एक्स्प्लोर

Independence Day : त्यांनी लिहिलं अन् लढाईला बळ मिळालं! स्वातंत्र्यलढ्यात साहित्यिक, कवींचेही महत्त्वाचे योगदान

Independence Day 2022 : स्वातंत्र्यलढ्यात तत्कालीन राजकारणीच नव्हे तर साहित्यिक, कवींचेही महत्त्वाचे योगदान होते. साहित्यिकांनी वंदे मातरम् सारख्या महान आणि अजरामर कृतीतून स्वातंत्र्यलढ्यात नवसंजीवनी तर दिलीच पण भारतीय भाषांच्या साहित्याला बळ देऊन नवे आयामही दिले. 

Independence Day 2022 : भारताच्या स्वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या लाखो क्रांतिकारकांचे स्मरण केले जात आहे. स्वातंत्र्यलढ्यात तत्कालीन राजकारणीच नव्हे तर साहित्यिक, कवींचेही महत्त्वाचे योगदान होते. साहित्यिकांनी वंदे मातरम् सारख्या महान आणि अजरामर कृतीतून स्वातंत्र्यलढ्यात नवसंजीवनी तर दिलीच पण भारतीय भाषांमध्ये क्रांतीकारी साहित्य निर्मिती करत स्वातंत्र्यलढ्याला बळ देखील दिले. अनेक साहित्यिकांनी स्वातंत्र्यलढ्यात आपल्या साहित्यकृतींसह प्रत्यक्ष देखील सहभाग घेतला तर काहींनी आपल्या लेखणीच्या बळाने ब्रिटीशांना जेरीस आणले. या साहित्यिकांचं योगदान देखील आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचं आहे. 

अशाच काही महान लेखकांबद्दल जाणून घेऊयात...

रवींद्रनाथ टागोर
पहिले नोबेल पारितोषिक विजेते कवी रवींद्रनाथ टागोर. ज्यांनी भारतीय राष्ट्रगीत लिहिले. टागोरांनी कविता, कथा, संगीत, नाटक, निबंध यासारख्या साहित्य प्रकारांमध्ये आपले उत्कृष्ट योगदान दिले. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आपल्या कविता आणि रचनांमधून त्यांनी देशातील तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन केलं होतं.
 
बंकिमचंद्र चटर्जी
भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे लेखक आणि लोकप्रिय बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आपल्या कलाकृतींद्वारे ब्रिटिशांना हैराण केलं होतं. 1874 मध्ये त्यांनी लिहिलेले वंदे मातरम् हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत आणि मुख्य नारा बनला. या गाण्याने देशातील जनतेच्या नसानसात एक उत्साह आणला. नंतर आनंदमठ या कादंबरीतही या गाण्याचा समावेश करण्यात आला. ऐतिहासिक आणि सामाजिक जडणघडणीतून विणलेल्या या कादंबरीने देशात राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यात मोठा हातभार लावला.

सुभद्रा कुमारी चौहान
या यादीत सुभद्रा कुमारी चौहान यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. सुभद्रा  कुमारी चौहान यांनी स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग आणि इतर क्रांतिकारकांसोबत जवळून काम केले. तत्कालीन वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये सातत्यानं बंडखोर लिखाण करत देशवासीयांच्या बंडाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करत असत. त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर एक ऐतिहासिक कविता लिहिली.
 
राम प्रसाद बिस्मिल
काकोरी घटनेचे नायक राम प्रसाद बिस्मिल यांनी आपल्या कार्यातून तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है हे स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध गीत तरुणांच्या ओठांवर आजही असते. 
 
श्यामलाल गुप्ता  
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्यामलाल गुप्ता यांनी आपल्या लेखणीतून स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी लिहिलेल्या ‘विजय विश्व तिरंगा प्यारा’ या गाण्याने स्वातंत्र्य मतदारांच्या मनात नवउत्साह भरण्याचे काम केले.
  
मोहम्मद इक्बाल
मोहम्मद इक्बाल यांनी मुस्लिम समाजाला ब्रिटिश राजवटीविरुद्ध जागृत करून क्रांतीची प्रेरणा दिली. त्यांनी रचलेल्या 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा' या गाण्याने स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या तरुणांमध्ये उत्साह संचारला होता.

मैथिली शरण गुप्त
राष्ट्रीय कवी मैथिली शरण गुप्ता यांनी आपल्या रचनांमधून स्वातंत्र्याच्या मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम केले होते. त्यांनी राष्ट्रवादाचा प्रचार करून स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्याची प्रेरणा दिली. आजही त्यांच्या देशभक्तीच्या कविता वाचून लोक रोमांचित होतात.

भारतेंदु हरिश्चंद्र
भारतेंदु हरिश्चंद्र यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जिथे देशात अनेक आघाड्यांवर लोक स्वातंत्र्यासाठी लढत होते. साहित्याच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या साहित्यिकांना या दिशेने एकत्र केले होते. इंग्रजांकडून देशातील जनतेवर होत असलेल्या अत्याचारांना त्यांनी कडाडून विरोध केला. 'अंधेर नगरी चौपट राजा' या व्यंगचित्रातून त्यांनी ब्रिटिश सरकारच्या अत्याचाराचे अचूक वर्णन केले होते.
 
मुन्शी प्रेमचंद्र
मुन्शी प्रेमचंद्र यांनी आपल्या कार्यातून देशातील जनतेला ब्रिटीश राजवटीविरुद्ध जागृत केले होते. त्यांच्या 'रंगभूमी' आणि 'कर्मभूमी' या कादंबऱ्या देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत होत्या. प्रेमचंद यांनी आपल्या कार्यातून देशातील लोकांमध्ये अशी जनजागृती केली की ते ब्रिटीश राजवटीविरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे प्रेमचंद यांच्या अनेक लिखाणांवर बंदी आली.
 
रामधारी सिंह दिनकर
राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांनीही आपल्या रचनांमधून इंग्रजांच्या राजवटीला हादरा देण्याचं काम केलं. आधुनिक काळातील सर्वोत्तम वीर रस असलेले कवी म्हणून ते ओळखले जातात. दिनकर यांनी आपल्या रचनांमधून इंग्रजांनी भारतीय जनतेवर केलेल्या अत्याचाराला कडाडून विरोध केला होता. विद्रोही कवी म्हणूनही त्यांची ओळख होती.

एबीपी माझा डिजिटल टीममध्ये गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत... मागील काही वर्षांपासून राजकारण, सामाजिक समस्या, सिनेमासह विविध विषयांवर ब्लॉग लेखन. लोकमत, जनशक्तीमध्ये दीर्घकाळ कामाचा अनुभव. मंत्रालय वार्तांकनाचा तीन वर्षांचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget