एक्स्प्लोर

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टात भाजपचा लोकशाही, राजकीय आणि नैतिकतेच्या आघाडीवर पराभव; ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवींची प्रतिक्रिया

Maharashtra Politics Abhishek Manu Singhvi: सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निकालात भाजपचा पराभव झाला असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी दिली आहे.

Maharashtra Political Crisis: आज भाजपचा (BJP) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) नैतिकता, लोकशाही आणि राजकीयदृष्ट्या पराभव झाला असल्याची प्रतिक्रिया सत्तासंघर्ष प्रकरणात ठाकरेंची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी दिली आहे. आज सुप्रीम कोर्टात घटनापीठाने दोन महत्त्वाचे निर्णय दिले आहे. या दोन्ही निकालात भाजपचा नैतिकदृष्ट्या पराभव झाला असल्याचे अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले. 

दिल्ली सरकार विरुद्ध केंद्र सरकार आणि आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात घटनापीठाने आपला निकाल सुनावला. या निकालानंतर अभिषेक मनू सिंघवी यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, आज भाजपाचा अनेक आघाड्यांवर पराभव झाला आहे. 
लोकशाही मूल्य, राजकीय, नैतिकदृष्ट्या पराभव झाला आहे. तर, दिल्ली आणि महाराष्ट्राच्या प्रकरणात लोकशाही मूल्यांचा विजय झाला असल्याचे त्यांनी म्हटले. 

भाजपकडून सातत्याने देशाच्या संघराज्य रचनेवर हल्ला सुरू आहे.  दिल्ली प्रकरणाच्या निकालातून दिल्ली सरकारला मोठा दिलासा मिळाला असून केंद्र सरकारला झटका बसला असल्याचे सिंघवी यांनी म्हटले. 

लोकशाहीमध्ये राज्य कसं चालवू नये हा भाजपला सुप्रीम कोर्टाने सांगितले असल्याचा टोला सिंघवी यांनी लगावला. 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणात महत्त्वाचे निर्देश ठाकरे गटाच्या बाजूने असल्याचा दावा सिंघवी यांनी केला. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या काही महत्त्वाच्या निर्देशाकडे त्यांनी लक्ष वेधले. सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निकालानुसार,  व्हीप हा राजकीय पक्षांचा असतो विधिमंडळ पक्षाचा नाही हे स्पष्ट झाले. शिंदे गटाने जारी केलेला व्हीप हा बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले.  विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला मान्यता दिली ते बेकायदेशीर ठरवले असल्याचे त्यांनी म्हटले. 

राज्यपालांच्या भूमिकेवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. बहुमत चाचणीचा आदेश चुकीचा होता. विधानसभा अध्यक्षांना आता अपात्रेतवर निर्णय घ्यावा लागणार आहे.  हा निर्णय त्यांना तातडीने घ्यावा लागणार आहे. विधानसभा अध्यक्षांनीबेकायदेशीर व्हीपला मंजुरी दिली आणि कायदेशीर व्हीपला फेटाळून लावले असल्याचे सिंघवी यांनी म्हटले. 

आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे भाजपचा खरा चेहरा उघड पडला असल्याचे सिंघवी यांनी म्हटले. आता आमदारांच्या अपात्रतेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र. भाजपकडून आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाबाबत कसा उशीर होईल, यासाठी जोर लावला जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

इतर संबंधित बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget