एक्स्प्लोर

मिठाचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या कोणत्या लोकांनी मीठ कमी खावे...

Health Tips : मीठ हे सोडियम आणि क्लोराईडचे बनलेले रासायनिक संयुग आहे आणि आपण ते आपण आपल्या दररोजच्या आहारात वापरतो.

Health Tips : बहुतेक लोकांना हे माहित आहे की, आहारात मिठाचे प्रमाण कमी केले पाहिजे. शतकानुशतके अन्न जतन करण्यासाठी मीठ (Salt) वापरला जात आहे. मीठ अन्नपदार्थातून ओलावा शोषून घेते, जे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंधित करते. जेवणात मीठ आवश्यक मानले जाते आणि त्यामुळे पदार्थांची चवही वाढते. मीठ हे सोडियम आणि क्लोराईडचे बनलेले रासायनिक संयुग आहे आणि आपण ते आपण आपल्या दररोजच्या आहारात वापरतो. या दोन घटकांपैकी सोडियम हा एक घटक आहे, ज्याबद्दल आपल्याला काळजी करण्याची गरज आहे.

सोडियमचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?

जास्त सोडियम वापरताना मुख्य समस्या म्हणजे उच्च रक्तदाबाचा धोका. उच्च रक्तदाब हा हृदयविकार आणि स्ट्रोकला निमंत्रण देणारा आहे. अनेक गंभीर आजार आणि मृत्यूचे हे प्रमुख कारण आहे. उच्च रक्तदाब हे किडनीच्या आजाराचे देखील कारण आहे. शरीरातील द्रव आणि सोडियम पातळी नियंत्रित करण्यासाठी शारीरिक बदल होत असतात. अशावेळी शरीरात सोडियमच्या पातळीचे नियंत्रण राखणे देखील आवश्यक आहे. कारण, सोडियम आपल्या शरीरातील सर्व पेशींच्या पडद्यावर परिणाम करतो. जेव्हा, आपण जास्त प्रमाणात मीठ खातो, तेव्हा ते रक्तातील सोडियमचे प्रमाण वाढवते.

सोडियमची पातळी संतुलित ठेवण्यासाठी शरीर रक्तामध्ये अधिक द्रवपदार्थ घेऊन प्रतिसाद देते. तरी, द्रव प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर दबाव वाढतो, ज्यामुळे उच्च रक्तदाब होतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयाचे काम अधिक कठीण होते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढण्यासह हृदय व रक्तवाहिन्यांचे रोग होऊ शकतात.

ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी मीठ कमी खावे!

काही गटातील लोक इतरांपेक्षा जास्त मीठयुक्त आहारामुळे जास्त प्रभावित होतात. हे लोक ‘मीठ-संवेदनशील’ असल्याचे म्हटले जाते आणि मिठाच्या वापरामुळे उच्च रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. आपल्या रक्तदाबाबद्दल जागरुक असणे महत्त्वाचे आहे. 120/80च्या खाली रक्तदाब चांगला आहे. जर, रीडिंग 140/90 पेक्षा जास्त असेल, तर रक्तदाब उच्च मानला जातो. हृदयविकार, मधुमेह किंवा किडनीचे आजार यासारखे इतर जोखमीचे आजार असल्यास धोका अधिक वाढतो.

रक्तदाब कमी करण्यासाठी मीठ कमी करणे गरजेचे!

रक्तदाब कमी करण्यासाठी आहारातील मीठ कमी करणे ही एक चांगली योजना आहे. यासाठी प्रक्रिया केलेले आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड केलेले पदार्थ खाणे टाळा. आहारात फळे आणि भाज्यांचे दररोजचे सेवन वाढवणे देखील तुमचा रक्तदाब कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते, कारण त्यात पोटॅशियम असते, जे रक्तवाहिन्यांना आराम देण्यास मदत करते. शारीरिक क्रियाकलाप वाढवणे, धूम्रपान बंद करणे, वजन संतुलित राखणे आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित करणे देखील निरोगी रक्तदाब राखण्यास मदत करेल. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
Child Health: शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
Ear Wax : कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget