एक्स्प्लोर

Sharad Pawar vs Ajit Pawar : मुख्यमंत्रिपदावरुन पवार काका-पुतण्यामध्ये जुंपली, 2004 मध्ये नेमकं काय घडलं होतं?

Sharad Pawar and Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जुलै 2023 मध्ये भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत.

Sharad Pawar and Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जुलै 2023 मध्ये भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांत जास्त जागा येऊनही शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला नाही. नाहीतर 2004 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता, अस आरोप अजित पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल आणि मंत्री छगन भुजबळ यांनी देखील केला आहे. दरम्यान, आज मुंबई येथील बैठकीत अजित पवारांनी शरद पवार खोटं बोलत असल्याचं म्हणत आक्रमक भाषण केलं. 2004 मध्ये महाराष्ट्रात काय घडलं? कोणाच्या किती जागा आल्या जाणून घेऊयात... 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या 

सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा काढल्यानंतर शरद पवारांची 1999 मध्ये काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर शरद पवारांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर हे देखील राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यापैकी एक होते. दरम्यान, शरद पवारांनी नवा पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांच्या पदारात यशही पडू लागलं होतं. शरद पवार पक्षातून बाहेर पडले, मात्र त्यानंतरही त्यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार दिला नाही 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील ,आर.आर. पाटील अशी दिग्गज नेते मंडळी शरद पवारांसोबत होती. राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी जोरदार प्रचार केला आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या 71 जागा निवडून आणल्या. तर काँग्रेस पक्षाच्या 69 जागा निवडून आल्या. त्यामुळे सर्वाधिक जागा निवडून आल्याने शरद पवार मुख्यमंत्रिपद आपल्याकडे खेचून घेतील, असंही बोलले गेलं. मात्र, तसं काही घडलं नाही. राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळूनही मुख्यमंत्रिपदाची माळ विलासराव देशमुख यांच्या गळ्यात पडली. शरद पवारांनी मुख्यमंत्रिपद सोडलं. मात्र, राज्याच्या मंत्रिमंडळातील इतर महत्वाची खाती आपल्याकडे खेचून घेतली. त्यानंतर आजवर सातत्याने शरद पवारांना मुख्यमंत्रिपद का सोडलं? याबाबत सवाल विचारण्यात आले आहेत. 

भाजप आणि शिवसेनेला किती जागा ? 

महाराष्ट्रात 2004 च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या 62 जागा निवडून आल्या. तर भाजपच्या 54 जागा निवडून आल्या होत्या. शिवसेनेच्या मतांची टक्केवारी 20 होती तर भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी 13 इतकी होती. त्यामुळे सेना-भाजप युतीला सत्तेपासून दूर राहावं लागणार होतं. 

शरद पवार मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले?

2004 मध्ये मुख्यमंत्रि‍पदाबाबत निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा प्रश्न नव्हता. कारण ते फारच नवखे होते. तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती, असं शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं. 

अजित पवार मुंबईतील भाषणात काय काय म्हणाले? 

शरद पवार यांनी 2004 बाबत जे सांगितलं ते धादांत खोट आहे. मला त्यावेळी वाटत होतं की, भुजबळ मुख्यमंत्री होतील. त्यावेळी मी मुख्यमंत्री होण्यासाठी इंटरेस्टड नव्हतो. आपल्याला 2004 साली मुख्यमंत्रिपदाची संधी होती. आता आपले वरिष्ठ जे सांगत आहेत की त्यावेळी काहीजण नवे होते. तसं काही नव्हतं. 1991 साली शरद पवार यांना संरक्षण मंत्री व्हाव लागलं. त्यावेळी पद्मसिंह पाटील मुख्यमंत्रिपदासाठी नाव देण्यात आलं होतं.  माञ मध्येच सुधाकरराव नाईक यांचं नाव देण्यात आलं. त्यावेळी शरद पवार यांचं एक वर्ष सुधाकरराव नाईक यांनी ऐकलं नाही.  2004 साली प्रफुल पटेल आणि शरद पवार यांना वाटलं असेल की आपलं आधीच कोणी ऐकलं नव्हतं त्यामुळं आता पुन्हा मुख्यमंत्री केलं तर आपलं कोण ऐकणार नाही, असं काहीतरी असेल, असं अजित पवार आज बोलताना म्हणाले आहेत.  

इतर महत्वाच्या बातमी 

Ajit Pawar : शरद पवार खोटं बोलत आहेत, तेव्हा कुणीच नवखं, अनुभवी नव्हतं; अजित पवारांचा काकांवर गंभीर आरोप

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget