एक्स्प्लोर

काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपुरात "हैं तैयार हम" महारॅली, लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकणार

103 वर्षानंतर काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा नागपुरात होत असल्यामुळे विदर्भातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे मतही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

नागपूर : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election)  बिगुल फुंकण्यासाठी दीक्षाभूमी व संघभूमी असलेल्या उपराजधानीत गांधी कुटुंबीय प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहे.  काँग्रेस (Congress) स्थापना दिनानिमित्त 'है तयार हम' सभेचं आयोजन करण्यात आले आहे.  सोनिया गांधी(Soniya Gandhi) , राहुल गांधी (Rahul Gandhi) , प्रियांका गांधी (Priyanka Gandhi)  उपस्थित राहाणार आहेत. काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने 28 डिसेंबर ला नागपुरात काँग्रेसची 'है तयार हम' अशी महारॅली (सभा) होणार आहे. त्यासाठी उमरेड रोडवरील बहादुरा परिसरात 40 एकर क्षेत्रावर विशेष मैदान तयार करण्यात आला  आहे.

सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे या राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला दिशा मिळेल असा मत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. विदर्भाच्या भूमीने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी आणि प्रभू श्रीरामाचा रामटेक या पावनभूमीतून आशीर्वाद घेऊन काँग्रेस नेतृत्व देशातून भाजप सरकारला उलथवून लावेल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. 1920 मध्ये काँग्रेसचे खास अधिवेशन नागपुरात पार पडले होते.. त्याच्या 103 वर्षानंतर काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा नागपुरात होत असल्यामुळे विदर्भातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे मतही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

 दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकण्यासाठी काँग्रेसने महाराष्ट्राची आणि त्यातल्या त्यात नागपूरची निवड का केली? काँग्रेसची स्थापना झालेली मुंबई किंवा देशाची राजधानी असलेले दिल्ली या ऐवजी ही सभा नागपुरात का? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. 

दिल्ली ऐवजी ही सभा नागपुरात का?

  • काँग्रेसचा महाराष्ट्र आणि नागपूरशी ऐतिहासिक नातं आहे..
  • 1891 साली काँग्रेसचे अधिवेशन नागपुरात पार पडले
  • 1920 साली काँग्रेसचा विशेष अधिवेशन नागपुरात पार पडलं होतं. त्या अधिवेशनामध्येच महात्मा गांधी यांना सर्वसामान्य नेता अशी ओळख मिळाली होती. याशिवाय स्वराज्य तसेच असहकार आंदोलन या प्रस्तावांवरही नागपूर चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय झाले होते.
  •  1920 च्या त्याच अधिवेशनात काँग्रेसच्या घटनेत आवश्यक बदल करून काँग्रेसची आजची संघटनात्मक बांधणी निश्चित करण्यात आली होती. 
  • स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसचा पहिला अधिवेशन 1959 मध्ये नागपूरतच पार पडला होता.या अधिवेशनात इंदिरा गांधी यांची काँग्रेस च्या अध्यक्षा म्हणून निवड झाली होती.
  •  निवडणुकीच्या काळात ऊर्जा घेऊन जोरात मैदानात उतरण्यासाठीही काँग्रेसचा नागपूर आणि महाराष्ट्राची वेगळं नातं आहे. इंदिरा गांधी नेहमीच त्यांच्या लोकसभा प्रचाराचा बिगुल नंदुरबार मधून फुंकायच्या..
  •  तर अडचणीच्या प्रसंगी (आणीबाणी नंतर) वैदर्भीय मतदाराने काँग्रेसला हाथ दिल्याचं अनेक वेळेला दिसून आल्यामुळे काँग्रेस नेत्यांचा विदर्भावर खास प्रेम आहे.

 दरम्यान, नागपूरची सभा नुसती भाषणापुरती मर्यादित नाही.. तर, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना आणि मतदारांना वैचारिक दिशा देण्यासाठी काँग्रेसच्या या सभेमध्ये काही विशेष ठराव पारित होणार असल्याची माहिती आहे. बेरोजगारी, देशाची आर्थिक स्थिती तसेच देशातील घटनात्मक संस्था आणि व्यवस्थेवर मोदी सरकारकडून लादला जाणारा नियंत्रण या संदर्भात हे ठराव असू शकतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीतNana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेकMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Embed widget