IPL 2025: Gujarat Titans vs Mumbai Indians: चल नीघ आता...हार्दिक पांड्या-साई किशोर यांच्यात राडा; अंपायरही धावले, मैदानात काय घडलं?, VIDEO
IPL 2025: Gujarat Titans vs Mumbai Indians: मुंबई आणि गुजरातच्या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्या आणि साई किशोर यांच्यात राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

IPL 2025: Gujarat Titans vs Mumbai Indians: गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ( Gujarat Titans vs Mumbai Indians) 36 धावांनी पराभव केला आहे. आयपीएल 2025 मध्ये गुजरातचा हा पहिला विजय ठरला आहे. तर मुंबईच्या संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात, संपूर्ण मुंबई संघ फक्त 160 धावा करू शकला. रोहित शर्मा (Rohit Sharma) सलग दुसऱ्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला, तर हार्दिक पांड्यालाही (Hardik Pandya) मोठी खेळी खेळता आली नाही. दरम्यान मुंबई आणि गुजरातच्या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्या आणि साई किशोर यांच्यात राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
हार्दिक पांड्या आणि साई किशोर यांच्यात वाद-
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यादरम्यान आर. साई किशोर आणि हार्दिक पांड्या यांच्यात वाद झाला. हार्दिक पांड्या फलंदाजी करत असताना साई किशोर गोलंदाजीसाठी आला. यावेळी साई किशोरने हार्दिक पांड्याला एक चांगला चेंडू टाकला. हा चेंडू सहजरित्या हार्दिक पांड्याने खेळला आणि चेंडू गोलंदाजी करत असलेल्या साई किशोरकडे गेला. यानंतर साई किशोर हार्दिक पांड्याकडे पाहत राहिला. हार्दिक पांड्यानेही त्याला रागात पाहिले आणि चल नीघ...असं म्हणाला. यावेळी अंपायरही मध्यस्थीला धावल्याचे पाहायला मिळाले.
GAME 🔛
— Star Sports (@StarSportsIndia) March 29, 2025
Hardik Pandya ⚔ Sai Kishore - teammates then, rivals now! 👀🔥
Watch the LIVE action ➡ https://t.co/VU1zRx9cWp #IPLonJioStar 👉 #GTvMI | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi, & JioHotstar pic.twitter.com/2p1SMHQdqc
आयपीएल 2025 मधील पहिला राडा-
क्रिकेटमध्ये खेळाडूंमधील अशा प्रकारच्या संघर्ष सामान्य आहेत. तथापि, आयपीएल 2025 मध्ये अद्याप असे काहीही दिसलेले नाही. आयपीएलच्या गेल्या हंगामात, केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणावर अशाच एका वादामुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. तथापि, हार्दिक पंड्या आणि साई किशोर यांच्या बाबतीत अद्याप असे काहीही घडलेले नाही.
शुभमन गिल आणि साई सुदर्शनचा तडाखा!
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी सुरुवातीलाच एमआयचा निर्णय चुकीचा सिद्ध केला, कारण गुजरातने पॉवरप्लेमध्येच एकही विकेट न गमावता 66 धावा केल्या. हार्दिक पांड्याने गिलला बाद केले, जो 38 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गिल व्यतिरिक्त जोस बटलरनेही 24 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले. 17 षटकांत गुजरात टायटन्सचा स्कोअर 3 गडी गमावून 170 धावा असा होता. पण त्यानंतर, गुजरातच्या फलंदाजांना 3 षटकांत फक्त 26 धावा करता आल्या आणि एकूण 5 विकेट गमावल्या. ज्यामुळे गुजरातला 200 पेक्षा कमी धावसंख्येवर रोखले. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या आहेत. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.





















