Team India Champions Trophy : सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यात 356 धावा केल्या आणि चाहते त्यांच्या कमकुवतपणाबद्दल बोलतात असे क्वचितच घडले असले. पण अहमदाबाद वनडे नंतर अशा गोष्टी घडल्या आहे.

Team India Champions Trophy 2025 : भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यात 356 धावा केल्या आणि चाहते त्यांच्या कमकुवतपणाबद्दल बोलतात असे क्वचितच घडले असले. पण अहमदाबाद वनडे नंतर अशा गोष्टी घडल्या आहे. कारण: या सामन्यात भारताने आपल्या अर्ध्या विकेट फिरकीपटूंना दिल्या. यापैकी आदिल रशीदने एकट्याने चार विकेट घेतल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फिरकी गोलंदाजी समोर भारतीय संघ अडचणी दिसला, त्यामुळे कोच गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाची चिंता वाढू शकते. सर्वांना माहिती आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले जातील, जिथे फिरकीपटूंना भरपूर मदत मिळते.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना अहमदाबादमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 356 धावा केल्या. शुभमन गिल (112) ने शतक झळकावले. विराट कोहली (52) आणि श्रेयस अय्यर (78) यांनी अर्धशतके झळकावून पुनरागमन केले. या तिघांच्या आऊट होण्यात एक साम्य होते. गिल, कोहली आणि अय्यर या तिघांनाही आदिल रशीदने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हार्दिक पांड्याही रशीदचा बळी ठरला.
या सामन्यात विराट कोहलीने 50 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यामुळे विराटने स्वतः आणि चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कारण तो बराच काळ फॉर्मशी झुंजत होता. विराट मोठी इनिंग खेळेल असे वाटत होते पण आदिल रशीदच्या चेंडूवर यष्टीरक्षक फिल सॉल्टने विराटचा कॅच पकडला आणि विराटचा इनिंग संपुष्टात आला. आदिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11व्यांदा विराटला बाद केले आहे. आदिल रशीदने विराटला बाद केल्यावर किंग कोहलीचे टीकाकार लगेच सक्रिय झाले. लेग स्पिनर्सविरुद्ध तो किती कमकुवत आहे हे दाखवण्यासाठी सोशल मीडियावर कोहलीची आकडेवारी शेअर केली जाऊ लागली.
दुसरीकडे, किंग कोहलीला आऊट केल्यानंतर आदिल रशीद त्याच्या पुढच्या शिकारीकडे वळला. त्याने त्याच्या 10 षटकांच्या स्पेलमध्ये शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या यांनाही बाद केले. गिलला गुगलीने फसवले तर पांड्या क्लीन बोल्ड झाला. शेन वॉर्न जे करू शकला नाही, ते आदिल रशीदने करून दाखवले हे आश्चर्य आहे. वॉर्नला भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात कधीही 4 विकेट घेता आल्या नाहीत. भारताविरुद्ध त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 38 धावांत 3 विकेट. रशीदने 10 षटकांत 64 धावा देत 4 विकेट घेतल्या.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

