एक्स्प्लोर

हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस

लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या आठपैकी सहा राज्यांमध्ये भाजपने विजय प्राप्त करत इंडिया आघाडीची हवा काढली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

Delhi Election 2025 : गेल्यावर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील काँग्रेसच्या नेतृत्वात प्रादेशिक पक्षांनी एकत्र येत भाजपच्या आव्हानाचा मुकाबला केला होता आणि भाजप लोकसभा निवडणुकीमध्ये 400 चा नारा देत असताना अवघ्या 240 जागांवर येण्याची वेळ आणली होती. बहुमत सुद्धा भाजपला मिळवता आलं नाही. केंद्रामध्ये भाजपची एकहाती सत्ता अपेक्षित असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाली हा इतिहास असताना गेल्या आठ महिन्यांमध्ये मात्र ज्या पद्धतीने इंडिया आघाडीने वज्रमूठ बांधत भाजपला दणका दिला होता तीच वज्रमूछ निखळल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या आठपैकी सहा राज्यांमध्ये भाजपने विजय प्राप्त करत इंडिया आघाडीची हवा काढली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. देशभरामध्ये इंडिया आघाडीमध्ये समन्वय राहिला नसल्याचे दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्येही स्पष्ट झालं आहे.  

एकमेकांची कपडे फाडण्यातच इंडिया आघाडीच्या नेत्यांचा वेळ गेला

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि आप आमने-सामने आल्याने त्याचा फायदा भाजपसाठी झाल्याचे दिसून येत आहे. दिल्लीची सत्ता भाजपने पुन्हा एकदा मिळवताना 'आप'ला सत्तेतून बेदखल केलं आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यासारखे दिग्गज नेते पराभूत झाले. त्यांच्या पराभवासाठी काँग्रेसची मते सुद्धा कारणीभूत ठरली आहेत. ज्या 12 जागांवर आपचा पराभव झाला त्यामध्ये काँग्रेसला मिळालेली मतं ही भाजपच्या विजयी मतांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे कदाचित हे दोन्ही पक्ष समन्वयाने एकत्रित लढले असते तर भाजपला सत्ता मिळवता आली नसती, असे दिसून येत आहे. नवी दिल्ली, छत्रपूर, जंगपुरा बादली, त्रिलोकपुरी, ग्रेटर कैलास, नांगलोई, तिमारपूर मालवीय नगर, राजेंद्र नगर, संगम विहार, दिल्ली केंट या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या विजयी मतांपेक्षा काँग्रेसला मते मिळालेली सर्वाधिक आहे. त्यामुळे कदाचित या जागांवर काँग्रेस आणि आपमध्ये आघाडी असती, तर या जागा आपच्या पदरामध्ये किंवा काँग्रेसच्या पदरात आल्या असत्या हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आप आणि काँग्रेस मधील हे वादामुळेच भाजपचा दिल्लीतील विजय सुकर झाला आहे. 

त्यामुळे एक प्रकारे एकमेकांची कपडे फाडण्यातच इंडिया आघाडीच्या नेत्यांचा वेळ जात असल्याने भाजपच्या महाकाय आव्हानाचा मुकाबला करणार तरी कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये कमालीचा वाद निर्माण झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामध्ये फक्त सत्तेत येण्याचीच औपचारिकता अशा पद्धतीनेच भांडणे सुरू होती. या भांडणाचाच फटका तिन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीमध्ये बसला. यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. फक्त झारखंडमध्ये इंडिया आघाडीला सरकार स्थापन करता आलं आहे. 

सर्व राजकीय परिस्थिती विपरीत असताना सुद्धा हरियाणामध्ये भाजपची सत्ता 

तत्पूर्वी, मध्य प्रदेश निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसचा अहंकार काँग्रेससाठी नढला होता. त्या ठिकाणी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव काही जागांची मागणी करत असताना त्यांना देण्यासाठी काँग्रेसकडून नकार देण्यात आला. त्याचाच परिपाक विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून आला. इतकेच नव्हे तर काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी कोण अखिलेश म्हणून अशी संभावना केली होती. त्यावेळी सुद्धा काँग्रेसला सत्तेत परतणार असल्याचा विश्वास होता. मात्र, मी काँग्रेसचा त्या ठिकाणी सुद्धा पराभव झाला. इतकेच नव्हे तर सर्व राजकीय परिस्थिती विपरीत असताना सुद्धा हरियाणामध्ये भाजपने सत्ता मिळवली. या ठिकाणी सुद्धा काँग्रेसच्या अंतर्गत लाथाळ्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्या. 

इंडिया आघाडीमधील मतभेद वाढले

त्यामुळे इंडिया आघाडीमधील मतभेद हे भाजपच्या विजयासाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा फारच बोलकी असल्याचे दिसून आले. अजून आपसात लढा म्हणत इंडिया आघाडीला टोला दिला. अर्थात, जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ता आल्यानंतर अब्दुल्ला यांचा सूर बदलला आहे. त्यानंतर शिवसेना संजय खासदार संजय राऊत यांनी सुद्धा त्यांच्याच सुरात सूर मिसळला. त्यामुळे इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्षातील नेत्यांचे मतभेद आणि काँग्रेसचा अहंकार यामध्ये सत्तेचा महामार्ग रखडला गेला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांनी आम्ही इंडिया आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीत एकत्र होतो, पण आता नाही. आघाडीची स्थापना केल्यापासून ती राज्यांत चालणार नाही, हे स्पष्ट होते. त्याची कार्यप्रणाली राज्यांच्या राजकीय स्वभावावर अवलंबून असेल. त्यामुळे इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून वाचू नये, आणि त्याचा आनंदही साजरा करु नये, असे म्हटले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare on Holi | देवाभाऊ, देवतारी त्याला कोण मारी, अंधारेंकडून फडणवीसांना अनोख्या शुभेच्छाTop 100 : टॉप 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान आढावा ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 14 March 2025Majha Hasya Kavi Sanmelan on Holi Festival | एबीपी माझा हास्य कवी संमेलन 2025 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget