एक्स्प्लोर

Weather Updates : काळजी घ्या...पुढील पाच दिवस तापमानाचा पारा वाढणार! हवामान विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

Weather Updates : पुढील पाच दिवस भारतात उष्णता वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Weather Updates : अजूनही मार्च महिना सुरू झाला नसला तरी तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. आता, आगामी पाच दिवस वातावरणातील उष्मा वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात पुढील पाच दिवसात कमाल तापमान हे सामान्यपेक्षा तापमानापेक्षा तीन ते पाच अंशांनी जास्त असणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

देशाच्या अनेक भागांमध्ये आधीच अधिक तीव्रतेच्या तापमानाची नोंद होत आहे. साधारणपणे एवढे तापमान मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोंदवण्यात येते. त्यामुळे यंदाच्या वर्षी तीव्र उष्णतेची लाट येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. आयएमडीने एका निवेदनात म्हटले आहे की, "पुढील पाच दिवसांत वायव्य, मध्य आणि पूर्व भारतातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअस जास्त राहण्याची शक्यता आहे." ,

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत वायव्य भारतातील कमाल तापमानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, त्यानंतर तापमानाचा पारा दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मार्चच्या महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत वायव्य भारतातील काही ठिकाणी तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअस आणि त्याहून अधिक वाढू शकतो.

हवामान विभागाने अतिउष्ण वातावरणासाठी अनेक घटक जबाबदार असल्याचे म्हटले आहे. पश्चिमी चक्रावातची (वेस्टर्न डिस्टर्बन्स) अनुपस्थिती असल्याने वातावरण उष्ण होत असल्याचे हवामान अधिकाऱ्यांनी म्हटले. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पाऊस येतो आणि तापमान कमी ठेवण्यास मदत होते. सोमवारी (20 फेब्रुवारी), वायव्य, मध्य आणि पश्चिम भारतातील बहुतेक ठिकाणी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले. 

दिल्लीच्या प्राथमिक हवामान केंद्र सफदरजंग वेधशाळेने सोमवारी येथे 1969 नंतरचा तिसरा सर्वात उष्ण फेब्रुवारी दिवस नोंदवला. सोमवारी कमाल तापमान 33.6 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. 

शेतीवर परिणाम होण्याची शक्यता

या काळात अधिक तापमान उत्पादनासाठी हानिकारक आहे. इतर उभी पिके आणि फळबागांवरही असाच परिणाम होऊ शकतो. हवामान खात्याने सांगितले की, पिकांवर उष्णतेचा परिणाम दिसू लागल्यास शेतकरी हलके सिंचन करू शकतात. 

फेब्रुवारीमध्ये  थंडीचा काही प्रमाणात जोर असतो. पण आतापासूनच हवामान बदलू लागले आहे. बुधवारी (22 फेब्रुवारी) सकाळी धुके दिसल्यानंतर हवामान चांगले राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरला.  गेल्या वर्षी मार्चमध्ये, 1901 नंतर देशातील सर्वात उष्ण वातावरणामुळे ळे गव्हाच्या उत्पादनात 2.5 टक्क्यांची घट झाली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
Embed widget