एक्स्प्लोर

पाण्यासाठी वन वन भटकणाऱ्या हरणांना वाहनांच्या धडका, महिन्यात 7 हरणांचा मृत्यू

Latur : लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झालं आहे. गावात शेत शिवारात पाणी नसल्यामुळे सर्वसामान्य लातूरकर हैराण आहेत. नदी -नाले आटले आहेत.

Latur : लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झालं आहे. गावात शेत शिवारात पाणी नसल्यामुळे सर्वसामान्य लातूरकर हैराण आहेत. नदी -नाले आटले आहेत. यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी खूप धावपळ करावी लागत आहे. निलंगा तालुक्यातील कलांडी भागात हरणांची मोठी संख्या आहे. पाणी नसल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. यातच काही हरणांनी इतर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यात रस्ता ओलांडताना अनेक हरणांना वाहनांची धडक बसत आहे. या हरणांचा मृत्यूही होत आहे. गेल्या महिनापर्यंत अपघातात सात हरणांनी जीव गमावलाय. 

पाण्यासाठी वन वन भटकताना वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू

लातूर जहीराबाद महामार्गावर कलांडी पाटीजवळ वाहनांच्या धडकेत हरणाचा मृत्यू झाला आहे. या भागात हरणांची मोठी संख्या आहे. वन विभागाने या भागात पाणवटे निर्माण करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी पानवटे आहेत, मात्र त्यात पाणी नसल्याकारणाने वन्यजीवांची पाण्यावाचून तडफड होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकताना वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वाहनाचा धडकेत मृत्युमुखी पडलेल्या हरणाला पशुप्रेमींना रस्त्याच्या बाजूला केलं. वनविभाग पुढील तपास करत आहे. जी परिस्थिती गावात आहे त्यापेक्षा बिकट परिस्थिती शेतशिवारात आहे. काही भागात बोरला पाणी आहे मात्र ते ही दहा ते पंधरा मिनिट आहे. शेतातील गुराढोरांना पाणी कुठून द्यावं हा प्रश्न पशुपालकांसमोर उभा आहे. दोन-तीन किलोमीटर इकडे पाणी असेल तिकडे गुरांना घेऊन जाण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. नरसिंग सौंदडे यांच्याकडून आठ जनावर आहेत. गुरांच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था करताना त्यांना चांगलीच धावपळ करावी लागत आहे. पाणी नसल्याने जनावर विकण्याचा त्यांनी विचार केला मात्र ग्राहक लागत नाही. खाटकाला जनावर विकण्यापेक्षा कसं तरी जगू असा विचार त्यांनी केला आहे.

एक महिन्यात सात हरणांचा मृत्यू

पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या हरणांना आपला प्राण गमवावा लागत आहे. निलंगा रेंज वनाधिकारी संतोष बन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ठीक ठिकाणी पाणवटे निर्माण केले आहेत. काही पाणवठे फुटली आहेत. पॉलिथिन लावून ते नीट करण्यात आले आहेत. मागील एक महिन्यात निलंगा रेंजमध्ये निलंगा शिरूरअनंतपाळ आणि देवणी या तीन तालुक्यात रस्ते अपघातात जवळपास सात हरणांचा मृत्यू झाला आहे. या भागात हरणांची संख्या बेसुमार वाढली आहे. जंगलाचे क्षेत्र अत्यल्प आहे. त्यात शेत शिवारात कुठेही चारा नाही. पाण्याची  सोय जरी केली तरी पोटासाठी ही हरण सातत्याने मार्गक्रमण करत असतात.

इतर महत्वाच्या बातम्या

Bhima Sahakari Sakhar Karkhana : खासदाराच्या कारखान्याने उसाचे बिल थकवले, फायनान्सचा तगादा, हतबल शेतकऱ्याने ट्रॅक्टर विहिरीत ढकलला

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेटSandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारणAnandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'पतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr. Prakash Koyade यांच्याशी गप्पाABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
Pune: पुण्यात कोंबड्यांमुळे GBSची लागण, अजित पवारांची माहिती; मात्र मांसाहार केल्यानेच जीबीएस सिंड्रोमचा आजार होतो का? डॉक्टर म्हणाले...
पुण्यात कोंबड्यांमुळे GBSची लागण, अजित पवारांची माहिती; मात्र मांसाहार केल्यानेच जीबीएस सिंड्रोमचा आजार होतो का? डॉक्टर म्हणाले...
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.