एक्स्प्लोर

Corona Vaccine Policy : लसीकरण धोरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करु नये, केंद्र सरकारचं रात्री उशीरा प्रतिज्ञापत्र

सरकारचं लसीकरण धोरण योग्यच असून ते तज्ञांनी विचार विनिमय करुन बनवलेलं आहे. त्यात दुरुस्तीसाठी फारसा वाव नसल्याचं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात रविवारी रात्री उशीरा दाखल केलंय. केंद्राच्या या लसीकरण धोरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ करु नये असंही केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.

नवी दिल्ली : केंद्र सरकारचं लसीकरण धोरण योग्यच असून ते तज्ञांनी विचार विनिमय करुन बनवलेलं आहे. त्यात दुरुस्तीसाठी फारसा वाव नसल्याचं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात रविवारी रात्री उशीरा दाखल केलंय. केंद्राच्या या लसीकरण धोरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ करु नये असंही केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. कार्यकारी मंडळालाही काही अधिकार घटनेने दिले आहेत, त्यांच्या कामकाजावर आणि निर्णयक्षमतेवर न्यायालयांनी विश्वास ठेवावा अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. थोडक्यात त्यांना या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सरकारी धोरणात ढवळाढवळ करु नये असंच सुचवलं आहे. 

वेगवेगळ्या राज्य सरकारांच्या विनंतीनंतर 18 ते 44 वयोगटातील लोकाच्या लसीकरणाचं धोरण निश्चित करण्यात आलं आणि केंद्राने त्यानुसार लस उत्पादक कंपन्यांना राज्यांसाठी सवलतीचे दर आकारण्याची सूचना केली. देशातल्या सर्व राज्यासाठी ही लस एकाच किमतीत वितरीत करण्यात यावी असे निर्देशही केंद्राने लस उत्पादक कंपन्यांना दिल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.. 

सध्या देशातील कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी वय वर्षे 18 ते 44 आणि वय वर्षे 45 च्या पुढे असे दोन गट आहेत. हे दोन गट या क्षेत्रातील तज्ञांशी सल्लामसलत करुनच निश्चित करण्यात आले आहेत. 

एवढ्या मोठ्या प्रमाणातील जागतिक पातळीवरील महामारीचा सामना करण्यासाठी सरकार अनेक पातळ्यांवर लढत असताना सन्माननीय न्यायव्यवस्थेने त्यात हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ करु नये. असं केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. 

मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला लसींच्या किमतींत एकसूत्रता आणण्याची सूचना केली होती, तसंच वेगवेगळ्या गटांसाठी म्हणजे वयोगट आणि खाजगी तसंच सरकारी हॉस्पिटल आणि राज्य तसंच केंद्र सरकारसाठी आकारण्यात आलेल्या लसींच्या वेगवेगळ्या दरांविषयी विचारणा केली होती. 

न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे केंद्राच्या लसीकरण धोरणाची सुनावणी सुरु असताना, वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या किमती बाबत सर्वोच्च न्यायालयाने हरकत होती आणि या धोरणाचा फेरआढावा घेण्याची सूचना केंद्र सरकारला केली होती. त्यावर केंद्राने ढवळाढवळ न करण्याची आणि त्यासाठी घटनादत्त स्वायत्ततेचीही आठवण करुन देण्यात आली आहे. 

कोविड संदर्भातील एका याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने सोशल मीडियावरील अभिव्यक्ती भयमुक्त ठेवण्याचे निर्देश दिले होते. आपला संताप आणि आक्रोश सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करणाऱ्या काही जणांवर कारवाई झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले होते. 

यामुळे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ भारतीय शासनव्यवस्थेच्या प्रमुख स्तंभ समोरासमोर उभे ठाकलेत कली अशी शंका यावी अशा पद्धतीचं हे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलं. राज्य आणि केंद्रासाठी लसींची किंमत वेगवेगळी असली तरी अनेक राज्य सरकारांनी त्याच्या राज्यातील रहिवाशांना मोफत लस देण्याचं जाहीर केल्यामुळे किमतीचा काहीच भार सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागणार नाही, असंही केंद्राच्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे अतिशय योग्य पद्धतीने आणि आवश्य पण  उत्साहाच्या भरात न्यायव्यवस्थेकडून  काही निर्देश देण्यात आले तर त्यामुळे चुकीचा पायंडा पडेल, त्यामुळे लसीकरणाशी संबंधित सर्वच घटकांना नव्याने धोरण आखताना अनेक विषयांची मांडणी पहिल्यापासून करावी लागेल, त्याचा एकूण लसीकरणाच्या मोहीमेवर दूरगामी परिणाम होईल असंही सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्रातून सांगण्यात आलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

व्हिडीओ

BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Rane vs Rane : मालवणमध्ये 10 जागांवर शिवसेनेचा मोठा विजय Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
Embed widget