एक्स्प्लोर

India China Standoff : भारत आणि चीनमध्ये उद्या कमांडर स्तरावर चर्चा होणार, सीमेवरील तणाव कमी करण्याचा आणखी एक प्रयत्न

भारत आणि चीनमध्ये उद्या होणाऱ्या कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची एकोणिसावी फेरी आहे. या बैठकींद्वारे दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवर सहमती झाली आहे, तर काही मुद्दे अजूनही तणावाचे कारण बनले आहेत.

India-China Standoff : भारत (India) आणि चीनमध्ये (China) सुरु असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी चर्चेचे मार्ग खुले ठेवले आहेत. या अंतर्गत उद्या म्हणजे 14 ऑगस्ट रोजी भारत आणि चीनमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावर चर्चा होणार आहे. यादरम्यान लडाखच्या (Ladakh) पूर्व सीमेवरील कोंडी संपवण्याच्या दिशेने दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

दोन्ही देशांमधील कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची ही एकोणिसावी फेरी आहे. या बैठकींद्वारे दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवर सहमती झाली आहे, तर काही मुद्दे अजूनही तणावाचे कारण बनले आहेत. चुशुल-मोल्डो भागात भारताच्या बाजूने चर्चेची एकोणिसावी फेरी होण्याची शक्यता आहे. उच्च-स्तरीय लष्करी चर्चेच्या एकोणिसाव्या फेरीत, भारत पूर्व लडाखमधील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या देपसांग आणि डेमचोक भागातून सैन्य काढून टाकण्याचा आग्रह धरु शकतो.

आतापर्यंत चर्चेच्या 18 फेऱ्या 

दरम्यान, एप्रिल महिन्यात पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची अठरावी फेरी झाली. त्या बैठकीत भारताचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल रशीम बाली यांनी केले. त्याच दर्जाच्या एका चिनी अधिकाऱ्याने चीनची बाजू मांडली होती. चर्चेमुळे अनेक भागात सैन्याची तैनाती कमी झाली असून लष्करी बफर झोन तयार झाले आहेत. 2020 मध्ये गलवानमध्ये भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर आहेत. चीन सतत आपल्या बाजूने लष्करी पायाभूत सुविधांचा विकास करत आहे, तर भारताच्या बाजूनेही त्याला वेग आला आहे.

चीनवर भारत दबाव टाकणार

ANI ने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, 14 ऑगस्ट रोजी फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल रशीम बाली चिनी लष्कराच्या प्रतिनिधींसोबत चर्चेसाठी भारताचं नेतृत्व करतील. परराष्ट्र मंत्रालय आणि आयटीबीपीचे अधिकारीही चर्चेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही बाजूंनी DBO आणि CNN जंक्शनशी संबंधित मुद्द्यांवर तसेच इतर बाबींवर चर्चा करणे अपेक्षित आहे. भारत पूर्व लडाख आघाडीतून सैन्य मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याची शक्यता आहे.

अनेक भागात तणाव कायम 

चीनने पँगॉन्ग तलावाजवळ विभाग-स्तरीय मुख्यालय बांधलं आहे. हे मुख्यालय गोगरा हॉट स्प्रिंग्सच्या दक्षिणेला आहे. चीनने गलवान खोऱ्यात आपल्या हद्दीत बॅरेकही बांधले आहेत. भारत आणि चीनमध्ये 3488 किलोमीटर लांबीची सीमा आहे. ही सीमा तीन विभागांमध्ये विभागली गेली आहे. ज्यामध्ये पूर्व क्षेत्र, पश्चिम क्षेत्र आणि मध्य क्षेत्र समाविष्ट आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या पाच भारतीय राज्यांच्या सीमा चीनला लागून आहेत. पश्चिम सेक्टरमध्ये जम्मू-काश्मीर, शिनजियांग आणि अक्साई चिनचा सीमावर्ती भाग वादग्रस्त आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Embed widget