एक्स्प्लोर

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टात भाजपचा लोकशाही, राजकीय आणि नैतिकतेच्या आघाडीवर पराभव; ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवींची प्रतिक्रिया

Maharashtra Politics Abhishek Manu Singhvi: सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निकालात भाजपचा पराभव झाला असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी दिली आहे.

Maharashtra Political Crisis: आज भाजपचा (BJP) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) नैतिकता, लोकशाही आणि राजकीयदृष्ट्या पराभव झाला असल्याची प्रतिक्रिया सत्तासंघर्ष प्रकरणात ठाकरेंची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी दिली आहे. आज सुप्रीम कोर्टात घटनापीठाने दोन महत्त्वाचे निर्णय दिले आहे. या दोन्ही निकालात भाजपचा नैतिकदृष्ट्या पराभव झाला असल्याचे अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले. 

दिल्ली सरकार विरुद्ध केंद्र सरकार आणि आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात घटनापीठाने आपला निकाल सुनावला. या निकालानंतर अभिषेक मनू सिंघवी यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, आज भाजपाचा अनेक आघाड्यांवर पराभव झाला आहे. 
लोकशाही मूल्य, राजकीय, नैतिकदृष्ट्या पराभव झाला आहे. तर, दिल्ली आणि महाराष्ट्राच्या प्रकरणात लोकशाही मूल्यांचा विजय झाला असल्याचे त्यांनी म्हटले. 

भाजपकडून सातत्याने देशाच्या संघराज्य रचनेवर हल्ला सुरू आहे.  दिल्ली प्रकरणाच्या निकालातून दिल्ली सरकारला मोठा दिलासा मिळाला असून केंद्र सरकारला झटका बसला असल्याचे सिंघवी यांनी म्हटले. 

लोकशाहीमध्ये राज्य कसं चालवू नये हा भाजपला सुप्रीम कोर्टाने सांगितले असल्याचा टोला सिंघवी यांनी लगावला. 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणात महत्त्वाचे निर्देश ठाकरे गटाच्या बाजूने असल्याचा दावा सिंघवी यांनी केला. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या काही महत्त्वाच्या निर्देशाकडे त्यांनी लक्ष वेधले. सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निकालानुसार,  व्हीप हा राजकीय पक्षांचा असतो विधिमंडळ पक्षाचा नाही हे स्पष्ट झाले. शिंदे गटाने जारी केलेला व्हीप हा बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले.  विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला मान्यता दिली ते बेकायदेशीर ठरवले असल्याचे त्यांनी म्हटले. 

राज्यपालांच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. बहुमत चाचणीचा आदेश चुकीचा होता. विधानसभा अध्यक्षांना आता अपात्रेतवर निर्णय घ्यावा लागणार आहे.  हा निर्णय त्यांना तातडीने घ्यावा लागणार आहे. विधानसभा अध्यक्षांनीबेकायदेशीर व्हीपला मंजुरी दिली आणि कायदेशीर व्हीपला फेटाळून लावले असल्याचे सिंघवी यांनी म्हटले. 

आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे भाजपचा खरा चेहरा उघड पडला असल्याचे सिंघवी यांनी म्हटले. आता आमदारांच्या अपात्रतेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र. भाजपकडून आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाबाबत कसा उशीर होईल, यासाठी जोर लावला जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

इतर संबंधित बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM नरेंद्र मोदींकडून बारामतीचा पुन्हा खास उल्लेख; शरद पवारांची आठवण सांगत सुप्रिया सुळेंनी मानले आभार
PM नरेंद्र मोदींकडून बारामतीचा पुन्हा खास उल्लेख; शरद पवारांची आठवण सांगत सुप्रिया सुळेंनी मानले आभार
Uttarakhand Avalanche : उत्तराखंड हिमस्खलनात 50 मजुरांना बाहेर काढले, 4 जणांचा मृत्यू, पाच जणांचा अजूनही शोध सुरू; जखमींच्या डोक्याला गंभीर इजा
उत्तराखंड हिमस्खलनात 50 मजुरांना बाहेर काढले, 4 जणांचा मृत्यू, पाच जणांचा अजूनही शोध सुरू; जखमींच्या डोक्याला गंभीर इजा
... तर मढी गावाने जो निर्णय घेतलाय तो भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल; मंत्री नितेश राणेंचा बीडीओंनाही इशारा
... तर मढी गावाने जो निर्णय घेतलाय तो भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल; मंत्री नितेश राणेंचा बीडीओंनाही इशारा
युक्रेन-रशिया युद्धावरून झेलेन्स्की आणि ट्रम्प भिडले असतानाच तिकडं एक युद्ध तरी थांबलं! हत्यारे ठेवली, वेगळ्या देशाच्या मागणीने गेल्या 40 वर्षात 40 हजार जणांचा जीव गेला
युक्रेन-रशिया युद्धावरून झेलेन्स्की आणि ट्रम्प भिडले असतानाच तिकडं एक युद्ध तरी थांबलं! हत्यारे ठेवली, वेगळ्या देशाच्या मागणीने गेल्या 40 वर्षात 40 हजार जणांचा जीव गेला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 01 March 2025Special Report | Trump And trump Zelensky Fight | अमे This Triggered Trump-Zelensky Clashआणि युक्रेनमध्ये का रे दुरावा?Special Report | Navi Recharge App | एक रुपयात मोबाईल रिचार्जचा काय आहे स्कॅम? अ‍ॅपची ऑफर, फसवणुकीचा ट्रॅपSpecial Report | Vehicle Number Plate | नंबर प्लेटआडून कमाई, 'रेड सिग्नल' कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM नरेंद्र मोदींकडून बारामतीचा पुन्हा खास उल्लेख; शरद पवारांची आठवण सांगत सुप्रिया सुळेंनी मानले आभार
PM नरेंद्र मोदींकडून बारामतीचा पुन्हा खास उल्लेख; शरद पवारांची आठवण सांगत सुप्रिया सुळेंनी मानले आभार
Uttarakhand Avalanche : उत्तराखंड हिमस्खलनात 50 मजुरांना बाहेर काढले, 4 जणांचा मृत्यू, पाच जणांचा अजूनही शोध सुरू; जखमींच्या डोक्याला गंभीर इजा
उत्तराखंड हिमस्खलनात 50 मजुरांना बाहेर काढले, 4 जणांचा मृत्यू, पाच जणांचा अजूनही शोध सुरू; जखमींच्या डोक्याला गंभीर इजा
... तर मढी गावाने जो निर्णय घेतलाय तो भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल; मंत्री नितेश राणेंचा बीडीओंनाही इशारा
... तर मढी गावाने जो निर्णय घेतलाय तो भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल; मंत्री नितेश राणेंचा बीडीओंनाही इशारा
युक्रेन-रशिया युद्धावरून झेलेन्स्की आणि ट्रम्प भिडले असतानाच तिकडं एक युद्ध तरी थांबलं! हत्यारे ठेवली, वेगळ्या देशाच्या मागणीने गेल्या 40 वर्षात 40 हजार जणांचा जीव गेला
युक्रेन-रशिया युद्धावरून झेलेन्स्की आणि ट्रम्प भिडले असतानाच तिकडं एक युद्ध तरी थांबलं! हत्यारे ठेवली, वेगळ्या देशाच्या मागणीने गेल्या 40 वर्षात 40 हजार जणांचा जीव गेला
इकडं इंद्रजित सावंतांना धमकी देताच माझा आवाज नाही म्हणणारा प्रशांत कोरटकर फरार अन् तिकडं कुटुंबीय म्हणाले, धमक्या मिळाल्या, पण पोलिस तक्रारीत उल्लेखच नाही!
इकडं इंद्रजित सावंतांना धमकी देताच माझा आवाज नाही म्हणणारा प्रशांत कोरटकर फरार अन् तिकडं कुटुंबीय म्हणाले, धमक्या मिळाल्या, पण पोलिस तक्रारीत उल्लेखच नाही!
बायकोचा प्रियकरासोबत राहण्यासाठी तगादा, TCS मॅनेजरनं लाईव्ह व्हिडिओ करत आयुष्य संपवलं; आता बायको व्हिडिओ रिलीज करत म्हणाली, 'तो माझा प्रियकर होता, पण...'
बायकोचा प्रियकरासोबत राहण्यासाठी तगादा, TCS मॅनेजरनं लाईव्ह व्हिडिओ करत आयुष्य संपवलं; आता बायको व्हिडिओ रिलीज करत म्हणाली, 'तो माझा प्रियकर होता, पण...'
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
Santosh Deshmukh Case : अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
Embed widget