एक्स्प्लोर

Mosambi News : मोसंबीच्या आगारातला शेतकरी संकटात, जालना जिल्ह्यात मोसंबीला फळगळीचा फटका, हेक्टरी एक लाखांची मदत देण्याची मागणी

मोसंबी (Mosambi) पिकांवर देखील अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. फळगळीने जालना (Jalna) जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

Mosambi News : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी पाऊस पडत आहे. मात्र, राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. मोसंबी (Mosambi) पिकांवर देखील अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. फळगळीने जालना (Jalna) जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

जालना जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील मोसंबी बागांना फटका

अतिवृष्टीने पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मराठवाड्यात मोसंबीच्या आंबिया बहार फळगळीने संकटात आला आहे. जालना जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील मोसंबी बागांना फळगळीचा फटका बसला आहे. राज्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीने अनेक फळबागांना मोठा फटका बसला आहे. मोसंबीची सर्वाधिक लागवड जालना जिल्ह्यात केली जाते. याच जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी अतिवृष्टीने संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील मोसंबी बागांना आता फळगळीचा सामना करावा लागत आहे. या संकटामुळं मोसंबी उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावलेत. बुरशीजन्य रोगांमुळं ऐन दिवाळीच्या तोंडावर हाताशी आलेलं उत्पन्न वाया जात असल्याचे शेतकऱ्यांना पाहावं लागत आहे.


Mosambi News : मोसंबीच्या आगारातला शेतकरी संकटात, जालना जिल्ह्यात मोसंबीला फळगळीचा फटका, हेक्टरी एक लाखांची मदत देण्याची मागणी

सरकारनं त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी

मोसंबीची मोठ्या प्रमाणावर सध्या फळगळ होत आहे. दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर आंबिया बहाराची फळे बाजारात आणून फायदा होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, फळगळीमुळं शेतकरी चिंतेत आहेत. हाती आलेला घास निसर्ग हिरावून घेतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. फळगळीची नेमकी कारणं काय आहेत, याबाबत तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, अतिवृष्टीमुळं फळांवर रोग पडत आहे. तसेच फळांची गळ देखील होत आहे. बागेत जास्त पाणी झाल्यानं बागेवर प्रादुर्भाव होत आहे. जवळपास 80 टक्के नकुसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळं आम्हाला त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी 

एका झाडावर सरासरी एक क्विंटलचा माल निघतो. आज जर परिस्थिती बघितलं तर 10 ते 20 किलोच माल शिल्लक राहिला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोसंबी पिकाचा विमा भरला असूनही कंपन्यांकडून विम्याचा परतावा मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. शासनानं हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी दिली आहे. मोसंबीवरच आमचा उदरनिर्वाह आहे. पोटच्या लेकरांच्या पलीकडे या झाडांची देखभाल केली आहे. तरी देखील आमचं मोठं नुकसान झालं असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Embed widget