एक्स्प्लोर

Fishermen Protest : नव्या कायद्याला विरोध, रत्नागिरीत पर्ससीन नेट मच्छीमारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससिन मच्छिमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मिरकरवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात चार ते पाच हजार मच्छीमार सहभागी झाले होते.

रत्नागिरी : राज्य सरकारने काढलेला नवा मच्छीमारी कायदा हा मच्छीमारांसाठी मारक आहे. या विरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससिन मच्छिमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मिरकरवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात चार ते पाच हजार मच्छीमार सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येताच हजारो मच्छीमारांनी 'समुद्र आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा...', 'हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा', अशा घोषण देऊन परिसर दणाणून सोडला.

संपूर्ण जिल्ह्यातून मच्छीमार, नौका मालक आणि या मासेमारीवर अवलंबून असलेले उद्योजक, व्यावसायिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. नव्याने गठीत झालेल्या समितीने केवळ पर्ससीन नेट मासेमारीला लक्ष्य करु नये. इतरही जाळ्यांद्वारे होणार्‍या मासेमारीचा विचार केला जावा, या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित काढला आहे.

आम्हाला आकारला जात असलेला दंड, केवळ चारच महिने मच्छीमारीला असलेली परवानगी शिवाय मच्छीमारी करण्यासाठी असलेले बंधन हे नवीन कायद्यातील नियम मच्छीमारांसाठी मारक आहेत. त्याबाबत सरकारने फेरविचार करावा. अन्यथा आगामी काळात थेट मुंबईत मंत्रालयावर धडकू असा थेट इशारा मच्छीमारांनी दिला आहे.

राज्य सरकारच्या कायद्यात एलईडी आणि पर्ससिन नेटमार्फत होणाऱ्या अवैध मासेमारीविरोधात कठोर कारवाईची तरतूद आहे. पर्ससिन मच्छीमारांनी या कायद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. "राज्य सरकारने एकच कॅटेगरीला टार्गेट करुन कायदा काढला आहे. इतर मासेमारी जाळ्यांनी होणार्‍या मासेमारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. कायद्यानुसार आमच्यावर जे निर्बंध लावले आहेत, त्याबाबत निवेदन देऊन, साखळी उपोषण करुनही दखल न घेतल्याने आम्ही भव्य मोर्चा काढला आहे," अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे.

अस्लम शेख यांनी आमच्यासाठी काही केलेलं नाही, त्यांनी राजीनामा द्यावा : आंदोलक

"आमच्या मागणी तातडीने पूर्ण व्हायला हव्या आहेत, अन्यथा आम्ही आणखी भव्य मोर्चा काढू. सरकारविरोधात, अस्लम शेखविरोधात मोर्चा काढणार. अस्लम शेख यांनी आमच्यासाठी काहीही केलेलं नाही. त्यांना केवळ त्यांच्या वोटबँकेची चिंता आहे. अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा," अशी उद्विग्न प्रतिक्रिया मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलक मच्छीमाराने दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
KKR vs RCB : पहिल्याच सामन्यात दारुण पराभव का झाला? अजिंक्य रहाणे टीम कुठं चुकली ते सांगत म्हणाला... आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत....
केकेआरच्या हातातून मॅच कधी निसटली, अजिंक्य रहाणेनं टर्निंग पॉईंट सांगितला, म्हणाला....
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण समोर, सीबीआयच्य अंतिम अहवालात काय?ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha 23 March 2025Malhar Certificate Jejuri | मल्हार सर्टिफिकेट नावाला जेजुरी ग्रामस्थांचा विरोध, गावकरी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
KKR vs RCB : पहिल्याच सामन्यात दारुण पराभव का झाला? अजिंक्य रहाणे टीम कुठं चुकली ते सांगत म्हणाला... आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत....
केकेआरच्या हातातून मॅच कधी निसटली, अजिंक्य रहाणेनं टर्निंग पॉईंट सांगितला, म्हणाला....
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Embed widget