एक्स्प्लोर

29 December In History : राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसचा ऐतिहासिक विजय, हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार राजेश खन्नाचा जन्मदिन; आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं...

On This Day In History : आज इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती. आजच्याच दिवशी राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर आजच्याच दिवशी हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna Birth Anniversary) यांचा जन्मदिन आहे.

On This Day In History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 29 डिसेंबर रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर आजच्याच दिवशी हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna Birth Anniversary) यांचा जन्मदिन आहे. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

1530: हुमायून मुघल साम्राज्याचा बादशाह झाला  (Humayun)

बाबरच्या 4 मुलांपैकी हुमायून सर्वात मोठा होता (हुमायुन, कामरान, अस्करी आणि हिंदल). हुमायूनचा जन्म 1508 मध्ये काबूल येथे झाला. त्याने बाबरला अनेक युद्धांमध्ये मदत केली होती. बाबरच्या मृत्यूनंतर 1530 मध्ये हुमायून बादशाह झाला.

1844: कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बनर्जी यांची जयंती  

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बनर्जी यांची आज जयंती आहे. व्योमकेशचंद्र बॅनर्जी यांचा जन्म 29 डिसेंबर 1844 रोजी बंगालमध्ये झाला. व्योमकेशचंद्र बॅनर्जी यांनी 1865 मध्ये दादाभाई नौरोजींनी स्थापन केलेल्या लंडन इंडियन सोसायटीचे सरचिटणीस म्हणून पदभार स्वीकारला. 1885 मध्ये वयाच्या 42 व्या वर्षी तत्कालीन मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात व्योमेशचंद्र बॅनर्जी काँग्रेसचे पहिले अध्यक्ष बनले. 

1930: मोहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला. (Muhammad Iqbal)

मोहम्मद इकबाल उर्फ अल्लामा इक्बाल हे उर्दू भाषेतील नामवंत कवी होते. तसेच भारत व पाकिस्तान मधील महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. आजच्याच दिवशी त्यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला.

1900: दिनानाथ मंगेशकर यांची जयंती (Deenanath Mangeshkar)

दीनानाथ गणेश मंगेशकर (Deenanath Mangeshkar) हे मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते. ते सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar), आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांचे वडील होते. आज त्यांची जयंती आहे. गोव्यात त्यांचा जन्म झाला. 1914 मध्ये बालगंधर्वांनी स्वतःची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. 1915 मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. त्यांनी अनेक ताकातून काम केलं होत. दीनानाथ मंगेशकर यांचे वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी 24 एप्रिल 1942 रोजी पुण्यात बुधवार पेठेत असलेल्या कस्तुरे वाड्यात निधन झाले.

1917: निर्माते-दिगदर्शक रामानंद सागर यांचा जन्मदिन (Ramanand Sagar)

रामायण आणि महाभारत सारखे ऐतिहासिक शो तयार करणारे दिग्दर्शक रामानंद सागर (Ramanand Sagar) यांचा आज जन्मदिन आहे. रामानंद सागर यांचा जन्म 29 डिसेंबर 1917 ला लाहोर येथे झाला. जन्माच्या वेळी त्यांचे नाव चंद्रमौली चोप्रा होते. त्यांचे आजोबा पेशावरहून आले आणि कुटुंबासह काश्मीरमध्ये स्थायिक झाले. हळूहळू ते नगरचे नगरसेठ झाले. रामानंद 5 वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. रामानंद सागर यांना त्यांच्या मामाने अगदी लहान वयातच दत्तक घेतले होते. येथे त्यांचे नाव चंद्रमौलीवरून बदलून रामानंद सागर असे करण्यात आले. क्लॅपर बॉय म्हणून त्याने चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी पृथ्वी थिएटर्समध्ये सहाय्यक स्टेज मॅनेजर म्हणून काम केले. राज कपूरच्या बरसात या चित्रपटाची कथा आणि पटकथा रामानंद सागर यांनी लिहिली होती. 1968 मध्ये आंखे चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. 1987 मध्ये चित्रपटांव्यतिरिक्त रामानंद यांनी रामायणाची निर्मिती केली. 

1942: सुपरस्टार राजेश खन्ना यांची जयंती (Rajesh Khanna Birthday Anniversary)

भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हटल्या जाणार्‍या राजेश खन्ना यांची आज जयंती आहे. राजेश खन्ना यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 रोजी अमृतसर येथे झाला. ते काकांच्या नावानेही प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये आनंद, अमर प्रेम, आराधना, कटी पतंग, 'सफर' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. राजेश खन्ना यांनी 1966 मध्ये आलेल्या आखरी खत या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. भारतातून पहिल्यांदाच ऑस्करसाठी गेलेला हा चित्रपट त्यावेळी फ्लॉप ठरला होता. राजेश खन्ना हे 1970 ते 1987 पर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. राजेश खन्ना हे त्यांचे बदलले नाव आहे. काकांच्या सांगण्यावरून जतिन खन्ना यांनी आपले नाव बदलून राजेश खन्ना ठेवले. राजेश खन्ना यांना बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हटले जाते. तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत राजेश खन्ना यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले. एकाच वेळी 15 हिट चित्रपट देण्याचा विक्रमही राजेश खन्नाच्या नावावर आहे. आजही हा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. 

1974: अभिनेत्री ट्विंकल खन्ना हीच जन्मदिन (Twinkle Khanna Birthday)

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna Birthday) हिचा आज वाढदिवस आहे. ट्विंकलचा 29 डिसेंबर रोजी जन्म झाला आणि ट्विंकलने बरसात या चित्रपटातून तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. या चित्रपटानंतर ती जान, जुल्मी, बादशाह, इंटरनॅशनल खिलाडी अशा अनेक चित्रपटात दिसली पण तिला यश मिळू शकले नाही. चित्रपटांमध्ये अपयशी ठरल्यानंतर ट्विंकलने बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारसोबत लग्न केले आणि आता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना बॉलिवूडचे परफेक्ट कपल म्हटले जाते. आता ट्विंकल चित्रपटांपासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर सक्रिय राहते आणि तिचे विचार तिच्या पोस्टद्वारे शेअर करते.

1971: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांची पुण्यतिथी 

भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाडहे भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते. गायकवाड आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते. तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार), लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य (खासदार) म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे.

1984: राजीव गांधींच्या (Rajiv Gandhi) नेतृत्वाखाली काँग्रेसने स्वतंत्र भारताच्या संसदीय निवडणुकांच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला

1984 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजेच 29 डिसेंबरला काँग्रेसने (Congress) लोकसभेच्या 508 पैकी 401 जागा जिंकून विक्रम केला होता. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मुद्द्यावर काँग्रेसने ही निवडणूक लढवली होती. पण सहानुभूतीच्या लाटेवर ते निवडणून आले, असं ही म्हटलं जातं. 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या हत्येनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली होती आणि दोन महिन्यांनी निवडणुका झाल्या तेव्हा देशातील जनतेने काँग्रेसला भरभरून मतदान केले. त्यावेळी पक्षाचे नेतृत्व राजीव गांधी (Rajiv Gandhi) हे करत होते. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसलेRavindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होतीAditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपSpecial Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget