एक्स्प्लोर

Swatantra Veer Savarkar : सावरकरांना फर्ग्युसनच्या वसतिगृहातून काढून टाकलं, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

सन1905 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांना वसतिगृहाच्या खोलीतून तत्कालीन प्राचार्य रँग्लर परांजपे यांनी का काढून टाकलं होतं? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

Swatantra Veer Savarkar : आज देशभरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 140 वी जयंती साजरी केली जात आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतिगृहात स्वातंत्र्यवीर सावरकर वास्तव्यास होते. सन 1902 ते 1905 या कालावधीत सावरकर या वसतिगृहातील खोली क्रमांक 17 मध्ये वास्तव्यास होते. ती खोली दरवर्षी जयंतीनिमित्त दर्शनासाठी खुली करण्यात येते. या खोलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वापरलेल्या अनेक वस्तूंचं जतन देखील करण्यात आलं आहे. या खोलीचं आणि स्वातंत्र्यवीर सावरकांचं वेगळं नातं होतं. त्याकाळी या खोलीत राहून त्यांनी अनेक काव्यं लिहिली आणि अनेक मोहिमांची किंवा चळवळींची सुरुवात देखील केली आहे. मात्र 1905 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना या खोलीतून महाविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्य रँग्लर परांजपे यांनी का काढून टाकलं होतं? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? याचाच आढावा...

Swatantra Veer Savarkar : शिक्षणासाठी नाशिक ते पुणे प्रवास...

1902 साली शिक्षणासाठी नाशिक शहरातून स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यात आले होते. पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला आणि याच महाविद्यालयात त्यांनी पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. इ.स. 1902 ते इ.स 1905 सालापर्यंत ते फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतीगृहाच्या 17 नंबरच्या खोलीमध्ये राहत होते. या खोलीत वि.म. भट हे त्यांचे सहकारी होते. ते अभिनव भारतपासून त्यांच्यातसोबत होते आणि त्याचे नातेवाईकदेखील होते. भट यांनी सावरकर आणि अभिनव भारत यांच्यावर पुस्तकदेखील लिहिलं आहे. 

Swatantra Veer Savarkar : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर सावरकरांचा मोठा प्रभाव

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यावेळी 'सावरकर कॅम्प' नावाचा त्यांचा गट होता आणि महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी या सावरकर कॅम्पमध्ये सामील झाले होते. या कॅम्पमध्ये अनेक दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. लोकमान्य टिळकांचे सुपुत्र विश्वनाथ पंत टिळक, शि.म. परांजपे यांचे सुपूत्र कृ.शि. परांजपे यांचा समावेश होता. सावरकर हे टिळकांना आणि परांजपे यांना गुरुस्थानी मानायचे, त्यांचे सुपुत्र सावरकर यांच्या कॅम्पमध्ये दाखल झाले होते. त्यांचं प्रभावशाली व्यक्तीमत्व आणि कामाची पद्धत पाहून अनेक विद्यार्थीदेखील यात आनंदाने सहभागी झाले होते. 

Swatantra Veer Savarkar : महाविद्यालयीन जीवन, काव्य लेखन अन् चळवळीला सुरुवात...


फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकर खऱ्या अर्थाने महाविद्यालयीन जीवन जगले. सकाळी 300 जोरबैठकांपासून ते अभ्यास आणि काव्यलेखनदेखील त्यांनी याच महाविद्यालातील खोलीत केलं. महाविद्यालयात असताना अनेक सहकाऱ्यांसोबत सावरकर सिंहगडावर गेले होते. त्यावेळी त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांचा पुतळा बघितला. त्यांचा इतिसाहाचा दांडगा अभ्यास होताच. त्यावेळी त्यांनी सिंहगडावरुन परत आल्यानंतर तानाजी मालुसरे यांच्यावर काव्य रचण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी काव्य न रचता पोवाडा रचला होता. त्यालाच सिंहगडाचा पोवाडा, असं म्हटलं जातं. त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे य़ांचा पोवाडा, प्रसिद्ध 'जयोत्सुते' हे काव्य रचलं.

Swatantra Veer Savarkar : सावकरांना क्रिकेटऐवजी फुटबॉल आवडायचा...

या महाविद्यालयात ज्याप्रमाणे त्यांची काव्य प्रतिभा स्फुरली त्याचप्रमाणे त्यांनी खेळांनादेखील प्राधान्य दिलं होतं. रोज व्यायाम आणि पुण्यातील टेकड्या फिरणं हा सावरकरांचा दिनक्रम असायचा. या महाविद्यालयात असताना सावरकर खेळांमध्येदेखील सहभागी व्हायचे. क्रिकेट नाही तर त्यांना फुटबॉल खेळायला जास्त आवडत होतं. हेच नाही तर 1902 मध्ये याच महाविद्यालयात 'त्राटिका' नावाचं नाटक केलं होतं. या नाटकात त्यांनी मुख्य भूमिका नव्हती. त्यावेळी आर्यभूषण नाट्यगृहात प्रयोग झाला होता, अशी सावरकर चरित्रात नोंद सापडते. मात्र त्यानंतर 1903 आणि 1904 साली शेक्सस्पिअरचं 'अथेल्लो' नाटकाचं मराठी भाषांतर केलं होतं आणि 'झुंजारराव' असं या नाटकाचं नाव ठेवलं होतं. या नाटकात 'अयागो' नावाच्या खलनायकची भूमिका निभावली होती. त्यावेळी त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली होती. 

Swatantra Veer Savarkar : स्वदेशी चळवळीला सुरुवात...

1905 साजी वंगभंग आंदोलन देशभर पेटलं होतं. स्वदेशी मालाचा वापर करा, अशी मोहीम याच काळात सुरु झाली होती. पुण्यात 1905 साली प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक सभेच्या ठिकाणी न. चि. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या विद्यार्थ्यांची सभा झाली. स्वदेशी कपड्यांना किंवा मालाला प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एकत्र आणत या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत सावरकरांनी भाषण केलं होतं आणि त्यात स्वदेशी मालाला प्रोत्साहन देण्यासाठी विदेशी मालावर बहिष्कार घालणं आवश्यक असल्याची भूमिका मांडली होती. त्यानंतर विदेशी कपड्यांची होळी पेटवण्याचा प्रस्ताव विद्यार्थ्यांसमोर मांडला होता. त्यावेळी अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला होता. 

Swatantra Veer Savarkar : होळी करा शेकोटी नको; लोकमान्यांचा सल्ला

लोकमान्य टिळक कामानिमित्त पुण्यात नव्हते. ज्यावेळी ते पुण्यात आले त्यावेळी सगळ्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांची भेट घेतली आणि त्यांना विदेशी कपड्यांची होळी करण्याची कल्पना सांगितली. त्याचवेळी लोकमान्यांनी त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र भरपूर प्रमाणात विदेशी कपडे गोळा करुनच होळी करा, असं देखील त्यांनी सावरकरांना सांगितलं होतं. विदेशी कपड्यांची होळी करा शेकोटी नको, असं लोकमान्य टिळक म्हणाले होते. त्यावेळी महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि सावरकर यांच्या सहकाऱ्यांनी भरपूर प्रमाणात विदेशी कपडे गोळा केले होते आणि पुण्यातील काही परिसरातून या कपड्यांची मिरवणूक काढली होती. त्यानंतर 7 ऑक्टोबर 1905 साली होळी पेटवली. त्याच ठिकाणी जळत्या होळी समोर रसरसतं भाषणं केलं. त्यावेळी लोकमान्य टिळक यांनीदेखील भाषण दिलं होतं. याच होळीची धग इंग्लंडपर्यंत पोहचली होती. त्यानंतर नाशिकमध्येही विदेशी कपड्यांची होळी केली होती. या चळवळीला देशव्यापी स्वरुप आलं होतं. 

Swatantra Veer Savarkar : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातून त्यांना का काढून टाकण्यात आलं?

या संपूर्ण घटनेचे परिणाम सावरकर यांच्यावर झाले. सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होते. त्यावेळी तत्कालीन प्राचार्य रँग्लर परांजपे यांनी सावरकरांना वसतिगृहातून काढून टाकलं होतं आणि त्यांना दहा रुपये दंडदेखील आकारला होता. मात्र सावकरांच्या सहकाऱ्यांनी यापेक्षा जास्त रक्कम गोळा करुन सावरकरांना दंड म्हणून भरायला लावली होती. या संपूर्ण घटनेनंतर लोकमान्य टिळक आक्रमक झाले आणि त्यांनी केसरी वृत्तपत्रात 'हे आमचे गुरु नव्हे' या नावाचे लेख लिहिला. या लेखातून सावरकर यांना आकारण्यात आलेल्या दंडाचा त्यांनी तीव्र निषेध केला होता. त्यानंतर आज या होळीच्या ठिकाणी ऐतिहासिक स्मारक बांधण्यात आलं आहे.

(वरील संपूर्ण माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक आणि लेखक अक्षय जोग यांनी दिली आहे)

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
Embed widget