एक्स्प्लोर

...तर OBC आरक्षणच रद्द होऊ शकते, मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये खळबळ

Manoj Jarange : छगन भुजबळ यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाला होणाऱ्या विरोधाला पाहता जरांगे यांनी हा इशारा दिला आहे.

रायगड : मराठा आरक्षणाचबाबत (Maratha Reservation) सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) विरुद्ध ओबीसी नेते असा वाद आता टोकाला पोहचला आहे. अशात आता मनोज जरांगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) विरोधातच न्यायालयात याचिका दाखल करून ओबीसी आरक्षणच रद्द करण्याचा इशारा दिला आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाला होणाऱ्या विरोधाला पाहता जरांगे यांनी हा इशारा दिला आहे. मनोज जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये खळबळ उडाली आहे. 

दरम्यान याबाबत बोलतांना जरांगे म्हणाले की, आम्हाला ओबीसी बांधवांच्या लेकरांचं वाटोळ करायचं नाही. गोरगरिबांच्या मुलांच्या ताटात माती कालवायची नाही. मात्र, तो (छगन भुजबळ) जर आमच्या अन्नात माती कालवत असेल, तर तुमचं वाटोळं त्याच्यामुळे होत असल्याचं गाव खेड्यातील ओबीसी बांधवांनी समजून घ्यायला पाहिजे. नाईलाजाने मला ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावे लागेल. कारण त्यांचा सुद्धा कोणताही अहवाल स्वीकारलेला नाही. आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास हे आणून द्यावा लागेल. त्यामुळे त्यांचा देखील देशातील संपूर्ण 27 टक्के आरक्षण रद्द होऊ शकते. हे फक्त त्याच्या एकट्यामुळे (छगन भुजबळ) एवढ्या लोकांचा वाटोळं होऊ शकतं, असे जरांगे म्हणाले.

नाईलाजाने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करावी लागणार...

पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की,"आमचं हक्काचा आरक्षण आहे. आमच्या कुणबी नोंदी सापडल्या आहे. त्यामुळे आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत. त्यामुळे आमच्या अन्नात त्याने माती कालवण्याचं प्रयत्न करू नये. गाव खेड्यातील ओबीसी बांधवांनी त्याला हे समजून सांगावं. अन्यथा ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हालाही नाईलाजाने याचिका दाखल करून हे आरक्षण रद्द करावे लागणार आहे आणि ते रद्द देखील होणार असल्याचा,” दावा जरांगे यांनी केला आहे. 

तो आता बधिर झाला आहे...

कुणी कार्यक्रम घ्यावा किंवा नाही घ्यावा हा लोकशाहीने अधिकार आहे. मात्र, येवल्याचा तो जसा इकडं तिकडं फिरतो त्याप्रमाणे आम्ही नाही. त्यांनी कार्यक्रम घेतला म्हणून आम्ही घ्यायचं यात आम्ही मोडत नाही. तो आता बधिर झाला आहे. मराठा समाजाला आरक्षणात येऊ द्यायचं नाही हे त्याचं स्वप्न होतं. आता दोन करोड मराठे आम्ही आरक्षणात नेऊन घातले. थोडे राहिले ते देखील जाणार आहे. त्यामुळे तो पागल झाला आहे. माझं काही चालत नसल्याचं त्याला वाटत आहे. त्याची नियतच खराब आहे. आमच्या कालच्या कायद्यामुळे ओबीसी समाजातील सर्वच सगेसोयऱ्यांना देखील फायदा होणार आहे. आमची नियत खराब नाही, अन्यथा सगेसोयरे कायदा फक्त मराठा समाजापुरता केला असता. गोरगरीब ओबीसींचा कल्याण होत असेल तर होऊ द्या अशी आमची भावना आहे. पण, त्याचं तसं नाही, तो झालाय पागल, त्याच्यामुळे ओबीसींनी त्याच्या नादी लागू नये अशी माझी विनंती असल्याचं जरांगे म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange: 5 महिने अन् 3 दिवसांचा लढा यशस्वी; आधी शिवरायांच्या समाधीचं दर्शन, मग धरणार अंतरवाली सराटीची वाट; मनोज जरांगे घरी परतणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli and Anushka Sharma : '..लव्ह यू ', विराटचं शतक होताचं अनुष्काच्या स्टोरीने लक्ष वेधलं
'..लव्ह यू ', विराटचं शतक होताचं अनुष्काच्या स्टोरीने लक्ष वेधलं
Beed : वाल्मिक कराडचा निकटवर्तीय बालाजी तांदळे रडारवर, त्याच्याच कारमधून आरोपींचा शोध घेणारे बीड पोलिस संशयाच्या भोवऱ्यात
वाल्मिक कराडचा निकटवर्तीय बालाजी तांदळे रडारवर, त्याच्याच कारमधून आरोपींचा शोध घेणारे बीड पोलिस संशयाच्या भोवऱ्यात
India vs Pakistan : 151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 23 February 2025Special Report Anjali Damania On Beed Police : बीड पोलीस, आरोपीच्या पिंजऱ्यात; दमानियांच्या रडारवर बालाजी तांदळेTeam India Win | भारतीय संघाने उडवला पाकचा धुव्वा, क्रिकेटप्रेमींचा मोठा उत्साह IND VS PAKSpecial Report Neelam Gorhe On Uddhav Thackeray : साहित्याचा मंच आरोपांची मर्सिडीज; 'एका पदासाठी दोन मर्सिडीज'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli and Anushka Sharma : '..लव्ह यू ', विराटचं शतक होताचं अनुष्काच्या स्टोरीने लक्ष वेधलं
'..लव्ह यू ', विराटचं शतक होताचं अनुष्काच्या स्टोरीने लक्ष वेधलं
Beed : वाल्मिक कराडचा निकटवर्तीय बालाजी तांदळे रडारवर, त्याच्याच कारमधून आरोपींचा शोध घेणारे बीड पोलिस संशयाच्या भोवऱ्यात
वाल्मिक कराडचा निकटवर्तीय बालाजी तांदळे रडारवर, त्याच्याच कारमधून आरोपींचा शोध घेणारे बीड पोलिस संशयाच्या भोवऱ्यात
India vs Pakistan : 151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती
घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती
Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
Embed widget