एक्स्प्लोर

Mosambi News : मोसंबीच्या आगारातला शेतकरी संकटात, जालना जिल्ह्यात मोसंबीला फळगळीचा फटका, हेक्टरी एक लाखांची मदत देण्याची मागणी

मोसंबी (Mosambi) पिकांवर देखील अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. फळगळीने जालना (Jalna) जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

Mosambi News : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी पाऊस पडत आहे. मात्र, राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. मोसंबी (Mosambi) पिकांवर देखील अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. फळगळीने जालना (Jalna) जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

जालना जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील मोसंबी बागांना फटका

अतिवृष्टीने पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मराठवाड्यात मोसंबीच्या आंबिया बहार फळगळीने संकटात आला आहे. जालना जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील मोसंबी बागांना फळगळीचा फटका बसला आहे. राज्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीने अनेक फळबागांना मोठा फटका बसला आहे. मोसंबीची सर्वाधिक लागवड जालना जिल्ह्यात केली जाते. याच जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी अतिवृष्टीने संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील मोसंबी बागांना आता फळगळीचा सामना करावा लागत आहे. या संकटामुळं मोसंबी उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावलेत. बुरशीजन्य रोगांमुळं ऐन दिवाळीच्या तोंडावर हाताशी आलेलं उत्पन्न वाया जात असल्याचे शेतकऱ्यांना पाहावं लागत आहे.


Mosambi News : मोसंबीच्या आगारातला शेतकरी संकटात, जालना जिल्ह्यात मोसंबीला फळगळीचा फटका, हेक्टरी एक लाखांची मदत देण्याची मागणी

सरकारनं त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी

मोसंबीची मोठ्या प्रमाणावर सध्या फळगळ होत आहे. दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर आंबिया बहाराची फळे बाजारात आणून फायदा होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, फळगळीमुळं शेतकरी चिंतेत आहेत. हाती आलेला घास निसर्ग हिरावून घेतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. फळगळीची नेमकी कारणं काय आहेत, याबाबत तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, अतिवृष्टीमुळं फळांवर रोग पडत आहे. तसेच फळांची गळ देखील होत आहे. बागेत जास्त पाणी झाल्यानं बागेवर प्रादुर्भाव होत आहे. जवळपास 80 टक्के नकुसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळं आम्हाला त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी 

एका झाडावर सरासरी एक क्विंटलचा माल निघतो. आज जर परिस्थिती बघितलं तर 10 ते 20 किलोच माल शिल्लक राहिला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोसंबी पिकाचा विमा भरला असूनही कंपन्यांकडून विम्याचा परतावा मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. शासनानं हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी दिली आहे. मोसंबीवरच आमचा उदरनिर्वाह आहे. पोटच्या लेकरांच्या पलीकडे या झाडांची देखभाल केली आहे. तरी देखील आमचं मोठं नुकसान झालं असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
विकासकामांवरुन सत्तेतील भाजप शिवसेनेचे आजी माजी आमदार आमने सामने, जालन्यात राजकीय वातावरण तापलं
विकासकामांवरुन सत्तेतील भाजप शिवसेनेचे आजी माजी आमदार आमने सामने, जालन्यात राजकीय वातावरण तापलं
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
नंदिग्राम एक्सप्रेसमध्ये सजवलेला हनिमून कोच पडला महागात! डेकोरेटर विरोधात गुन्हा दाखल तर  संबंधित टीसी कर्मचाऱ्याचं देखील निलंबन
नंदिग्राम एक्सप्रेसमध्ये सजवलेला हनिमून कोच पडला महागात! डेकोरेटर विरोधात गुन्हा दाखल तर  संबंधित टीसी कर्मचाऱ्याचं देखील निलंबन

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget