एक्स्प्लोर

Ajit Pawar: शरद पवारांकडून कामाचं कौतुक; अजित पवार म्हणाले, "कौतुक चांगलं वाटतंय पण..."

Ajit Pawar: 30 वर्षे अजित पवारांनी कामं केली. माझ्या मनात त्यांच्याबद्दल त्या संदर्भात कुठली ही तक्रार नाही, असं शरद पवारांनी म्हटलं होतं त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरूध्द पवार अशी निवडणूक झाली. त्यानंतर आता विधानसभेला देखील पवार विरूध्द पवार अशी लढत होणार आहे. या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य केलं. '30 वर्षे अजित पवारांनी कामं केली. माझ्या मनात त्यांच्याबद्दल त्या संदर्भात कुठली ही तक्रार नाही', असं शरद पवारांनी शिर्सुफळमध्ये प्रचाराची सभा घेताना म्हटलं, त्यावर अजित पवारांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द झाला, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अजित पवार मिश्किलपणे हसत म्हणाले, "चांगलं वाटतंय", त्याचबरोबर आता नवीन पिढीला संधी दिली पाहिजे या शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, "ते चांगलं नाही वाटतं". 

साहेबांनी कौतुक केलं ते चांगले वाटतं. साहेब पुढचं नवीन पिढीला संधी द्या म्हणाले ते चांगलं नाही वाटतं. आता मी काय म्हातारा दिसायला लागलो आहे का? पाहिजे ते करायला तयार आहे. नाही केलं तर पवारांंचं नाव सांगणार नाही असंही पुढे हसत अजित पवार म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?

'30 वर्षे अजित पवारांनी कामं केली. माझ्या मनात त्यांच्याबद्दल त्या संदर्भात कुठली ही तक्रार नाही.', असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मी 30 वर्षांपूर्वी लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतला. कारण, 30-35 वर्षे सतत निवडून गेल्यानंतर नवी पिढी तयार करण्याची गरज असते. त्यानुसार मी इथली सर्व जबाबदारी अजित पवारांकडे सोपवली. मागील 25-30 वर्षांपासून ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. पहिली 30 वर्षे माझ्यावर आणि त्यानंतरची 30 वर्षे अजित पवारांवर. आता पुढल्या 30 वर्षांची व्यवस्था करण्याची गरज आहे. ती करायची असेल तर लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यात लक्ष घालण्याची दृष्टी हवी', असे म्हणत शरद पवारांनी म्हटलं होतं.

अजित पवारांचा जाहीरनामा प्रसिध्द

जाहीरनाम्यात काय आहे?

लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजर नाही तर तबल 2100 रुपये देण्यात येणार आहे.

सोबत महिला सुरक्षेसाठी  25 हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे

धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजर रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या एम.एस.पी वरती 20% अनुदान देण्याचा वादा अजित दादांच्या पक्षाकडून करण्यात आलेला आहे.

वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे. 

वृद्ध पेन्शन धारकांना आता पंधराशे वरुण महिन्याला 2100 रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे. 

दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा करण्यात आलेला आहे. 

25 लाख रोजगार निर्मितीचा वादा देखील केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Telangana Tunnel Accident : तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
Old kasara Ghat : मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
Jitendra Awhad : त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
Bacchu Kadu: ...तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
....तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare :'डॉ. Neelam Gorhe मातोश्रीवर पडीक असायच्या, सर्वात जास्त कमाई त्यांनीच केली असावी'Ambadas Danve On Neelam Gorhe : ही नीलम गोऱ्हेंची नमकहरामी, आरोपानंतर दानवेंची सडकून टीकाNeelam Gorhe on Uddhav Thackeray : दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्या की एक पद, गोऱ्हेंचा ठाकरेंवर आरोप!Budget Session : 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 10 मार्चला अजित पवार मांडणार अर्थसंकल्प

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Telangana Tunnel Accident : तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
Old kasara Ghat : मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
Jitendra Awhad : त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
Bacchu Kadu: ...तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
....तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
Nashik Crime : सोनाराच्या दुकानात तिघांकडून दिवसाढवळ्या दरोडा, टोळीचा म्होरक्या हरियाणात लपल्याची टीप, नाशिक पोलिसांचे पथक पोहोचले अन्...
सोनाराच्या दुकानात तिघांकडून दिवसाढवळ्या दरोडा, टोळीचा म्होरक्या हरियाणात लपल्याची टीप, नाशिक पोलिसांचे पथक पोहोचले अन्...
Shashi Tharoor on Congress : जिथं अज्ञानात आनंद मिळतो, तिथं शहाणपणा दाखवणं मूर्खपणाचं लक्षण! काँग्रेस आणि शशी थरुरांमध्ये चाललंय तरी काय?
जिथं अज्ञानात आनंद मिळतो, तिथं शहाणपणा दाखवणं मूर्खपणाचं लक्षण! काँग्रेस आणि शशी थरुरांमध्ये चाललंय तरी काय?
Jitendra Awhad : सुनील केदार, राहुल गांधींना एक न्याय, सत्ताधारी माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का? जितेंद्र आव्हाड आक्रमक
सुनील केदार, राहुल गांधींना एक न्याय, सत्ताधारी माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का? जितेंद्र आव्हाड आक्रमक
National Education Policy : काल कमल हसन म्हणाले, लोकांनी तमिळ भाषेसाठी लोकांनी जीव दिलाय, खेळ करू नका; आता सीएम स्टॅलिन म्हणाले, 'केंद्र सरकारने 10 हजार कोटी दिले तरी...'
काल कमल हसन म्हणाले, लोकांनी तमिळ भाषेसाठी लोकांनी जीव दिलाय, खेळ करू नका; आता सीएम स्टॅलिन म्हणाले, 'केंद्र सरकारने 10 हजार कोटी दिले तरी...'
Embed widget