एक्स्प्लोर

Nagpur Violance : नागपूर हिंसाचाराच्या घटनेला आठवडा पूर्ण! प्रभावित क्षेत्रात संचारबंदी जैसे थे; पोलिस आयुक्तांचे नवे निर्देश काय?  

Nagpur Violance Update : नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेला आज (23 मार्च) सात दिवस पूर्ण झाले आहे. तरीही आज सातव्या दिवशी नागपूरच्या चार पोलीस ठाणे हद्दीत संचाबंदी कायम आहे.

Nagpur Violance Update : नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेला आज (23 मार्च) सात दिवस पूर्ण झाले आहे. राज्याच्या उपराजधानीत कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात दोन गटात दंगल उसळली. औरंगजेबच्या कबर प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर गेल्या सोमवारी सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक जाळपोळ आणि हिंसाचार झाल्याची घटना घडली. नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत (Nagpur Violence) अनेकांचे मोठे नुकसान ही झाले. या हिंसाचाराची दाहकता अजूनही पीडित नागरिकांना भयभीत करणारी ठरते आहे. 

दुसरीकडे, नागपुरातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी घटनेवर पूर्णत: नियंत्रण मिळवत टप्प्या-टप्प्यात आता शहर पूर्ववत होतंय. मात्र ज्या भगत हिंसाचाराची घटना घडली त्या प्रभावित क्षेत्रात सातव्या दिवशीही संचारबंदी 'जैसे थे' च असल्याचे चित्र आहे. परिस्थितीचा आढावा घेऊनच पोलीस प्रशासन आता सावध पवित्रा घेत असल्याचे बघायला मिळते आहे.

पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी उठवली

नागपूर शहरात आज सातव्या दिवशी नागपूरच्या चार पोलीस ठाणे हद्दीत संचाबंदी कायम आहे. यात शहरातील गणेशपेठ, तहसील, कोतवाली आणि यशोधरानगर या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम असून सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. रात्री 10नंतर या हद्दीत संचार बंदी कायम असणार आहे. दोन पोलीस ठाणे हद्दीतील संचारबंदी आधीच हटवली आहे. त्यानंतर आता नागपूरातील पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटविण्यात आली आहे. पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचार बंदी पूर्णतः हटविण्यात आली. तर संचारबंदी भागात बाजारपेठा , सर्व सरकारी खाजगी आस्थापने पूर्णतः बंद असणार आहे. असे आदेश नागपूर पोलीस आयुक्तांनी काढले आहेत.

 104 दंगलखोरांची ओळख पटली, अद्दल घडवल्याशिवाय सोडणार नाही- मुख्यमंत्री 

नागपुरातील हिंसाचाराच्या प्रकरणात आतापर्यंत 104 दंगलखोरांची ओळख पटली आहे. त्यापैकी 92 जणांना अटक केली आहे. तर 12 जण अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरही विधिसंघर्षित कायद्यानुसार कारवाई सुरु आहे. संपूर्ण प्रकरणात आम्ही बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र हिंसाचार करणाऱ्या कुणालाही या प्रकरणातून सोडले जाणार नाही. पोलिसांवर हल्ला करणे हे अतिशय गंभीर बाब असून अशा हल्लेखोरांना जर सोडलं तर हे कायदा आणि सुव्यवस्था या दृष्टीने योग्य नाही. परिणामी त्यांना अद्दल घडवल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
KKR vs RCB : पहिल्याच सामन्यात दारुण पराभव का झाला? अजिंक्य रहाणे टीम कुठं चुकली ते सांगत म्हणाला... आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत....
केकेआरच्या हातातून मॅच कधी निसटली, अजिंक्य रहाणेनं टर्निंग पॉईंट सांगितला, म्हणाला....
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण समोर, सीबीआयच्य अंतिम अहवालात काय?ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha 23 March 2025Malhar Certificate Jejuri | मल्हार सर्टिफिकेट नावाला जेजुरी ग्रामस्थांचा विरोध, गावकरी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
KKR vs RCB : पहिल्याच सामन्यात दारुण पराभव का झाला? अजिंक्य रहाणे टीम कुठं चुकली ते सांगत म्हणाला... आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत....
केकेआरच्या हातातून मॅच कधी निसटली, अजिंक्य रहाणेनं टर्निंग पॉईंट सांगितला, म्हणाला....
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Embed widget