एक्स्प्लोर

Karan Johar : बॉलिवूडमध्ये फक्त 10 अभिनेते कामाचे, तेही चंद्र-तारे मागतायत; फिल्म इंडस्ट्रीतील वाईट परिस्थितीवर करण जोहरने मौन सोडलं

Karan Johar On Bollywood Crisis : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने बॉलिवूडमधील वाईट परिस्थितीवर मौन सोडलं आहे.

मुंबई  : बॉलिवूडच्या (Bollywood) गेल्या काही वर्षांपासून घरघर लागली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. अनेक दिग्गज सुपरस्टार्सचे चित्रपट फ्लॉप ठरताना पाहायला मिळत आहेत. त्याशिवाय सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेटमध्ये झालेली वाढ पाहता प्रेक्षक चित्रपटगृहात जाणं टाळतात किंवा अगदी बोटावर मोजण्याइतके चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहतात. बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने बॉलिवूडमधील वाईट परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

फिल्म इंडस्ट्रीतील वाईट परिस्थितीवर करण जोहरचं भाष्य

गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडच्या सुपरस्टार्सचे बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडताना पाहायला मिळत आहे. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान अक्षय कुमार यासारख्या बड्या अभिनेत्यांचा समावेश आहे. या प्रकरणावर चित्रपट निर्माता करण जोहरने (Karan Johar) उघडपणे बोलले आहे. इंडस्ट्रीत मोजकेच चांगले कलाकार आहेत, असे त्याने म्हटले आहे. याशिवाय आता प्रेक्षकांची चवही बदलली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

'बॉलिवूडमध्ये फक्त 10 अभिनेते कामाचे, तेही चंद्र-तारे मागतायत'

करण जोहरने फेय डिसूझाच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हिंदी चित्रपटांच्या वाईट स्थितीवर आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'सर्वप्रथम म्हणजे प्रेक्षकांची आवड खूपच मर्यादित झाली आहे. त्यांना विशिष्ट प्रकारचा सिनेमा हवा आहे आणि जर तुम्हाला त्या मर्यादेत काम करायचं असेल, तर तुमचा चित्रपट A, B आणि C केंद्रावर आधारित सादर करावा लागेल. त्यासाठी फक्त मल्टिप्लेक्स पुरेशे नाहीत.

फक्त 10 कलाकार कामाचे आहेत आणि तेही...

करण जोहरने चित्रपटांचं वाढतं बजेट आणि स्टार्सच्या मागण्यांबाबत मत व्यक्त करताना म्हटलं की, चित्रपट निर्मितीचं बजेट वाढलं आहे, महागाई वाढली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत जेमतेम 10 उपयुक्त कलाकार आहेत आणि तेही सूर्य, चंद्र आणि पृथ्वीची मागणी करत आहेत. एकतर, तुम्ही त्यांना पैसे देणार, मग तुम्ही चित्रपटासाठी पैसे देणार आणि मग मार्केटिंगचा खर्च येतो आणि मग तुमचा चित्रपट चांगला कमाई करत नाही, असंही त्याने सांगितलं.

कलाकारांच्या मानधनावर प्रतिक्रिया

करण जोहर पुढे म्हणाला की, जे कलाकार 35 कोटी रुपये मागत आहेत ते 3.5 कोटी रुपयांनी ओपनिंग करत आहेत. हे गणित कसे चालणार? तुम्ही हे सर्व कसे मॅनेज करु शकाल? प्रत्येक दशकात वेगळ्या प्रकारची पद्धत पाहायला मिळत आहे. इंडस्ट्रीला अजूनही हे समजू शकलेलं नाही की, आता प्रेक्षकांना भारतीय सिनेमा त्याच्या मुळाशी जोडलेला आणि शुद्ध मनोरंजन हवं आहे.

जवान, पठाण चित्रपटाबद्दल काय म्हणाला करण?

करण जोहर म्हणाला, 'सध्या आमची अशी स्थिती आहे की जर जवान आणि पठाण चित्रपट चालले, मग  आम्ही फक्त ॲक्शन चित्रपट करायचे का? मग सगळे त्याच्याच मागे धावत असतात. मग अचानक एक लव्ह स्टोरी चालेल. मला असं वाटतं की, आपण डोकं नसलेल्या कोंबड्यांसारखे पळत आहोत. लोकांना खात्री नाही आणि सर्वांची झुंड मानसिकता झाली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा

महत्त्वाच्या बातम्या

Preity Zinta On CJP Student Protest: प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
Kangana Ranaut on Rahul Gandhi Protest At PM Modi Residence: पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
Shreyas Talpade Kajal Aggarwal Meet Tukaram Mundhe: 'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
Actor Saurabh Gokhale Opposed Student Protest: जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'
जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget