एक्स्प्लोर
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
Mumbai news Water cut: मुंबईच्या धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा; महापालिकेने राज्य सरकारकडे राखीव साठ्यासाठी मागणी केली आहे. पावसाने ओढ दिल्यास अडचण होणार.

Mumbai Water Supply
1/7

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये आता एकूण 39 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाचे अंदाजित वेळापत्रक पाहता पालिकेला हा पाणीसाठा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पुरवावा लागणार आहे.
2/7

धरणांमधील पाणीसाठा वेगाने आटत गेल्यास मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने खबरदारी म्हणून आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली आहे.
3/7

मान्सूनचा पाऊस लांबल्यास मुंबई महापालिकेला धरण आणि तलावांमधील राखीव पाणीसाठ्याचा वापर करावा लागेल.
4/7

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमध्ये सध्या एकूण 5 लाख 66 हजार 599 दशलक्ष लिटर पाणी आहे. ही धरणे एकूण 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याच्या क्षमतेची आहेत.
5/7

सध्याचा पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त असला, तरी आगामी काळात पाणी पुरेसं राहील का, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
6/7

मुंबईला दररोज सरासरी 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे उपलब्ध साठा कमी झाल्यास टप्प्याटप्प्याने पाणीकपात करण्याची वेळ येऊ शकते.
7/7

पावसाळ्यापूर्वी पाणीकपात झाल्यास मुंबईकरांना अडचणीचा सामना करावा लागेल. अनेक इमारतींना टँकर्सने पाणीपुरवठा करावा लागू शकतो.
Published at : 23 Mar 2025 07:57 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion