुरु होतो. घरातल्यांची मनमर्जी राखत वागावं लागतं. सकाळचा नाश्ता घरच्यांच्या आवडीचा तोही वेळेत तिला उरकावा लागतो. नवरा ऑफिसला निघायच्या आधी त्याचा डब्बा तयार ठेवावा लागतो. सकाळी उठून 4 तास उलटलेले असतात तरी तिच्या पोटात काही गेलेलं नसतं. मग तिची ऑफिसला निघायची वेळ होते. पटापट उरकून नाश्त्याच्या नावाखाली दोन घास खाऊन घड्याळाच्या काट्यावर तिची धावपळ सुरु होते. 8.50 ची लोकल सुटली तर ऑफिसला पोहोचायला उशीर होणार. लेटमार्क नको. लोकलची गर्दी नेहमीचीच. त्यातूनही कसंबसं चढा, फर्स्ट क्लासचं तिकीट असूनही काहीही उपयोग नाही. गुरामेंढरांसारखाच प्रवास करावा लागतो. ऑफिसला पोहोचल्यावर थकवा जाणवू न देता आपण आज अगदी फ्रेश असल्याचा आव आणत काम करावं लागतं. जितकी शारीरिक दगदग त्यातूनही अधिक ती मानसिकरित्या थकते. पण, सांगणार कुणाला?  कारण ती फक्त बाईचं कर्तव्य पार पाडतेय. घरातलं तर तुला उरकावं लागणारच. तू नाही केलंस तर कोण करणार? ही बाईमाणसाची कामं आलीच पाहिजेत. नोकरी करुन थकतेस? सोड नोकरी. तुझ्या नोकरीवर मी काही अवलंबून नाही. मी तुला खायला घालू शकतो. मी सक्षम आहे... ही नवरे मंडळींच्या तोंडची भाषा ठरलेली. दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत तिचा संपूर्ण दिवस कामात, कामात आणि फक्त कामात जातो. हे काम घरातलं, ऑफिसमधलं आणि परत घरी परतल्यानंतर... गेला तिचा दिवस. तिच्याकडे तिच्यासाठी वेळ आहेच कुठे? काही जवळची माणसं सल्ले देतात.. नवऱ्यासोबत भांडायचं, जबरदस्तीने, हट्टाने त्याच्याकडे बाहेर फिरायला जाण्यासाठी तगादा लावायचा. पण, जिला साधं घरच्या कामातून मोकळीक मिळावी म्हणून सबब देता येत नाही, तिला नवऱ्यासोबत बाहेर जाण्यासाठी भांडता येईल? तिने तिच्यासाठी वेळ काढावा तरी कसा? याने तिचंच आयुष्य कमी नाही का होणार? तिने तिच्यासाठी जगावं तरी कधी? दोन पुस्तकं वाचायची म्हटलं की निवांत बसलेल्या सुनेकडे पाहून सासूला पोटशूळच उठतात. सूनबाई, घरी आहेस तर संध्याकाळी काही चमचमीत नाश्ता करावा की पुस्तक घेऊन बसावं? झालं, प्रश्नाचं सरबत्ती सुरु. जिची सुट्टीच्या दिवशी आंघोळच संध्याकाळी होते, तिने आणखी करावं तरी काय? त्यात रविवार सुट्टीचा दिवस म्हटलं की पाहुणे आलेच. मग झालं.. रात्री 12 काय नी 1 काय.. झोपेचं खोबरं झालेलं असणार आणि 5 तासाने पुन्हा आठवड्याचा पहिला दिवस सुरु होणार. लग्न झालेल्या महिलांमध्ये 100 पैकी 90 महिलांची तरी हिच व्यथा.. काही महिलांना NO म्हणता येतं, काहींना म्हणता येत नाही. ज्यांना NO म्हणता येत नाही त्यांची ही स्थिती. आज महिलांनी नोकरी करणं म्हणजे महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल वैगरे काही म्हणू नये. घर चालवण्यासाठी नवरा बायकोचं काम करत राहणं गरजेचं आहे. जेणेकरुन बचत, घराचं लोन, मुलांचा खर्च, मेडिकल खर्च निघत राहावा. गाडी के दोनों पैये चलते रहने चाहिए.. असं वक्तव्य आपण सर्रास ऐकतो. मात्र यात तिची ओढाताण होते, हे समजून कोण घेणार? ती काहीही न बोलता, घरासाठी आपलाही हातभार लागावा, नवऱ्यावर जास्त ताण पडू नये म्हणून स्वतःसाठी जगणंच विसरुन जाते. जेव्हा रिटायरमेंटची वेळ येते, तेव्हा तिला कळतं की स्वतःसाठी जगलोच नाही. चला आता रिटायरमेंटच्या पैशातला एका भाग वापरुन फिरुन येऊ. यातही फक्त ती नसते, तर ती, तिचा नवरा, मुलंही असतात. तिचं आयुष्य सर्वांसाठी मात्र तिचा स्वतःसाठी वेळच कुठे?

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget