एक्स्प्लोर

Independence Day : त्यांनी लिहिलं अन् लढाईला बळ मिळालं! स्वातंत्र्यलढ्यात साहित्यिक, कवींचेही महत्त्वाचे योगदान

Independence Day 2022 : स्वातंत्र्यलढ्यात तत्कालीन राजकारणीच नव्हे तर साहित्यिक, कवींचेही महत्त्वाचे योगदान होते. साहित्यिकांनी वंदे मातरम् सारख्या महान आणि अजरामर कृतीतून स्वातंत्र्यलढ्यात नवसंजीवनी तर दिलीच पण भारतीय भाषांच्या साहित्याला बळ देऊन नवे आयामही दिले. 

Independence Day 2022 : भारताच्या स्वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या लाखो क्रांतिकारकांचे स्मरण केले जात आहे. स्वातंत्र्यलढ्यात तत्कालीन राजकारणीच नव्हे तर साहित्यिक, कवींचेही महत्त्वाचे योगदान होते. साहित्यिकांनी वंदे मातरम् सारख्या महान आणि अजरामर कृतीतून स्वातंत्र्यलढ्यात नवसंजीवनी तर दिलीच पण भारतीय भाषांमध्ये क्रांतीकारी साहित्य निर्मिती करत स्वातंत्र्यलढ्याला बळ देखील दिले. अनेक साहित्यिकांनी स्वातंत्र्यलढ्यात आपल्या साहित्यकृतींसह प्रत्यक्ष देखील सहभाग घेतला तर काहींनी आपल्या लेखणीच्या बळाने ब्रिटीशांना जेरीस आणले. या साहित्यिकांचं योगदान देखील आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचं आहे. 

अशाच काही महान लेखकांबद्दल जाणून घेऊयात...

रवींद्रनाथ टागोर
पहिले नोबेल पारितोषिक विजेते कवी रवींद्रनाथ टागोर. ज्यांनी भारतीय राष्ट्रगीत लिहिले. टागोरांनी कविता, कथा, संगीत, नाटक, निबंध यासारख्या साहित्य प्रकारांमध्ये आपले उत्कृष्ट योगदान दिले. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आपल्या कविता आणि रचनांमधून त्यांनी देशातील तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन केलं होतं.
 
बंकिमचंद्र चटर्जी
भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे लेखक आणि लोकप्रिय बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आपल्या कलाकृतींद्वारे ब्रिटिशांना हैराण केलं होतं. 1874 मध्ये त्यांनी लिहिलेले वंदे मातरम् हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत आणि मुख्य नारा बनला. या गाण्याने देशातील जनतेच्या नसानसात एक उत्साह आणला. नंतर आनंदमठ या कादंबरीतही या गाण्याचा समावेश करण्यात आला. ऐतिहासिक आणि सामाजिक जडणघडणीतून विणलेल्या या कादंबरीने देशात राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यात मोठा हातभार लावला.

सुभद्रा कुमारी चौहान
या यादीत सुभद्रा कुमारी चौहान यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. सुभद्रा  कुमारी चौहान यांनी स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग आणि इतर क्रांतिकारकांसोबत जवळून काम केले. तत्कालीन वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये सातत्यानं बंडखोर लिखाण करत देशवासीयांच्या बंडाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करत असत. त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर एक ऐतिहासिक कविता लिहिली.
 
राम प्रसाद बिस्मिल
काकोरी घटनेचे नायक राम प्रसाद बिस्मिल यांनी आपल्या कार्यातून तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है हे स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध गीत तरुणांच्या ओठांवर आजही असते. 
 
श्यामलाल गुप्ता  
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्यामलाल गुप्ता यांनी आपल्या लेखणीतून स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी लिहिलेल्या ‘विजय विश्व तिरंगा प्यारा’ या गाण्याने स्वातंत्र्य मतदारांच्या मनात नवउत्साह भरण्याचे काम केले.
  
मोहम्मद इक्बाल
मोहम्मद इक्बाल यांनी मुस्लिम समाजाला ब्रिटिश राजवटीविरुद्ध जागृत करून क्रांतीची प्रेरणा दिली. त्यांनी रचलेल्या 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा' या गाण्याने स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या तरुणांमध्ये उत्साह संचारला होता.

मैथिली शरण गुप्त
राष्ट्रीय कवी मैथिली शरण गुप्ता यांनी आपल्या रचनांमधून स्वातंत्र्याच्या मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम केले होते. त्यांनी राष्ट्रवादाचा प्रचार करून स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्याची प्रेरणा दिली. आजही त्यांच्या देशभक्तीच्या कविता वाचून लोक रोमांचित होतात.

भारतेंदु हरिश्चंद्र
भारतेंदु हरिश्चंद्र यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जिथे देशात अनेक आघाड्यांवर लोक स्वातंत्र्यासाठी लढत होते. साहित्याच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या साहित्यिकांना या दिशेने एकत्र केले होते. इंग्रजांकडून देशातील जनतेवर होत असलेल्या अत्याचारांना त्यांनी कडाडून विरोध केला. 'अंधेर नगरी चौपट राजा' या व्यंगचित्रातून त्यांनी ब्रिटिश सरकारच्या अत्याचाराचे अचूक वर्णन केले होते.
 
मुन्शी प्रेमचंद्र
मुन्शी प्रेमचंद्र यांनी आपल्या कार्यातून देशातील जनतेला ब्रिटीश राजवटीविरुद्ध जागृत केले होते. त्यांच्या 'रंगभूमी' आणि 'कर्मभूमी' या कादंबऱ्या देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत होत्या. प्रेमचंद यांनी आपल्या कार्यातून देशातील लोकांमध्ये अशी जनजागृती केली की ते ब्रिटीश राजवटीविरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे प्रेमचंद यांच्या अनेक लिखाणांवर बंदी आली.
 
रामधारी सिंह दिनकर
राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांनीही आपल्या रचनांमधून इंग्रजांच्या राजवटीला हादरा देण्याचं काम केलं. आधुनिक काळातील सर्वोत्तम वीर रस असलेले कवी म्हणून ते ओळखले जातात. दिनकर यांनी आपल्या रचनांमधून इंग्रजांनी भारतीय जनतेवर केलेल्या अत्याचाराला कडाडून विरोध केला होता. विद्रोही कवी म्हणूनही त्यांची ओळख होती.

एबीपी माझा डिजिटल टीममध्ये गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत... मागील काही वर्षांपासून राजकारण, सामाजिक समस्या, सिनेमासह विविध विषयांवर ब्लॉग लेखन. लोकमत, जनशक्तीमध्ये दीर्घकाळ कामाचा अनुभव. मंत्रालय वार्तांकनाचा तीन वर्षांचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget