एक्स्प्लोर

वंचित अन् महाविकास आघाडीचा युतीआधीच काडीमोड, आंबेडकरांच्या भूमिकेचा फायदा नेमका कुणाला?

Maharashtra Politics : 2019 साली झालेला कित्ता पुन्हा गिरवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वंचितनं मविआपासून फारकत घेतल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi) युतीआधीच काडीमोड झाला आहे ते आता स्पष्ट झालं आहे. काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील उमेदवार असलेल्या ठिकाणी वंचितनं आपले उमेदवार दिलेत. अशात, 2019 साली झालेला कित्ता पुन्हा गिरवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वंचितनं मविआपासून फारकत घेतल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याचा फायदा कोणाला होईल आणि तोटा कोणाला पाहा खास रिपोर्ट. 

वंचित अन् महाविकास आघाडीचा युतीआधीच काडीमोड

महाविकास आघाडीकडून अकोल्यात कांग्रेसचा उमेदवार जाहीर केल्यानंतर वंचितसोबतची चर्चेची दारं बंद झाल्याचं अधिकृत झालं आहे. दोन दिवसांआधीपर्यंत महाविकास आघाडीसोबतची चर्चेची दारं खुली असल्याचं आंबेडकर म्हणाले होते. मात्र, आधी शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी फारकत घेतल्यानंतर कांग्रेससोबत वंचितची बोलणी सुरु होती. त्यात आंबेडकरांनी सात ठिकाणी आपण पाठिंबा देऊ असं जाहीर केलं मात्र काँग्रेसकडून प्रतिसाद न आल्यानंतर वंचितनं दुसऱ्या टप्प्यातील आपली यादी जाहीर करुन टाकली अशात, दोन्हीकडून चर्चेचं घोडं पुढे सरकत नसल्यानं अखेर काल कांग्रेसनं अकोल्यातून डॉ. अभय पाटील यांच्या नावाची घोषणा करुन टाकली. 

वंचितसह तिसऱ्या आघाडीची शक्यता मावळली

दुसरीकडे, प्रकाश आंबेडकरांकडून मराठा समाजातील विविध संघटनांशी बोलणी सुरु होती. त्यात मनोज जरांगेंकडून मराठा समाजातील उमेदवार उभे करण्यासंदर्भात चाचपणी सुरु होती. मात्र, जरांगेंनी उमेदवार न देता आपण विधानसभा निवडणुकीवेळी भूमिका जाहीर करु सांगितलं. त्यामुळे वंचितसह तिसऱ्या आघाडीची शक्यता देखील मावळली आहे. 

वंचितचा फायदा नेमका कोणाला? 

  • वंचितनं 2019 साली लोकसभा निवडणुकीत जवळपास 7 टक्के मतदान घेतलं आहे. 
  • वंचित आघाडीला 48 पैकी 13 मतदारसंघात एक लाखांहून अधिक मतदान घेतलं होतं.
  • ज्याचा मोठा फटका राष्ट्रवादी आणि कांग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बसला होता. 
  • जवळपास आठ मतदारसंघात वंचितनं घेतलेल्या मतदानामुळे कांग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होतं.
  • यामध्ये सांगली, हातकणंगले, सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली, अकोला आणि बुलढाण्यासारख्या जागांवर महाविकास आघाडीला फटका बसला.
  • भाजपला फक्त चंद्रपूरची जागा सोडता वंचितमुळे इतरत्र फायदा झाल्याचं दिसलं.
  • चंद्रपूरच्या जागेवर वंचितच्या उमेदवाराने एक लाखांहून अधिक मतदान घेऊनही जवळपास 44 हजारांनी अहिरांनी मात खाल्ली.

प्रकाश आंबेडकरांची भूमिका नेमकी कुणासाठी?

महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना पाच जागांचा प्रस्ताव देऊ केला होता. मात्र, आंबेडकरांनी त्याला नकार दिला होता. अशात, तिसरी आघाडीचा प्रयत्न होताना एकाच वेळी ओबीसी आणि मराठा समाजाला बसवण्याचा फॉर्म्युला आंबेडकरांकडून केला जातोय. 2019 साली एमआयएम आणि वंचित आघाडी एकत्र आल्याने मोठा फटका आघाडीला बसला होता. अशात, 2024 साली वंचितच्या ह्या फॉर्म्युल्याचा कोणाला फायदा होतोय आणि कोणाला तोटा हे बघणं महत्त्वाचं असेल. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Himani Narwal : हातावर मेहंदी, गळ्याला ओढणी अन् नाकातून रक्त, काँग्रेस महिला नेत्याच्या हत्येनं खळबळ; राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी
हातावर मेहंदी, गळ्याला ओढणी अन् नाकातून रक्त, काँग्रेस महिला नेत्याच्या हत्येनं खळबळ; राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी
Zelensky meets Starmer in UK : डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वादाचा कडेलोट होताच झेलेन्स्की पोहोचले इंग्लंडमध्ये; गळाभेट झाली, पीएम स्टार्मर काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वादाचा कडेलोट होताच झेलेन्स्की पोहोचले इंग्लंडमध्ये; गळाभेट झाली, पीएम स्टार्मर काय म्हणाले?
Beed: शेततळ्याच्या पाण्यावर 3 गुंठ्यात अवैध अफूचे पीक, बीडमध्ये 50 गोण्या अफू जप्त, शेतकऱ्याच्या मुसक्या आवळल्या
शेततळ्याच्या पाण्यावर 3 गुंठ्यात अवैध अफूचे पीक, बीडमध्ये 50 गोण्या अफू जप्त
Jayant Patil : आताचे अधिवेशन माझ्यासाठी बरं जाणार, जयंत पाटलांची राहुल नार्वेकरांसमोरच जोरदार टोलेबाजी; नेमकं काय घडलं?
आताचे अधिवेशन माझ्यासाठी बरं जाणार, जयंत पाटलांची राहुल नार्वेकरांसमोरच जोरदार टोलेबाजी; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 02 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 02 March 2024 : Maharashtra News : ABP MajhaHSRP प्लेटआडून सर्वसामान्यांची सूट? Transport commissioner Vivek Bhimanwar EXCLUSIVEABP Majha Headlines : 08 AM : 02 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Himani Narwal : हातावर मेहंदी, गळ्याला ओढणी अन् नाकातून रक्त, काँग्रेस महिला नेत्याच्या हत्येनं खळबळ; राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी
हातावर मेहंदी, गळ्याला ओढणी अन् नाकातून रक्त, काँग्रेस महिला नेत्याच्या हत्येनं खळबळ; राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी
Zelensky meets Starmer in UK : डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वादाचा कडेलोट होताच झेलेन्स्की पोहोचले इंग्लंडमध्ये; गळाभेट झाली, पीएम स्टार्मर काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वादाचा कडेलोट होताच झेलेन्स्की पोहोचले इंग्लंडमध्ये; गळाभेट झाली, पीएम स्टार्मर काय म्हणाले?
Beed: शेततळ्याच्या पाण्यावर 3 गुंठ्यात अवैध अफूचे पीक, बीडमध्ये 50 गोण्या अफू जप्त, शेतकऱ्याच्या मुसक्या आवळल्या
शेततळ्याच्या पाण्यावर 3 गुंठ्यात अवैध अफूचे पीक, बीडमध्ये 50 गोण्या अफू जप्त
Jayant Patil : आताचे अधिवेशन माझ्यासाठी बरं जाणार, जयंत पाटलांची राहुल नार्वेकरांसमोरच जोरदार टोलेबाजी; नेमकं काय घडलं?
आताचे अधिवेशन माझ्यासाठी बरं जाणार, जयंत पाटलांची राहुल नार्वेकरांसमोरच जोरदार टोलेबाजी; नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे कुंभला का गेले नाहीत विचारता, हाच प्रश्न मोहन भागवतांना विचारण्याची हिंमत दाखवावी, भाजपचा बॉस हिंदू नाही का? संजय राऊतांचा सवाल
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे कुंभला का गेले नाहीत विचारता, हाच प्रश्न मोहन भागवतांना विचारण्याची हिंमत दाखवावी, भाजपचा बॉस हिंदू नाही का? संजय राऊतांचा सवाल
Bhiwandi Accident : इंटरनेटची केबल दुचाकीत अडकली अन् दोन जण फरफटत गेले, एकाचा दुर्दैवी अंत; भिवंडीतील धक्कादायक घटना
इंटरनेटची केबल दुचाकीत अडकली अन् दोन जण फरफटत गेले, एकाचा दुर्दैवी अंत; भिवंडीतील धक्कादायक घटना
PM नरेंद्र मोदींकडून बारामतीचा पुन्हा खास उल्लेख; शरद पवारांची आठवण सांगत सुप्रिया सुळेंनी मानले आभार
PM नरेंद्र मोदींकडून बारामतीचा पुन्हा खास उल्लेख; शरद पवारांची आठवण सांगत सुप्रिया सुळेंनी मानले आभार
Uttarakhand Avalanche : उत्तराखंड हिमस्खलनात 50 मजुरांना बाहेर काढले, 4 जणांचा मृत्यू, पाच जणांचा अजूनही शोध सुरू; जखमींच्या डोक्याला गंभीर इजा
उत्तराखंड हिमस्खलनात 50 मजुरांना बाहेर काढले, 4 जणांचा मृत्यू, पाच जणांचा अजूनही शोध सुरू; जखमींच्या डोक्याला गंभीर इजा
Embed widget