एक्स्प्लोर

शैक्षणिक कर्ज वसुलीला 3 वर्ष स्थगिती द्या, खासदार नवनीत राणा यांची अर्थमंत्र्यांकडे मागणी

शैक्षणिक कर्ज वसुलीला 3 वर्ष स्थगिती द्या, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे केली आहे.

अमरावती : कोरोना लॉकडाऊन काळात रोजगार नसल्यानं विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शैक्षणिक कर्ज वसुलीला 3 वर्ष स्थगिती द्यावी आणि कोरोना काळातील व्याज माफ करावे, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.

खासदार नवनीत कौर राणा यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून अर्थचक्र मंदावले आहे आणि त्याचा परिणाम रोजगार निर्मितीवर झाला आहे. ज्यामुळे शैक्षणिक कर्ज घेऊन आपलं शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रोजगार नाही पण बँकेचं शैक्षणिक कर्ज आणि त्यावरील व्याज मात्र डोक्यावर आहे. यामुळे विद्यार्थी चिंतातूर आहेत, अशा होतकरू, प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोरोना काळातील व्याज संपूर्णपणे माफ करावे आणि त्यांच्या शैक्षणिक कर्जवसुलीस किमान पुढील 3 वर्ष स्थगिती द्यावी, अशी आग्रही मागणी खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी बहुल भागात नागरिकांना बँकेच्या छोट्या छोट्या कामांसाठी दिवसभर ताटकळत बसावं लागतं. परिणामी त्यांचा रोजगार बुडतो आणि त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो, म्हणून या भागातील चुरणी, धारणी आणि चिखलदरा येथे राष्ट्रीयकृत बँकेच्या अतिरिक्त शाखा देऊन तेथील कर्मचारी संख्या वाढवावी, अशी मागणीसुद्धा खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केली. अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या भारत डायनॅमिक्स या मोठ्या प्रोजेक्टसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करून निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून या कारखान्यामुळे किमान 1000 लोकांना रोजगार मिळेल. या प्रकल्पासाठी जागा अधिग्रहित झाली असून आता प्रत्यक्ष उभारणी बाकी आहे. हेही नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या लक्षात आणून दिलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना जसे की, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना, पंतप्रधान आवास योजना, रोजगार हमी योजना, किसान कर्ज योजना आदींचे अनुदान-सहायता राशी किंवा कृषी कर्ज यासाठी लाभार्थ्यांना, शेतकरी शेतमजुरांना बँकेवर अवलंबून राहावे लागते. परंतु बँकेतील कर्मचाऱ्यांच्या अपुरी संख्या आणि कर्मचाऱ्यांचे उद्धट वागणे यामुळे या गरीब-गरजू आणि जेष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, दिवस दिवस रांगेत उभे राहावे लागते म्हणून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या बाबतीत जातीने लक्ष घालून अमरावती जिल्ह्यातील शेतकरी-शेतमजूर आणि वृद्ध, दिव्यांग नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुरेसे कर्मचारी आणि सौजन्यपूर्ण वागणूक यासाठी निर्देश द्यावे अशी मागणीही खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केली.

केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी खासदार नवनीत राणा यांच्या सर्व मागण्या व्यवस्थित ऐकून त्यावर तातडीने सकारात्मक पाऊले उचलण्याचे अभिवचन दिले.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
जितेंद्र शेळके अपघात प्रकरण! नेमका कसा झाला अपघात? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
जितेंद्र शेळके अपघात प्रकरण! नेमका कसा झाला अपघात? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावरुन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मालेगावात ठिय्या आंदोलन सुरु, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावरुन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मालेगावात ठिय्या आंदोलन सुरु, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
Gold : 2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले,अक्षय तृतीयेपूर्वी सोन्यात चढ-उतार; पुढे काय होणार, मोतिलाल ओसवालचा अहवाल काय सांगतो?
2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले, पुढं काय होणार,मोतिलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचा अहवाल काय सांगतो?
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी
जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी
Goa News: 'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
Embed widget