एक्स्प्लोर

Raju Shetti : भाजपच्या 'या' तीन प्रभावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच सरकार पाडण्याच्या उलथापालथी, पाहा काय म्हणाले राजू शेट्टी 

महाराष्ट्रामधील राजकीय अस्थिरतेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी भाष्य केलं आहे. यावेळी शेट्टी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Raju Shetti on Bjp : सध्या महाराष्ट्र सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रामधील राजकीय अस्थिरतेवरुन शेट्टी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपकडं असलेल्या ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या तीन अतिशय प्रभावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच राज्य सरकार पाडण्याच्या उलथापालथी होत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. भाजप ज्या पद्धतीनं पाशवी वृत्ती दाखवून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील महाविकास आघाडीचे सरकार पाडतेय हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक असल्याचं शेट्टी म्हणाले.

उद्या भाजपवरसुद्धा असी वेळ येईल

ज्या पक्षाचे नाव घेऊन निवडून येतात आणि नंतर त्या पक्षालाच विसरतात. ही प्रवृत्ती वेगानं वाढत आहे. देशामध्ये या वृत्तीला प्रस्थापित राज्यकर्ते खतपाणी घालतात हे दुर्दैव असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. आज उद्या भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षावरसुद्धा  अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही,  तेव्हा काळाची पावले ओळखा असेही शेट्टी यावर म्हणाले. एखादा पक्ष किंवा संघटना उभा करण्यासाठी किती कष्ट करावे लागते हे ज्याचं त्यालाच माहित आहे. अशा पद्धतीनं एखाद्या पक्षाची वाताहत होतेय त्यामुळं वाईट वाटत असल्याचे शेट्टी म्हणाले. 

हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार संकटात सापडलं आहे. या सर्वामागे भाजप असल्याचं बोललं जात आहे. याच मुद्यावरुन राजू शेट्टी यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपकडं असलेल्या ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या तीन अतिशय प्रभावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच राज्य सरकार पाडण्याच्या उलथापालथी होत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. भाजप ज्या पद्धतीनं पाशवी वृत्ती दाखवून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील महाविकास आघाडीचे सरकार पाडतेय हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक असल्याचं शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही. कारण आम्ही दोन महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेलं नाही हे स्पष्ट झालं असल्याचे देखील शेट्टी म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार संकटात 

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. जवळपास 40 हून अधिक आमदारांसोबत शिंदे हे आसाममधील गुवाहटी या ठिकाणी आहेत. गटनेतेपदी आपणच आहोत हे सांगण्यासाठी शिंदे गटाकडून प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर 37 शिवसेना आमदारांच्या सह्या आहेत. मागील दोन दिवसात दुसऱ्यांदा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. बुधवारी पाठवलेल्या प्रस्तावात 34 आमदारांच्या सह्या होत्या. त्यात नितीन देशमुख यांच्या सही बाबत वाद होता. आता नव्याने 37 आमदारांच्या सह्याचं पत्र पाठवण्यात आले आहे. त्याशिवाय 9 अपक्ष आमदार सोबत असल्याचा देखील दावा केला जात आहे. हे पत्र विधानसभा सचिव, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळं राज्य सरकार संकटात सापडलं आहे. त्यामुळं आता पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीत 150 लोक मरण पावलेत, संजय राऊतांचा खळबळजनक दावा, PM मोदींसह रेल्वेमंत्र्यांवर निशाणा 
नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीत 150 लोक मरण पावलेत, संजय राऊतांचा खळबळजनक दावा, PM मोदींसह रेल्वेमंत्र्यांवर निशाणा 
F 35 Fighter Jet : एलाॅन मस्क ज्याला 'कचरा' म्हणाले तेच F-35 फायटर जेट अमेरिका भारताला का विकू इच्छिते? जगातील सर्वात महागडे, तरीही 5 वर्षांत 9 वेळा क्रॅश!
एलाॅन मस्क ज्याला 'कचरा' म्हणाले तेच F-35 फायटर जेट अमेरिका भारताला का विकू इच्छिते? जगातील सर्वात महागडे, तरीही 5 वर्षांत 9 वेळा क्रॅश!
Baban Gitte : बापू आंधळे प्रकरणात मोठी अपडेट, फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर येणार टाच, पोलिसांकडून हालचालींना वेग
बापू आंधळे प्रकरणात मोठी अपडेट, फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर येणार टाच, पोलिसांकडून हालचालींना वेग
Indian immigrants : अमेरिकेतून बळजबरीने आणखी 116 भारतीय हद्दपार; पुरुषांना पुन्हा साखळदंडात डांबले, बहुतांश 18 ते 30 वयोगटातील, तिसरी तुकडी आज येणार
अमेरिकेतून बळजबरीने आणखी 116 भारतीय हद्दपार; पुरुषांना पुन्हा साखळदंडात डांबले, बहुतांश 18 ते 30 वयोगटातील, तिसरी तुकडी आज येणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

New Delhi Railway Station Stampede : प्रयागराजला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी धडपड,चेंगराचेंगरीची दृश्यABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 16 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सDelhi Railway Station Stampede Updates : नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी, जबाबदार कोण?Delhi Railway Station : नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी, प्रत्यक्षदर्शींनी सांगितली थरारक घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीत 150 लोक मरण पावलेत, संजय राऊतांचा खळबळजनक दावा, PM मोदींसह रेल्वेमंत्र्यांवर निशाणा 
नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीत 150 लोक मरण पावलेत, संजय राऊतांचा खळबळजनक दावा, PM मोदींसह रेल्वेमंत्र्यांवर निशाणा 
F 35 Fighter Jet : एलाॅन मस्क ज्याला 'कचरा' म्हणाले तेच F-35 फायटर जेट अमेरिका भारताला का विकू इच्छिते? जगातील सर्वात महागडे, तरीही 5 वर्षांत 9 वेळा क्रॅश!
एलाॅन मस्क ज्याला 'कचरा' म्हणाले तेच F-35 फायटर जेट अमेरिका भारताला का विकू इच्छिते? जगातील सर्वात महागडे, तरीही 5 वर्षांत 9 वेळा क्रॅश!
Baban Gitte : बापू आंधळे प्रकरणात मोठी अपडेट, फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर येणार टाच, पोलिसांकडून हालचालींना वेग
बापू आंधळे प्रकरणात मोठी अपडेट, फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर येणार टाच, पोलिसांकडून हालचालींना वेग
Indian immigrants : अमेरिकेतून बळजबरीने आणखी 116 भारतीय हद्दपार; पुरुषांना पुन्हा साखळदंडात डांबले, बहुतांश 18 ते 30 वयोगटातील, तिसरी तुकडी आज येणार
अमेरिकेतून बळजबरीने आणखी 116 भारतीय हद्दपार; पुरुषांना पुन्हा साखळदंडात डांबले, बहुतांश 18 ते 30 वयोगटातील, तिसरी तुकडी आज येणार
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी अन् अग्नितांडवाचा कलंक सुरुच; 28 दिवसांत चौथ्यांदा आगीचे रौद्ररुप, तंबू जळाले, नोटांच्या दोन बॅगा जळून खाक
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी अन् अग्नितांडवाचा कलंक सुरुच; 28 दिवसांत चौथ्यांदा आगीचे रौद्ररुप, तंबू जळाले, नोटांच्या दोन बॅगा जळून खाक
धस-मुंडे भेट टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले, म्हणाले, राष्ट्रवादीचं महत्त्व...
धस-मुंडे भेट टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले, म्हणाले, राष्ट्रवादीचं महत्त्व...
Who Is Responsible For Delhi Railway Accident: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.