एक्स्प्लोर

सेफ्टीक टँकमध्ये गुदमरून जीव गेलेल्या कामगारांना 10 लाख रूपये नुकसानभरपाई द्या, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

हायकोर्टानं जिल्ह्याधिकाऱ्यांना मृतांच्या कुटुबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून चार आठवड्यात देण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : मुंबईतील गोवंडी परिसरात एका सेप्टिक टॅंकमध्ये स्वच्छता करताना तीन सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता. त्या कामगारांच्या विधवांना नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी 10 लाख रुपये चार आठवड्यांत देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

काय घडली होती घटना?

गोवंडी येथील रहेजा संकुलाजवळील मोरया इमारतीजवळ 23 डिसेंबर 2019 मध्ये दुपारी शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी विश्वजीत देवनाथ (32), गोविंद चोरिटिया (34) आणि संतोष कळसेकर (45) या आत उतरलेल्या तीन मजूरांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्यांना गुदमरून आल्याने बाहेर येता आले नाही. स्थानिकांच्या हे लक्षात येताच त्यांना बाहेर काढून तात्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. पतीच्या निधनानंतर नुकसानभरपाई मिळावी म्हणून मृत्यांच्या विधवांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत रीट याचिका केली होती. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आमि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. 

तेव्हा, सफाई कामगार एका खासगी इमारतीत काम करण्यासाठी गेले असले तरीही राज्य सरकारही या दुर्घटनेसाठी तेवढेच जबाबदार आहेत. भारतीय संविधानाच्या कलम 17 (अस्पृश्यता निर्मुलन) नुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सफाई कामगार हा खासगीत काम करीत असला तरीही केंद्र, राज्य सरकार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये देणे बंधनकारक असल्याचं याचिकाकर्त्यांच्यावतीने बाजू मांडताना अड. इशा सिंह यांनी हायकोर्टाला सांगितलं. मात्र राज्य सरकार नुकसानभरपाई देण्यास बांधिल नाही, कारण मृत कामगार हे खाजगी गृहनिर्माण संस्थेसाठी काम करीत होते असं राज्य सरकारच्यावतीने अॅड. पौर्णिमा कंथारिया यांनी सांगितलं. तसेच कुर्ल्यातील तहसिलदारांच्या आधेशानुसार इमारतीच्या विकासकानं नुकसान भरपाईचा भाग म्हणून प्रत्येकी सव्वा लाखांचे तीन धनादेश (3 लाख 75 हजार रुपये) जमा केले असून आम्ही ते धनादेश मृतांच्या पीडितांकडे सुपूर्द करणार असल्याचेही कंथारिया यांनी कोर्टाला सांगितलं.

दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत हायकोर्टानं जिल्ह्याधिकाऱ्यांना मृतांच्या कुटुबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून चार आठवड्यात देण्याचे निर्देश दिले. तसेच मृतांच्या विधवांच्या पुनर्वसनाबाबत योजना देखील सादर करण्यास सांगितलं. साल 1993 पासून मृत पावलेल्या सफाई कामगारांची माहिती न्यायालयात सादर करावी. त्यापैकी कितींच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्यात आली?, त्याबाबतही आकडेवारी सादर करावी. तसेच गोवंडीतील या घटनेनंतर नोंदविण्यात आलेल्या एफआयआरवर आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली?, त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला देत हायकोर्टानं सुनावणी 18 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हरयाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरयाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Murlidhar Mohol On Delhi Assembly Election : मागच्या 10 वर्षातील खोटं बोलणाऱ्या सरकारचा अंत : मोहोळSuperfast News | दिल्ली विधानसभा | Delhi Assembly Election | दिल्लीतही कमळ | ABP MajhaDevendra Fadnavis On Arvind Kejriwalकेजरीवालांचा बुरखा दिल्लीकरांनी फाडला,देवेंद्र फडणवीस यांचा टोलाAnna Hazare on Delhi Election : दिल्लीच्या निकालावर अण्णा हजारे ढसाढसा रडले : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हरयाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरयाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Milkipur ByPoll Results : अखेर अयोध्येत कमळ फुलणार, मुख्यमंत्री योगींचा सपाला मोठा झटका, लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला
अखेर अयोध्येत कमळ फुलणार, मुख्यमंत्री योगींचा सपाला मोठा झटका, लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला
Embed widget