एक्स्प्लोर

'हातगड्यांचे शहर, ठाणे शहर!', कुणी आणि का केलाय हा आरोप?

एकेकाळी ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून नाव लौकिक होते. मात्र आता याच शहराला हातगाड्याचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ठाणे  : एकेकाळी ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून नाव लौकिक होते. मात्र आता याच शहराला हातगाड्याचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले असल्याचा आरोप सभागृह नेते अशोक वैती यांनी केला. दरम्यान पालिका आयुक्त तसेच, सहाय्यक आयुक्तांकडे  तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याची खंत वैती यांनी व्यक्त करीत या संदर्भात लक्षवेधी मांडली. तसेच,जर प्रशासन या हातगाड्यांवर कारवाई करत नसेल तर आमच्या पद्धतीने हे प्रकरण तडीस लावू असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिल्याने शिवसेनेच्या सत्ताकाळात अनधिकृत कामांचा एकप्रकारे भंडाफोड झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

ठाणे महापालिकेची शुक्रवारची महासभा पादचारी पुलावरून टीका टीपण्णी, प्रश्नोत्तरे यातच पार पडली. अखेरच्या क्षणी शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनाधिकृत बांधकामांवर होत नसलेल्या कारवाईबाबत अशोक वैती यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच,यासंदर्भात लक्षवेधी मांडून शहरातील बजबजपुरीला वाचा फोडली. यासाठी न्यायालयीन निर्देशावरही भाष्य करून सण-उत्सवात पोलीस कारवाई करतात पण रस्तोरस्ती हातगाड्या असताना त्यावर कारवाई का नाही असा सवालही केला.काहीजण यातून वसुलीही करीत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधताना शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांचाही उल्लेख केला.

दरम्यान,वैती यांच्या लक्षवेधीवर शिवसेना नगरसेवकांसह इतर पक्षाच्या नगरसेवकांनी देखील चर्चा केली. हातगाडीवर कारवाई करताना एखाद्या नगरसेवकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा फोन केल्यास ही बाब रेकॉर्डवर आणावी.याला समर्थन असल्याचे भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी सांगितले. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांच्या बाजूला अतिक्रमण विभागाची गाडी असूनही कारवाई होत नाही तर अनेक वेळा केवळ थातुरमातुर कारवाई केली जाते.

ठाणे स्टेशन आणि नौपाडा परिसरात बसणारे फेरीवाले ठाण्याच्या बाहेरचे असल्याचे तसेच,स्थानिक महिलांना व्यवसाय करण्यास प्राधान्य द्यावे.अशी मते भाजपचे नगरसेवक सुनेशी जोशी व प्रतिभा मढवी यांनी मांडताना फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कापूरबावडी परिसरात रस्त्यावरील हातगाड्याकडून हप्ते घेतले जात असल्याचा आरोप करून देवराम भोईर यांनी प्रभाग समितीकडून फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचे म्हटले.तसेच,फेरीवाल्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आग्रही मागणी भोईर यांनी केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
Raigad Crime News : चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सUday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रियाDevendra Fadnavis  : आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
Raigad Crime News : चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
Radhakrishna Vikhe Patil : हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा
हॉटेलमध्ये जे पनीर मिळतं ते दुधापासून नव्हे, तर...; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा
VC Janardan Rao : 500 कोटींच्या संपत्तीचा वाद, तुम्ही वाटणी बरोबर केली नाही म्हणत अमेरिकेत शिकलेल्या नातवाचे चाकूने 86 वर्षीय उद्योजक आजोबांवर तब्बल 70 वार
500 कोटींच्या संपत्तीचा वाद, तुम्ही वाटणी बरोबर केली नाही म्हणत अमेरिकेत शिकलेल्या नातवाचे चाकूने 86 वर्षीय उद्योजक आजोबांवर तब्बल 70 वार
कोल्हापूरसह राज्यात जिल्हा परिषदेत माजी सैनिकांसाठी आरक्षित जागांवर नियमबाह्य भरती; मेडल्स परत करत आंदोलन
कोल्हापूरसह राज्यात जिल्हा परिषदेत माजी सैनिकांसाठी आरक्षित जागांवर नियमबाह्य भरती; मेडल्स परत करत आंदोलन
Embed widget