एक्स्प्लोर

खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वकील संघटनांनी आक्रमक भूमिका घेत पत्रक काढलं आहे. अलाहाबाद कोर्ट म्हणजे, आम्ही कचरापेटी नाही, असे प्रसिद्धीपत्रक वकील संघटनांनी जारी केले होते. 

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवासस्थानी रोकड प्रकरणाने न्यायालयीन (Court) वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून या घटनेची चौकशी सुरू आहे. त्याच अनुषंगाने आज सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाला (कॉलेजियमला ) अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायवृंद निर्णय करणार आहेत. दरम्यान, न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरी सापडलेल्या रोकडप्रकरणी बातमीत यशवंत वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली झाल्याचा उल्लेख होता. त्यावरुन, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (high court) वकील संघटनांनी आक्रमक भूमिका घेत पत्रक काढलं आहे. अलाहाबाद कोर्ट म्हणजे, आम्ही कचरापेटी नाही, असे प्रसिद्धीपत्रक वकील संघटनांनी जारी केले होते. 

रोकड सापडल्यानंतर बदली झाल्याची चर्चा

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बदलीची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील तीन वरिष्ठ न्यायाधीशांच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती वर्मा यांना त्यांच्या मूळ उच्च न्यायालयात म्हणजेच अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवण्याची शिफारस केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या सरकारी बंगल्यात आग लागली होती, ती विझवण्यासाठी गेलेल्या टीमला तिथे मोठी रोकड सापडली. रोकड पाहून भूवया उंचावल्या आहेत. एक खोली भरून मोठी रोकड सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर, CJI संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांची पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्मा यांच्या बदलीचा रोकडप्रकरणाशी संबंध नाही

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बदलीचा या प्रकरणाशी थेट संबंध नाही. वादग्रस्त प्रकरणाशी संबंधित स्वतंत्रपणे चौकशी सुरू असून त्याविषयीच्या अहवालानुसार पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र, न्यायमूर्तींच्या घरी रोकड सापडल्याच्या प्रकरणामुळे वर्मा यांची बदली झालेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. तर, रोकड प्रकरणी स्वतंत्र चौकशी दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून सुरू असून तो अहवाल आल्यावर त्याविषयी निर्णय केला जाईल, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने दिले आहे. 

बंगल्यातील खोल्यांमध्ये मोठी रोकड सापडली 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा न्यायमूर्ती वर्मा शहरात नव्हते. त्याच्या कुटुंबीयांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण केले होते. आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना बंगल्यातील खोल्यांमध्ये मोठी रोकड सापडली. क्यानंतर रेकॉर्ड बुकमध्ये बेहिशेबी रोकड वसुलीची अधिकृत नोंद करण्यात आली. सरन्यायाधीशांना या घटनेची माहिती देण्यात आली, त्यानंतर कॉलेजियमच्या बैठकीत प्रथम त्यांना अलाहाबादला पाठवण्याची शिफारस करण्यात आली.

हेही वाचा

स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंची सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंची सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal Majha Vision : सावरकर ते औरंजेबाची कबर...हर्षवर्धन सपकाळांची स्फोटक मुलाखतDevendra Fadnavis Majha Vision Full : बेधडक उत्तरं, तुफान फटकबाजी! दवेंद्र फडणवीस भरभरुन बोलले..Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिल्यास...Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंची सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंची सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Vijay Wadettiwar & Yogesh Kadam : महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
Embed widget