एक्स्प्लोर

Mantralay : मंत्रालयातील प्रशासकीय कारभार का सुस्तावला?

Mantralay : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सोडता राज्यात कुठल्याच विभागाला मंत्री नसल्याने मंत्रालयात अभ्यंगतांची वर्दळ कमी आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी सर्वाधिक वेळ मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेत, राज्याचा कारभार करायला सुरुवात केली. मात्र याला जवळपास महिना होत आला, तरी  मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) तिढा कायम आहे. त्यात राज्याचा गाडा ज्या मंत्रालयात हाकला जातो, तेथील प्रशासकिय कारभार सुस्तावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सध्या मंत्रालयात (Mantralay) सर्वत्र ही परिस्थिती 

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सोडता राज्यात कुठल्याच विभागाला मंत्री नसल्याने मंत्रालयात अभ्यंगतांची वर्दळ कमी आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी सर्वाधिक वेळ मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर काही कर्मचारी काम सोडून गप्पा गोष्टी करण्यात व्यस्त असल्याचे दृश्य मंत्रालयात सर्वत्र पहायला मिळते. मंत्री नाहीत, तोपर्यंत येऊ नका असे काही कर्मचारी व अधिकारी कामानिमित्त येणाऱ्या अभ्यंगतांना सांगतात असे काही कामानिमित्त आलेले लोकं सांगतात.


Mantralay : मंत्रालयातील प्रशासकीय कारभार का सुस्तावला?

मोबाईल वापराबाबत राज्य शासनाच्या सूचना पण...

आताच्या काळात सुलभ आणि वेगवान संपर्क माध्यम म्हणून प्रशासकीय कामात मोबाईलचा वापर अपरिहार्य बनला आहे. मोबाईलच्या वापराबाबत काही संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांकडून नियम पाळले  जात नाही असे  अभ्यंगत सांगतात.  परिणामी शासनाची प्रतिमा काही प्रमाणात मलिन होते. शासकीय कामकाज करताना मोबाईल वापराबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 23 जुलै 2021 रोजी सूचना दिले आहे. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे याचे परिणाम प्रशासकिय कामकाजावर होत आहेत.

मंत्रालयात येणारे लोकं संतप्त

मंत्रालयात राज्यभरातून अनेक सर्वसामान्य लोक आपली अनेक कामे घेऊन येत आहेत. मात्र ती काम मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्यामुळे करण्यास कर्मचारी व अधिकारी नकार देत आहेत. तसेच काही कर्मचारी हे मोबाईलवर व्यस्त असतात त्यामुळे त्यांना खूप वेळ  उभे राहून त्यांना विनंती करावी लागते त्यामुळे आता आम्हाला वाली कोण? हा प्रश्न आम्हाला पडलाय असे मुरबाडहून आलेले हरिश्चंद्र जाधव सांगतात.

कर्मचारी व अधिकारी द्विधा मनस्थितीत

यावर अनौपचारिक बोलताना अधिकारी व कर्मचारी म्हणतात की,मंत्रीच नसतील तर कसे निर्णय घ्यायचे. आज निर्णय घेतले आणि उद्या नव्याने येणाऱ्या मंत्र्यांना ते मान्य नसतील, तर काय करायचं. सध्याची स्थिती तात्काळ निर्णय किंवा काम करण्यासारखी नाही. अनेक प्रकरणावर स्थगिती मिळत आहे, त्यामुळे आम्ही काय करायचं आम्हाला प्रश्न आहे असे  मंत्रालयातील अनेक कर्मचारी व अधिकारी सांगतात.

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! अप्पर जिल्हाधिकाऱ्यास एसीबीकडून रंगेहात अटक; नवी मुंबईत 22 हजारांची लाच घेताना पकडले
मोठी बातमी! अप्पर जिल्हाधिकाऱ्यास एसीबीकडून रंगेहात अटक; नवी मुंबईत 22 हजारांची लाच घेताना पकडले
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक

व्हिडीओ

Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?
Nitin Gadkari News : नितीन गडकरी पालखी मार्गावेळी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 टक्के गाड्या कमी
Jaleel On Sanjay Shirsat : त्यांना लिंबू पाण्याची सवय नाही, देसी नको इंग्लिश घ्या, जलील यांचा शिरसाटांना टोला | ABP Majha
Sunil Shelke Mumbai : भाजपसोबत जाणार का? रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळके काय म्हणाले?
Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मोठी बातमी! अप्पर जिल्हाधिकाऱ्यास एसीबीकडून रंगेहात अटक; नवी मुंबईत 22 हजारांची लाच घेताना पकडले
मोठी बातमी! अप्पर जिल्हाधिकाऱ्यास एसीबीकडून रंगेहात अटक; नवी मुंबईत 22 हजारांची लाच घेताना पकडले
Amul Milk Price Hike : महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची चर्चा असतानाच अमूलकडून देशभरात दरवाढ लागू, अमूल दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार
महागाईचा भडका,अमूलकडून देशभरात दरवाढ लागू, अमूल दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2026 | बुधवार
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
सिंधुदुर्गातील ह्रदयद्रावक घटना, अंघोळीला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, सुदैवाने दोघे बचावले
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
भाजप संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली; जून महिन्यात तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण होणार
ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
ठाणे कोर्टात हजर, 2008 च्या आंदोलानाचा खटला; न्यायमूर्तींचे राज ठाकरेंना 7 प्रश्न, मनसेप्रमुखांनी दिली थोडक्यात उत्तरे
Embed widget