एक्स्प्लोर

BLOG : तेव्हा 'त्या' जीवाचं काळीज जळत असतं!

BLOG : आज होळी. खेड्यांनी अजूनही गोवऱ्या पेटवून घरोघरी होळी केली जाते. गावाच्या पारापाशी नाहीतर वेशीपाशी सगळ्या गावाची मिळून एकच मोठी होळी पेटवली जाते. यात गोवऱ्या असतात, जळण असतं, इकडून तिकडून आणलेली लाकडं असतात. यात जळणाऱ्या हरेक वस्तूचे वास भिन्न असतात.  घासलेट ओतून पेटवलेल्या लाकडाचा वास वेगळा असतो. ओलं लाकूड जळत नाही आणि त्याचा धूर जास्ती येतो. बाभूळ जळताना ठिणग्या जास्ती उडतात तर आंब्याचा, चिंचेचा बुंधा शांत निगुतिने जळत राहतो. 

होळीत कुणी नारळाच्या वाळक्या झावळ्या आणून टाकल्या तर त्या अगदी धडाडून पेटतात, काही मिनिटात त्यांची राख होते. त्यांची धग ओल्या लाकडांच्या कामी येते. होळीशिवाय जळणाऱ्या अन्य चीजवस्तूंचे गणितही भारी आहे.

काढणी झाल्यावर चिपाडासकट ऊस पेटवून दिला जातो तेंव्हा धुरालाही गोडसर खाट येतो!
हुरड्याचा आर पेटवून त्यात हरभऱ्याची डहाळी जाळली जातात तेंव्हा ती फटफट उडतात आणि आतला हरभरा शेकून निघतो!
तुरीचं काड पेटवलं की इतकं वेगानं जळतं की अवघ्या काही मिनिटांत अख्खं शिवार लख्ख जळू लागतं. 
ऊसाचं वाडं असो की जवारीची ताटं असोत ती वाळून खडंग झाली तरी त्यांना त्यांचा प्राकृतिक गंध असतो, त्यांना पेटवलं की तो गंध आगीसोबत वाऱ्यावर पसरतो.
समई निरंजनातलं तेल संपून गेलं की एकट्याने जळणाऱ्या वातीचा वास जणवतो, हे वातीचं गंधअस्तित्व असतं!

दगडी भिंतीवर थापलेल्या गोवऱ्या, मातीत थापलेल्या गोवऱ्या आणि चुलवणापाशी थापलेल्या गोवऱ्या यात फरक असतो. त्यांचा वासही वेगळा येतो!
नेमानं चूल हाताळणारी चाणाक्ष बाई तर गायीच्या आणि म्हशीच्या शेणाच्या गोवऱ्याही बरोबर ओळखते.                      
गोवऱ्या काहीशा ओल्या जरी असल्या तरी त्यांचा वास वेगळा असतो, वाळलेल्या गोवऱ्या जळताना आवाजही वेगळा येतो. 
 
आताशा गावांनी चुली कमी होत चालल्यात मात्र पुरत्या नामशेष झालेल्या नाहीत. चुलीतल्या सरपणाचेही वेगवेगळे वास असतात. 
आधी आर पेटवला जातो मग काटक्या कुटक्या पेटवल्या जातात, त्यांचे कडाकड आवाज येतात. चुलीतून ठिणग्या उडतात. चांगला जाळ धडाडला की मग उंडीव लाकूड चुलीत सारलं जातं आर विझू लागतो. मग फोडीव लाकडाचे बारकाले तुकडे ठेवले जातात. मग आर पुरता विझायच्या बेतात येतो. 
चुलीसमोर बसलेली बाई सावध असतेच. हातातली फुकारी घेऊन ती फुंफुं आवाज करत विझत चाललेल्या विस्तवावर फुका मारू लागते. 
सैपाकघरात धुराचे लोट उठतात. 

पांढरा पिवळा धूर त्या बाईच्या फुफ्फुसात शिरतो, ती बेजार होते मात्र फुकारी सोडत नाही. 
काही वेळानं धूर एकदाचा सरतो आणि चूल भडकून उठते. चिखलाने सारवलेली पातेली चुलीवर चढतात आणि वास बदलून जातो. 
माती जळत असते, लाकडं जळत असतात आणि त्यांच्या समोर बसलेली बाई रोज थोडी थोडी जळत जाते!    

काही घरांनी चुलीतही गोवऱ्या जाळल्या जातात. 
गोवरी मधोमध तोडून भाकरी मोडल्यागत तिचे चार भाग केले जातात. 
चुलीत कडंकडंनं गवऱ्या लावल्या जातात वर थोडी माया राखून गवऱ्यात थोडं वाळलेलं गवत आणि कागदाचे तुकडे सरकवले जातात, काडीपेटी पुढचे काम चोख करते. 
गोवऱ्या जळताना अफाट धूर होतो. घरात एकच खाट उडतो. 
चुलीपुढे बसलेली बाई पार घायकुतीला येते, तिचा श्वास फुलून येतो मात्र ती चुलीपुढून उठू शकत नाही. 
थोड्या वेळाने चूल धडाडते, बाईचा ऊर शांत होत जातो मात्र काळजात शिरलेला धूर खोल खोल जात राहतो!
इतकं काही घडतं तेंव्हा त्या चुलीवर बनवलेल्या कुठल्याही जिनसंला चव येतेच पण तिच्यासमोर कणाकणाने जळत राहणाऱ्या बाईचे काय?    

सैपाकातल्या वस्तूंचा जळतानाचा गंध भारीच असतो. जिरी मोहरीच्या फोडणीपासून ते मटणभाजणी पर्यंतचे वास वेगळेच असतात, तळणातल्या हिरव्या मिरच्यांचा तडतडाट आणि खाट खास असतो. 
तीन धोंड्यांची चूल करून त्यावर केलेलं वांग्याचं भरीत आपली ओळख वाऱ्यासोबत दूरवर पाठवतं!  
दूध ऊतू गेल्यावर त्याचा करपट वास कितीतरी वेळ घरात राहतो, नुसतं पातेलं जरी आधणासाठी जास्त वेळ ठेवलं तरी लोखंड जळल्याचा वास येतो!
पितळी हंडा चुलीवर ठेवला तर त्याचा वास वेगळा येतो आणि जर्मनचं भगुणं ठेवलं तर त्याचा वास वेगळा येतो!
स्टेनलेस स्टील मोठ्या शहरांतल्या कचकडी थोरांसारखं असतं, त्याला वास नसतो की गंध नसतो नि त्याची वेगळी अशी चवही नसते. ते दिसायला देखणं असलं तरी त्याला स्वतःचे गुणधर्म नसतात!
वेगवेगळ्या कालवणांचे वासही भिन्न असतात, कुठं तरी दूरवर काही जळत असलं तरी आपलं नाक सांगतं की काय जळतेय! हे भारी असतं जाळ धूर डोळ्यांनी दिसतो पण काय जळतंय हे नाक सांगतं!

मसणवाटेत मढं जळत असलं तर त्याचा आवाजही चर्रर्र चर्रर्र करत येतो आणि एक टिपिकल उग्र भणभणणारा दर्पही येतो. भर उन्हांत कुणाच्या तरी घरचं आढं पेटून उठलं की गाव तिकडं पळत सुटतं. तिथला जाळ सांगतो की त्या घरात नुसतं दारिद्रय होतं की कणभर तरी समृद्धी होती!
बंबात पेटवलेलं जळण आणि धडाडून पेटलेले घराचे वासे यांचा वास सारखाच असतो!

नायलॉन, प्लॅस्टिक, रबर जाळलं तर नाकपुड्या बंद कराव्या वाटतात. काळपट धूर येतो तो वेगळाच!
झाडलोट करुन पाला पाचोळा जाळू नये, पण जाळलाच तर त्याला धुळीचा ठसका येतोच! त्यात ओलं काही असेल तर धूरही येतो!

रोज रानात जाऊन सरपण आणणाऱ्या बायका पोरींच्या देहाचं आयुष्याच्या अखेरीस सरपण झालेलं असतं, बरगडीच्या काटक्या झालेल्या असतात पिंडरीतली नडगी उंडीव लाकडागत उरते, हाताची लोखंडी कांब होते. बाई पार वाळून जाते. जितेपणीच तिचं सरपण होतं! 

सरण रचताना देखील आधी ओंडके ठेवले जातात, मग लाकडं आणि त्यावर गोवऱ्या ठेवल्या जातात! 
आयुष्यभर काबाडकष्ट केलेल्या बाईचं सरपण त्या सरणावर ठेवलं जातं तेंव्हा लाकडं लवकर पेटत नाहीत हे वास्तव आहे!
चंदनगंध असतो मात्र त्याचा दरवळ लाकूड जळल्याबिगर येत नाही! तसं या सरपणावरच्या बायकांचं असतं, त्यांचं चांगुलपण त्यांच्या घराला, गावाला, गावकीला, भावकीला तोवर कळत नाही जोवर त्या जळत नाहीत.

काही लोक आयुष्यभर दुसऱ्यावर जळत राहतात, त्यांचं जळणं दिसत नाही मात्र त्यांचं वागणं त्याची प्रचिती देते! 
  
याही पलीकडे आणखी एक गोष्ट जळत असते ती म्हणजे एखाद्याचा जीव!
कुणाचा जीव जळत असेल तर ना त्याचा धूर येतो ना त्याचा जाळ दिसतो. 
जीव जळत राहतो माणूस आतल्या आत खंगत जातो. 
या जळणाऱ्या जीवाला कुणीच जाणत नाही, मग जितेपणी जळालेल्या जीवाचे कलेवर एके दिवशी जाळलं जातं तेंव्हा त्या जीवाचे नातलग जगासाठी रडून दाखवत असतात!

होळीत जसं ओलं सुकं एकत्र जळतं तसं जगरहाटीत काही आवाज करत धूर पसरवत जळतं तर काही मुक्याने आगीच्या कडक्याशिवाय जळतं!
 
काही असंही जळतं की धडधडून पेटलेली चिता समोर नसली तरी आपलं कुणी गेल्याच्या बातमीनेच दूर कुठे तरी जिवाभावाच्या माणसाच्या डोळा पाणी वाहत असतं तेव्हा त्या जीवाचं काळीज जळत असतं!

 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget