एक्स्प्लोर

Budget 2021: अर्थसंकल्पासंदर्भात वाजपेयी सरकारने केला होता 'हा' मोठा बदल, जाणून घ्या...

Budget 2021: ब्रिटिशांच्या काळापासून संध्याकाळी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या वेळेत 1999 साली वाजपेयी सरकारने बदल केला आणि तो सकाळी सादर केला. हा बदल ऐतिहासिक असाच होता.

नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सादर होणारा या वर्षीचा अर्थसंकल्प हा ऐतिहासिक असेल. कारण स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पाशी संबंधित कागदपत्रे छापण्यात येणार नाहीत. या वर्षीचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे डिजिटल स्वरुपाचा असेल. पण अर्थसंकल्पात होणारा हा बदल काही पहिला नाही. या आधीही अनेकवेळा अर्थसंकल्पात असे ऐतिहासिक बदल करण्यात आले आहेत. वाजपेयी सरकारच्या काळातही अर्थसंकल्पात एक ऐतिहासिक बदल करण्यात आला होता.

अर्थसंकल्पाच्या बाबतीत गेली कित्येक दशके सुरु असलेल्या परंपरामध्ये बदल करण्याचा प्रकार अनेकवेळा घडलाय. त्यापैकी एक म्हणजे पूर्वी संध्याकाळी पाच वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जायचा. ही परंपरा ब्रिटिश काळापासून सुरु होती. वाजपेयी सरकारच्या काळात, 1999 साली यात बदल करण्यात आला आणि केंद्रीय अर्थसंकल्प हा सकाळी म्हणजे 11 वाजता सादर करण्यास सुरुवात झाली.

...म्हणून यंदाचा अर्थसंकल्प छापला जाणार नाही!

स्वातंत्र्यापूर्वी, ब्रिटिश काळात भारताचा पहिला अर्थसंकल्प हा 7 एप्रिल 1860 साली सादर करण्यात आला होता. जेम्स विल्सन यांनी तो सादर केला होता. त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत ब्रिटिशांच्या वतीनेच आपल्या देशाचा अर्थसंकल्प सादर केला जायचा.

अर्थसंकल्प संध्याकाळी का मांडला जायचा? ब्रिटिश काळात भारताचा अर्थसंकल्प हा संध्याकाळी पाच वाजता सादर केला जायचा. त्याचा संबंध हा ब्रिटिशांच्या वेळेशी होता. ब्रिटनमध्ये त्यांच्या देशाचा अर्थसंकल्प हा सकाळी 11 वाजता सादर केला जायचा. ग्रीनीच प्रमाणवेळेप्रमाणे भारताची प्रमाणवेळ ही ब्रिटिशांच्या वेळेपेक्षा साडेपाच तास पुढे आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये जर 11 वाजलेले असतील तर भारताच्या प्रमाणवेळेनुसार भारतात उत्तर प्रदेशच्या मिर्जापूरमध्ये साडे चार वाजलेले असतात. म्हणजे भारतातील वेगवेगळ्या शहरात चार ते पाच ही वेळ असते.

मोदी सरकारचं यंदाचं बजेट पेपरलेस, बजेट न छापण्याचा निर्णय कशामुळे घ्यावा लागला?

स्वातंत्र्यापूर्वी भारतात सादर केला जाणारा अर्थसंकल्प हा ब्रिटनमध्ये 'हाऊस ऑफ लॉर्ड्स' आणि 'हाऊस ऑफ कॉमन्स' मध्ये ऐकला जायचा. त्यामुळे ब्रिटिशांची संसद ज्यावेळी सुरु व्हायची, म्हणजे सकाळी 11 वाजता भारतात अर्थसंकल्प सादर केला जायचा. संध्याकाळी अर्थसंकल्प सादर करण्याची सुरुवात ही 1924 साली सुरु करण्यात आली. ही परंपरा स्वातंत्र्यानंतरही कायम ठेवण्यात आली.

वाजपेयी सरकारच्या काळात पहिल्यांदा बदल सन 1999-2000 सालचा अर्थसंकल्प सादर करताना वाजपेयी सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पहिल्यांदा ही परंपरा खंडीत केली. त्यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. संध्याकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर केल्याने अर्थसंकल्प पूर्ण होण्यास रात्र व्हायची. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी त्या अर्थसंकल्पावर चर्चा केली असायची. कदाचित याच कारणाने यशवंत सिन्हांनी अर्थसंकल्प मांडायची वेळ बदलली आणि इतिहास घडला.

Union Budget 2021: आगामी अर्थसंकल्प हा आधीपेक्षा वेगळा: निर्मला सीतारमण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार

व्हिडीओ

Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Meenakshi Shinde : 'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ
Tara Sutaria Veer Paharia Breakup: कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक
कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक
Embed widget