एक्स्प्लोर

Sharad Pawar vs Ajit Pawar : मुख्यमंत्रिपदावरुन पवार काका-पुतण्यामध्ये जुंपली, 2004 मध्ये नेमकं काय घडलं होतं?

Sharad Pawar and Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जुलै 2023 मध्ये भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत.

Sharad Pawar and Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जुलै 2023 मध्ये भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांत जास्त जागा येऊनही शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला नाही. नाहीतर 2004 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता, अस आरोप अजित पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल आणि मंत्री छगन भुजबळ यांनी देखील केला आहे. दरम्यान, आज मुंबई येथील बैठकीत अजित पवारांनी शरद पवार खोटं बोलत असल्याचं म्हणत आक्रमक भाषण केलं. 2004 मध्ये महाराष्ट्रात काय घडलं? कोणाच्या किती जागा आल्या जाणून घेऊयात... 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या 

सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा काढल्यानंतर शरद पवारांची 1999 मध्ये काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर शरद पवारांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर हे देखील राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यापैकी एक होते. दरम्यान, शरद पवारांनी नवा पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांच्या पदारात यशही पडू लागलं होतं. शरद पवार पक्षातून बाहेर पडले, मात्र त्यानंतरही त्यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार दिला नाही 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील ,आर.आर. पाटील अशी दिग्गज नेते मंडळी शरद पवारांसोबत होती. राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी जोरदार प्रचार केला आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या 71 जागा निवडून आणल्या. तर काँग्रेस पक्षाच्या 69 जागा निवडून आल्या. त्यामुळे सर्वाधिक जागा निवडून आल्याने शरद पवार मुख्यमंत्रिपद आपल्याकडे खेचून घेतील, असंही बोलले गेलं. मात्र, तसं काही घडलं नाही. राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळूनही मुख्यमंत्रिपदाची माळ विलासराव देशमुख यांच्या गळ्यात पडली. शरद पवारांनी मुख्यमंत्रिपद सोडलं. मात्र, राज्याच्या मंत्रिमंडळातील इतर महत्वाची खाती आपल्याकडे खेचून घेतली. त्यानंतर आजवर सातत्याने शरद पवारांना मुख्यमंत्रिपद का सोडलं? याबाबत सवाल विचारण्यात आले आहेत. 

भाजप आणि शिवसेनेला किती जागा ? 

महाराष्ट्रात 2004 च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या 62 जागा निवडून आल्या. तर भाजपच्या 54 जागा निवडून आल्या होत्या. शिवसेनेच्या मतांची टक्केवारी 20 होती तर भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी 13 इतकी होती. त्यामुळे सेना-भाजप युतीला सत्तेपासून दूर राहावं लागणार होतं. 

शरद पवार मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले?

2004 मध्ये मुख्यमंत्रि‍पदाबाबत निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा प्रश्न नव्हता. कारण ते फारच नवखे होते. तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती, असं शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं. 

अजित पवार मुंबईतील भाषणात काय काय म्हणाले? 

शरद पवार यांनी 2004 बाबत जे सांगितलं ते धादांत खोट आहे. मला त्यावेळी वाटत होतं की, भुजबळ मुख्यमंत्री होतील. त्यावेळी मी मुख्यमंत्री होण्यासाठी इंटरेस्टड नव्हतो. आपल्याला 2004 साली मुख्यमंत्रिपदाची संधी होती. आता आपले वरिष्ठ जे सांगत आहेत की त्यावेळी काहीजण नवे होते. तसं काही नव्हतं. 1991 साली शरद पवार यांना संरक्षण मंत्री व्हाव लागलं. त्यावेळी पद्मसिंह पाटील मुख्यमंत्रिपदासाठी नाव देण्यात आलं होतं.  माञ मध्येच सुधाकरराव नाईक यांचं नाव देण्यात आलं. त्यावेळी शरद पवार यांचं एक वर्ष सुधाकरराव नाईक यांनी ऐकलं नाही.  2004 साली प्रफुल पटेल आणि शरद पवार यांना वाटलं असेल की आपलं आधीच कोणी ऐकलं नव्हतं त्यामुळं आता पुन्हा मुख्यमंत्री केलं तर आपलं कोण ऐकणार नाही, असं काहीतरी असेल, असं अजित पवार आज बोलताना म्हणाले आहेत.  

इतर महत्वाच्या बातमी 

Ajit Pawar : शरद पवार खोटं बोलत आहेत, तेव्हा कुणीच नवखं, अनुभवी नव्हतं; अजित पवारांचा काकांवर गंभीर आरोप

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Champions Trophy : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Dhananjay Munde :  धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; सुरेश धसांकडून मागणीCity 60 : सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 20 Feb 2025 ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 20 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas PC : बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Champions Trophy : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'किंग कोहली'ची पोलखोल, कोणाला नाही कळलं पण सलग 5 सामन्यात 5 वेळा घडलं
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा 
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
'तो' माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो, पदाला हापापलेला; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
'तो' माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो, पदाला हापापलेला; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
महाराष्ट्र चक्रावेल असा घोटाळा, बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं
महाराष्ट्र चक्रावेल असा घोटाळा, बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं
India Vs Pakistan : तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
Embed widget