एक्स्प्लोर

Corona Effect | कोरोना व्हायरसमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात अनेक ऐतिहासिक बदल

सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका न्यायाधीशांच्या खंडपीठाची व्यवस्था करण्यात आली. आतापर्यंत 2 किंवा अधिक न्यायाधीशांचे एक खंडपीठ होते.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक सकारात्मक-नकारात्मक बदल झाले. भारतातही अनेक गोष्टींमध्ये बदल झाले. सर्वोच्च न्यायालयानेही कोरोनाच्या संकटात कामकाजात काही बदल करत काम सुरुच ठेवलं. यातल्या काही बदलांचा कधी विचारही केला जाऊ शकत नव्हता, असे ऐतिहासिक बदल सर्वोच्च न्यायालयाने कामकाजात केले आहेत.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुरुवात

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन असूनही, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कामकाजात व्यत्यय येऊ दिला नाही. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच सर्वोच्च न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण प्रकरणांची सुनावणी करण्यास सुरुवात केली. आठवड्यातून 3 ते 4 दिवस महत्वाच्या प्रकरणांच्या सुनावणींना न्यायाधीशांनी सुरुवात केली. कधी एका खंडपीठाने तर कधी दोन खंडपीठांनी न्यायालयाची कार्यवाही सुरु ठेवली.

माध्यमांसाठी विशेष सुविधा

भारतातील न्यायालये ओपन कोर्ट सिस्टमनुसार चालतात. त्यामुळे पत्रकार न्यायालयात हजर राहून न्यायालयाच्या कार्यवाहीचा अहवाल देतात. सध्या सुरु असलेली व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुनावणी पत्रकारांना पाहता यावी याची व्यवस्था सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका इमारतीतील एका खोलीत सुनावणीची लाईव्ह व्हिडिओ लिंक माध्यमांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आतापर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या सुनावणीत न्यायाधीश त्यांच्या घरातून सुनावणी घेत असत. वरिष्ठ न्यायाधीशांच्या घरी असलेल्या कार्यालयात इतर न्यायाधीश त्यांच्यासोबत बसत. मात्र यात आता बदल झाले आणि सर्वोच्च न्यायालयात बनलेल्या खोलीत न्यायाधीश बसू लागले आहेत. मात्र वकील अजूनही त्यांच्या घर किंवा कार्यालयातून न्यायाधीशांशी संवाद साधत आहेत. येत्या आठवड्यापासून अनेक खंडपीठ एकत्र बसण्यास सुरुवात करणार असल्याचे न्यायालयाने संकेत दिले आहेत.

पहिल्यांदाच एका न्यायाधीशांचं खंडपीठ

सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका न्यायाधीशांच्या खंडपीठाची व्यवस्था करण्यात आली. आतापर्यंत 2 किंवा अधिक न्यायाधीशांचे एक खंडपीठ होते. लॉकडाऊन दरम्यान जमा झालेल्या खटल्यांचा ओढा कमी करण्यासाठी नियम बदलून एका न्यायाधीशांचं खंडपीठ करण्यात आलं. या खंडपीठाचे न्यायाधीश 7 वर्षांपर्यंत शिक्षेच्या गुन्ह्यांसाठी जामीन याची प्रकरणं पाहतील. तसेच दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी बदली करण्याच्या अर्जावर विचार करतील.

सुट्ट्या कमी होण्याची शक्यता

सर्वोच्च न्यायालायाला यावेळी उन्हाळ्याची सुट्टी केवळ दोन आठवड्यांसाठी असेल, असेही संकेत मिळत आहेत. सर्वोच्च न्यायालयाची सुट्टी कमी झाल्यास हे सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडेल. सर्वोच्च न्यायालयाला दरवर्षी उन्हाळ्यात सुमारे दीड महिना सुट्टी असते. सुट्टी मे महिन्याच्या मध्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असते. मात्र गेल्या 2 महिन्यांपासून नियमितपणे सुनावणी न झाल्याने उन्हाळ्याची सुट्टी कमी करण्याचा विचार न्यायालय करत आहे.

ड्रेस कोडमध्ये बदल

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि वकील यांना सुनावणीदरम्यानच्या काळा कोट आणि त्यावर गाऊन घालणे बंधनकारक आहे. तसेच न्यायाधीश आणि वकील त्यांच्या शर्टवर बॅन्ड लावतात. आज झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश शरद बोबडे आणि इतर न्यायाधीश कोट आणि गाऊन न घातला सुनावणीला बसले. मात्र पांढर्‍या शर्टवर त्यांनी बँड घातला होता. सरन्यायाधीश म्हणाले की, कोट-गाऊनसारख्या कपड्यांमध्ये कोरोना व्हायरस टीकण्याची शक्यता जास्त आहे. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत आम्ही वकील आणि न्यायाधीशांचा ड्रेस कोड बदलणार आहोत आणि हे लवकरच सार्वजनिक केले जाईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Assam Election Results 2026 Live Updates : बंगाल-आसामध्ये बदल होणार? बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिष्ठा पणाला, आसामध्ये काँग्रेसला कमबॅकची आशा
बंगाल-आसामध्ये बदल होणार? बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिष्ठा पणाला, आसामध्ये काँग्रेसला कमबॅकची आशा
धक्कादायक! धावत्या विमानातून प्रवाशाने मारली उडी, चेन्नई विमानतळावर घडली घटना, नेमकं काय घडलं?
धक्कादायक! धावत्या विमानातून प्रवाशाने मारली उडी, चेन्नई विमानतळावर घडली घटना, नेमकं काय घडलं?
Assam Election : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक की काँग्रेसचा उलटफेर? काहीच वेळात होणार फैसला
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक की काँग्रेसचा उलटफेर? काहीच वेळात होणार फैसला
Tamil Nadu : सुपरस्टार विजयच्या एन्ट्रीनं कोणाला चिंता? दक्षिणेत सट्टाबाजार नेमकं कुणाच्या बाजूनं?
सुपरस्टार विजयच्या एन्ट्रीनं कोणाला चिंता? दक्षिणेत सट्टाबाजार नेमकं कुणाच्या बाजूनं?

व्हिडीओ

Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा
Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?
Mahayuti Issue 2029 Election Special Report : ३ वर्षांनंतरची निवडणूक; स्वबळाची भाषा, २०२९ ची दिशा?
New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
Kerala Elections : आमदार झाल्यासारखं वाटतंय,निकाल जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याकडून 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
भाजप नेत्याकडून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Embed widget