अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
आरोपीला अटक करण्यासाठी हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा सत्य समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, आता आरोपी जामिनासाठी न्यायालयात धाव घेत आहेत.

नवी दिल्ली : तुम्ही अशा अनेक केसेस पाहिल्या असतील ज्यामध्ये लोक कर्जापासून मुक्त होण्यासाठी फसवणुकीचा अवलंब करतात. अशीच एक खळबळजनक घटना दिल्ली ग्रामीण भागातील नजफगढ परिसरातून समोर आली आहे, जिथे मोठ्या रकमेचा विमा मिळवण्यासाठी एक कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला होता. विम्याची दुप्पट रक्कम मिळावी म्हणून खोटा अपघातही घडवून आणला आणि बनावट अंत्यसंस्कार करून गावात बारा दिवसही करण्यात आले. एफआयआर नोंदवून आरोपीला अटक करण्यासाठी हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा सत्य समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, आता आरोपी जामिनासाठी न्यायालयात धाव घेत आहेत.
एक कोटींऐवजी दोन कोटी मिळतील
मिळालेल्या माहितीनुसार, नजफगढमधील फिरनी रोडवर 5 मार्च रोजी रात्री उशिरा पोलिसांना एका अपघाताची माहिती मिळाली. ज्यामध्ये दोन दुचाकींची टक्कर झाल्याची माहिती मिळाली, सुरुवातीला एक जण जखमी झाल्याचे दर्शविण्यात आले. नंतर त्याच्या मृत्यूची घोषणा झाली आणि त्याचे वडील आणि इतर लोक मिळून गढगंगा येथे गेले आणि नजफगढ गावात राहणाऱ्या लोकांमध्ये अंत्यसंस्कार दाखवून बातमी पसरवली. बारा दिवस सुद्धा करून टाकले. यामुळे लोकांचा असा विश्वास होता की त्याचा अपघाती मृत्यू झाला. अंत्यसंस्काराचे प्रमाणपत्रही तेथूनच घेतले. विमा कंपनीकडून एक कोटींऐवजी दोन कोटी मिळतील, असा त्यांचा विश्वास होता, कारण अपघातात मृत्यू झाल्यास दुप्पट रक्कम दिली जाते.
याप्रकारे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले
मात्र विम्याचा दावा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर पोलिसांच्या कागदपत्रांची आवश्यकता होती. त्यानंतर, बनावट मयताचे वकील असल्याचे भासवून एक व्यक्ती आणि आरोपी दुचाकीवरून पोलीस ठाणे गाठले आणि त्यांना सांगितले की, अशातच अपघात झाला होता, त्यात तरुणाचा मृत्यू झाला होता. गडगंगेतही अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ज्या आरोपीच्या दुचाकीला धडक बसली त्यालाही पोलिसांसमोर हजर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्या बनावट आरोपी तरुणानेही त्याच्या दुचाकीला धडक दिल्याचे सांगितले. मात्र नजफगढ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, त्यांच्या संभाषणात आणि संपूर्ण प्रकरणातील अनियमितता लक्षात येऊ लागली. अनेक दिवसांच्या तपासानंतर संपूर्ण कटाचा उलगडा झाला असून नजफगड पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























