एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईला बोलणाऱ्यांनी नागपूर मनपाचं काम पाहावं, शिवसेनेचा हल्लाबोल
पावसामुळे नागपुरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुंबईसारखीच परिस्थिती नागपूरमध्ये घडली आहे.
नागपूर : नागपूरमधील मुसळधार पावसाचा फटका विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही बसला आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळात वीजपुरवठा खंडित केल्याने इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधीमंडळाचं कामकाज ठप्प झालं आहे. इतकंच नाही तर मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गुडघाभर पाणी साचलं आहे.
यानंतर शिवसेनेने सरकार आणि नागपूर महापालिकेवर जोरदार टीका केली आहे. "हाच प्रकार मुंबईत झाला असता तर मुंबई महापालिकेबद्दल लोकांनी आक्षेप घेतला असता. आज नागपुरात हा प्रकार घडला. नागपूर उपराजधानी आहे. नागपूरमध्ये अधिवेशन असताना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर महापालिका काय करतेय, याची देखील चौकशी व्हावी" असं सवाल शिवसेना आमदार सुनील प्रभू म्हणाले.
शिवसेनेची प्रतिक्रिया
विधानसभेचं कामकाज 10 वाजता सुरु झालं. मात्र वीज नसल्याने अंधारातच कामकाज सुरु झालं. विरोधकांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात सरकारविरोधात निदर्शने केली.
नागपुरात रस्त्यांरस्त्यात पाणी आहे. आमदारांना विधीमंडळात पोहोचण्यासाठी 2-2 तास लागले. हाच प्रकार मुंबईत झाला असता, तर मुंबई महापालिकेबद्दल लोकांनी आक्षेप घेतला असता. आज नागपुरात हा प्रकार घडला. नागपूर उपराजधानी आहे. नागपूरमध्ये अधिवेशन असताना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विधीमंडळ सभागृहात वीजपुरवठा करताना शॉर्ट सर्किट होतंय, रस्ते भरले आहेत, मग नागपूर महापालिका काय करते, असा सवाल शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केला.
मुंडेंचंही सरकारवर टीकास्त्र
नागपुरातील या परिस्थितीवरुन शिवसेनेने नागपूर महापालिका आणि प्रशासन म्हणजेच भाजपवर तुफान टीकास्त्र सोडलं. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारला धारेवर धरलं. अडीच तास पाऊस पडल्यानंतर जर व्यवस्था कोसळत असेल, तर हे सरकार महाराष्ट्र काय सांभाळणार असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
अहमदनगर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion