एक्स्प्लोर

Degree College Admission: विद्यार्थ्यांनो निकाल लागला, आता पुढील प्रक्रिया काय? प्रवेशासाठी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार

College Admission: बारावीचा निकाल जाहीर असून पुढील प्रवेशप्रक्रियेसाठी काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची आवश्यकता आहे.

Degree College Admission: बारावीच्या परीक्षेत (12 th Exam) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आता पुढील शिक्षणासाठी प्रवेशप्रक्रिया (Admission Process) पूर्ण करण्याची लगबग सध्या सुरु आहे. त्यानुसार महाविद्यालय (Colleges) आणि संबंधित विद्यापिठाकडून (University) प्रवेशाची प्रक्रिया सुरु देखील करण्यात आली आहे. परंतु प्रवेशप्रक्रिया पूर्ण करताना अनेक विद्यार्थी संभ्रमात येतात. कधीकधी महत्त्वाची कागदपत्र राहून जातात, तर कधी काही महत्त्वाची माहिती भरणं राहून जातं. पण अशावेळी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे घाबरुन न जाता किंवा संभ्रम निर्माण न करता प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी काही महत्त्वाची कागदपत्र तयार ठेवली तर विद्यार्थ्यांना कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. 

वैद्यकीय (Medical) किंवा अभियांत्रिकी (Engineering) अभ्यासक्रमासाठी आवश्यक कागदपत्र

* नीट ऑनलाइन फॉर्म प्रिंट
* नीट प्रवेश पत्र व नीट मार्कशिट
* मार्क शीट 10 वी,  दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, मार्क शीट  12वी
* नॅशनॅलिटी सर्टिफिकेट
* रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, उतपन्न प्रमाणपत्र किंवा वडिलांच्या उत्पन्नाचा दाखल फॉर्म क्र. 16
* 12वी ची टीसी
* मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट
* विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते
* विद्यार्थी तसेच आई-वडिलांचे दोघांचे पॅनकार्ड

इतर अभ्यासक्रमासाठी (Other Courses) ही कागदपत्र आवश्यक
* जात प्रमाणपत्र
* जात वैधता प्रमाणपत्र
* नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र
* डोमिसाइल प्रमाणपत्र
* दिव्यांगता प्रमाणपत्र
* आधार क्रमांक 
* राष्ट्रीयकृत बँक खाते
* सैन्यदल वर्गाचे प्रमाणपत्र (या कोट्यातून प्रवेश घ्यायचे असल्यास)
* अल्पसंख्याक वर्गाचे प्रमाणपत्र (या कोट्यातून प्रवेश घ्यायचे असल्यास)

मागासवर्गीयांसाठी ही कागदत्र आवश्यक
1. जात प्रमापत्र (Caste Certificate)
2. जातवैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
3. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Criminal Certificate)

विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यसाठी अनेक अर्ज भरावे लागतात. हे अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी गोंधळून जाणे टाळावे. अन्यथा अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून काही चूका होऊ शकतात. परंतु त्या चुका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक ती काळजी घेतल्यास चुका होणार नाहीत. 

अर्ज भरताना कोणती काळजी घ्याल?

अर्ज भरताना तुमची गुणपत्रिका, जातीचा दाखला, आधार कार्ड यांसारख्या आवश्यक कागदपत्रांची कॉपी कायम सोबत ठेवा, जेणेकरुन अर्ज भरताना माहिती भरण्यास सोपे जाईल. तसेच तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो देखील तयार ठेवावे. जर तुम्ही ऑफलाइन अर्ज भरत असाल तर तुमच्या अर्जासोबत कागपत्र जोडण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी म्हणजेच स्टॅपलर, गम यांसारख्या गोष्टी देखील सोबत ठेवा. तसेच अर्जात दिलेल्या प्रमाणेच प्राथमिक माहिती जसे की, विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, नागरिकत्व, जन्मतारिख यांसारखी महत्त्वाची माहिती अचूक भरावी. 

अर्जामध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्या शाईचे पेन वापरावे, कोणत्या भाषेत अर्ज भरावा या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि त्यानंतर योग्य पद्धतीने अर्ज भरावा. अर्ज भरताना काही चूका होऊ नये म्हणून तुम्ही आधी अर्जाची झेरॉक्स कॉपी काढून तो भरु शकता आणि त्यानंतर मूळ अर्ज भरा. त्यामुळे मूळ अर्जात चूका न होण्यास मदत होईल. तसेच अर्ज भरताना काही शंका असल्यास त्यासंर्दभात योग्य मार्गदर्शन घेऊन शंकेचे निरसन करावे. ऐनवेळेस अर्ज भरणे टाळा, त्यासाठी अर्ज भरण्याच्या तारखा आणि वेळापत्रक यांवर लक्ष ठेवा. ऑनलाइन अर्ज भरण्याच्या वेळेस आवश्यक ती कागदपत्र स्कॅन करुन ठेवा आणि ती तुमची कागपत्रे एका फोल्डरमध्ये अथवा पेनड्राईव्हमध्ये सेव करा.

अर्ज भरताना गोंधळून न जाता किंवा कोणताही संभ्रम निर्माण न करता या सर्व गोष्टींचे पालन केल्यास अर्ज भरताना कोणतीही अडचण निर्माण न होण्यास विद्यार्थ्यांना मदत होईल. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

HSC Exam: इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचे आवेदन पत्र भरण्यास सुरवात; 'या' ठिकाणी करावा लागणार अर्ज

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Exam: 96 गुणांचा उमेदवार घरी, 44 गुणांचा होणार अधिकारी; MPSC नियमांवर उमेदवारांनी निर्माण केलं प्रश्नचिन्ह
96 गुणांचा उमेदवार घरी, 44 गुणांचा होणार अधिकारी; MPSC नियमांवर उमेदवारांनी निर्माण केलं प्रश्नचिन्ह
Vikram Kakade : 'जे नाराज होते, त्या सगळ्यांना भेटलो...', उमेदवारी अन् जय पवारांना कर्ज दिल्याच्या चर्चांवरती विक्रम काकडे स्पष्टपणे बोलले
'जे नाराज होते, त्या सगळ्यांना भेटलो...', उमेदवारी अन् जय पवारांना कर्ज दिल्याच्या चर्चांवरती विक्रम काकडे स्पष्टपणे बोलले
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटीवरून सुप्रीम कोर्टानं सरकारला सुनावलं; मोदी स्वतः ठेवणार 21 जूनच्या परीक्षेवर लक्ष; पुढील वर्षापासून होणार मोठे बदल
नीट पेपरफुटीवरून सुप्रीम कोर्टानं सरकारला सुनावलं; मोदी स्वतः ठेवणार 21 जूनच्या परीक्षेवर लक्ष; पुढील वर्षापासून होणार मोठे बदल
NEET Exam Paper Leak: NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
Embed widget