एक्स्प्लोर

Blog : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं कलेच्या नजरेतून चित्रण

Blog : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना या लढ्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं, जे स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीचे प्रमुख शिल्पकार आहेत, त्यांच्या कार्याचं सर्वजण कौतुक करतील. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महात्मा गांधींच्या कार्याची दखल यावेळी घेण्यात येईलच, पण त्याचसोबत अनेक लोकांचा स्वातंत्र्यलढ्याचे शिल्पकार म्हणून उल्लेख केला जाईल. जेव्हापासून भाजपचे सरकार सत्तेत आलं आहे, तेव्हापासून गांधींच्या कार्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. आताही RRR या चित्रपटाचे यश हे आपल्याला खूप काही सांगून जातं. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास वेगळ्या दृष्टीकोनातून पुन्हा लिहिला जात आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भारताला ब्रिटिशांच्या वसाहतवादी जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्या अनेकांनी प्रयत्न केला, त्यांचं गुणगाण गायलं गेलं. पण या स्वातंत्र्यसैनिकांच्या मांदियाळीत गांधी किंवा नेहरूंना कोणतंही स्थान दिलं नाही हे खूप काही आश्चर्यकारक नाही. सुभाषचंद्र, भगतसिंह आणि सरदार पटेल यांच्या योगदानाविषयी या चित्रपटाच्या शेवटी अधोरेखित करण्यात आलं आहे. 

या चित्रपटाचे पटकथा लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी असं म्हटलं आहे की, काही मित्रांच्या इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअॅपवरून आलेल्या ऑनलाइन पोस्ट्समुळे गांधी आणि नेहरूंनी देशासाठी काही केले होते का, असा प्रश्न पाच वर्षांपूर्वी त्यांना पडला होता. ते पुढे म्हणतात की, त्यानंतर त्यांनी लहानपणी शाळांमध्ये शिकवल्या गेलेल्या इतिहासाला नाकारायला सुरुवात केली. जेव्हा तुम्ही तुमचा इतिहास व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवरून शिकता तेव्हा त्याचा परिणाम RRR च्या स्वरुपात पाहायला मिळतो. आता हा प्रश्न वेगळा आहे की या चित्रपट निर्मात्यांनी भारताच्या आदिवासी समाजाच्या संस्कृतीपासून काय घेतलं, भारतीय जातीव्यवस्थेचा अर्थ काय लावला किंवा राजकीय इतिहासातून काय धडा घेतला हा भाग वेगळा आहे. 

स्वातंत्र्यलढ्यावेळी नेमकं काय घडत होते ते समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे त्या वेळच्या कलाकारांनी त्यांच्यासमोर घडलेल्या घटनांचे चित्रण कसं केलं आहे हे पाहणे. त्या वेळच्या कलाकारांच्या कलेतून हे स्पष्ट होतंय की त्यांनी गांधींना देशातील लोकांना पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी झगडणारा सर्वोच्च नेता या स्वरुपात पाहिलं. त्यांना गांधींना देवत्व दिलं. त्या वेळच्या राष्ट्रवादी पत्रकारांनी या स्वरुपाचं चित्रण हे चंपारण्य सत्याग्रह, असहकार चळवळ, बार्डोलीमधील ना कर मोहिम, मिठाचा सत्याग्रह आणि छोडो भारत चळवळ या माध्यमातून केलं. त्याचप्रमाणे गांधींचे चित्रण त्या वेळच्या कलाकारांनी धर्मसंस्थापक, भारतीय अध्यात्मिक वारशाचे खरे वारसदार असं रंगवलं. पी.एस. रामचंद्र राव यांनी 1947-48 मध्ये मद्रास येथून 'द स्प्लेंडर दॅट इज इंडिया' या शीर्षकाच्या पोस्टरमध्ये, गांधींना  वाल्मिकी, थिरुवल्लुवर, बुद्ध, महावीर, शंकराचार्य, तत्वज्ञानी रामानुज, गुरु नानक, रामकृष्ण, रमण महर्षी या महान व्यक्तींच्या यादीमध्ये बसवलं. 


Blog : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं कलेच्या नजरेतून चित्रण

श्याम सुंदर लाल, जे स्वत:ची ओळख चित्रांचे व्यापारी असं करुन देत होते, त्यांनी कानपूरमधील चौकात व्यवसाय सुरू केला होता. कानपूरला राष्ट्रवादाने प्रेरित कलांमध्ये इतकं महत्त्वाचे स्थान कसं मिळाले याच्या तपशिलात जाणे शक्य नाही. 1857-58 च्या बंडाच्या दरम्यान कानपूर चर्चेत आलं होतं. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश लष्कराला आवश्यक असलेल्या रसद पुरवठ्यासाठी एक प्रमुख उत्पादन केंद्र आणि उत्पादन केंद्र म्हणून हे शहर प्रसिद्ध होतं. तसेच कानपूर हे कामगार संघटनांच्या संघटनासाठी देखील महत्त्वाचे बनले आणि हे असे शहर होते जिथं कम्युनिस्ट आणि काँग्रेस दोघेही सत्तेसाठी धडपडत होते. हे प्रिंट्स कसे प्रसारित केले गेले, वितरित केले गेले किंवा वापरले गेले हे माहित नाही. पण टिकून राहिलेल्या प्रिट्समुळे त्याच्या निर्मात्यांनी स्वातंत्र्याच्या संघर्षाकडे कसं पाहिले याचा काही अंदाज काढणे शक्य होते.


Blog : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं कलेच्या नजरेतून चित्रण

सुंदर लाल यांच्या कार्यशाळेसाठी प्रिंट्स तयार करणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे प्रभू दयाल आणि आपण त्यांच्या कलाकृतींच्या तीन उदाहरणांचा विचार करु शकतो. 'सत्याग्रह योग-साधना' किंवा योगाच्या अनुशंगाने सत्याग्रहाची प्राप्ती या मथळ्याखाली, गांधींना चित्रात मध्यभागी दाखवले आहे. मोतीलाल नेहरु आणि त्यांचा मुलगा जवाहरलाल यांना दोन्ही बाजूंना दाखवलं आहे. ते काटेरी पलंगावर ध्यानस्थपणे बसतात. कदाचित मरणासन्न भीष्माची ते आठवण करून देतात. कारण भिष्म बाणांच्या शेंड्यांवर झोपला असतो आणि शेवटच्या क्षणी राजाचे कर्तव्य आणि धर्माच्या मूल्यांच्या घसरणीबद्दल शेवटची शिकवण देत असतो. काट्यांशिवाय गुलाबाची झुडपे नाहीत, त्याचप्रमाणे, संयम आणि शिस्तीशिवाय स्वातंत्र्य नाही. जवाहरलाल नेहरु यांच्या अध्यक्षतेखाली लाहोरमधील अधिवेशनात काँग्रेसने डिसेंबर 1929 मध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला होता. ती पूर्ण स्वातंत्र्याची किरणे किंवा  'पूर्ण स्वराज्य' या तिघांवर पडली आहेत. 


Blog : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं कलेच्या नजरेतून चित्रण

1930 मधील एक प्रिंट अजून उल्लेखनीय आहे, ज्यात राम आणि रावण यांच्यातील महायुद्ध, गांधी आणि ब्रिटीश यांच्यातील आधुनिक काळातील संघर्ष, अहिंसा आणि हिंसा, सत्य आणि असत्य यांच्यातील संघर्ष दाखवला आहे. दहा डोकी असलेला रावण हा ब्रिटीश राज म्हणून ओळखल्या जाणार्‍या मृत्यू आणि दडपशाहीची अनेक डोकी असलेली राक्षसी यंत्रणा म्हणून अवतरला आहे. हा संघर्ष आपल्या काळातील रामायण म्हणून दर्शविला जातो. या स्वातंत्र्याच्या संग्रामात गांधींची एकमेव शस्त्रे म्हणजे सूत आणि चरखा. जशी रामाला हनुमानाने मदत केली, तशीच गांधींना नेहरूंनी मदत केली. नेहरूंना आधुनिक काळातील हनुमान म्हणून प्रस्तुत केले आहे, ज्याने संजिविनीच्या शोधात पर्वत उचलून आणला.

इंग्रजांनी स्वतःच्या सामर्थ्याचे स्मारक म्हणून बांधलेल्या नवीन शाही राजधानीच्या स्थापत्यकलेच्या छायेत छापलेल्या प्रिंटच्या एका कोपऱ्यात उदास दिसणारी भारतमाता विराजमान आहे. दडपशाही करणाऱ्या उंच सूट-बुटातल्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या तुलनेत धोतरात असलेले आणि उघड्या छातीचे गांधीजी वेगळं भासतात. ब्रिटिशांच्या हातात तोफखाना, पोलिसांची पलटन, लष्करी दारुगोळा आणि नेव्ही या सर्व गोषअटी आहेत. गांधी त्यांच्या धोतरात, उघड्या छातीत, उंच बुटात हूण दिसणाऱ्या ब्रिटिश अधिकार्‍याशी अगदी फरक मांडतात ज्यांच्या दडपशाही करणाऱ्या ब्रिटीशांनी लोकांच्या एकत्र येण्यावर प्रतिबंधित करणाऱ्यासाठी आणि निदर्शने हाणून पाडण्यासाठी भारतीय दंड संहितेचे कलम 144 देखील वापरले होते. आजही या कलमाचा वापर केला जातो.  


Blog : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं कलेच्या नजरेतून चित्रण

प्रभू दयाळ मात्र स्वातंत्र्य चळवळीच्या विविध टप्प्यांबद्दलच्या त्यांच्या आकलनासंदर्भात उदात्त होते. आता जो काही लोकांचा दृष्टीकोन आहे, त्यामध्ये गांधी आणि त्यांच्या अहिंसेबद्दल खिल्ली उडवली जाते, तशा प्रकारचे मत त्यांनी कधीच मांडलं नाही. भगतसिंग किंवा सुभाषचंद्र बोस यांचा महात्मा गांधी यांच्या विरोधी दृष्टीकोन किंवा त्यांच्याबद्दल असलेला तिरस्कार प्रभू दयाळ यांनी कधीही पाहिला नाही, म्हणजे तो तसा कधीही नव्हताच. त्यांचे बरेचसे कार्य गांधी आणि भगतसिंग यांच्यातील पूरकता सूचित करतात. 'स्वातंत्र्याच्या वेदीवर वीरांचे बलिदान' या चित्रात भगतसिंग, मोतीलाल नेहरु, जवाहरलाल नेहरु, गांधी आणि इतर असंख्य भारतीय भारत मातेसमोर अमर शहीदांचे शीर घेऊन उभे आहे. 'अमर शहिद' म्हणजे ज्यांनी आधीच देशासाठी आपले प्राण अर्पण केले आहेत. त्यामध्ये अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिरी, रामप्रसाद बिस्मिल, लाला लजपत राय आणि जतींद्रनाथ दास यांच्यासारख्या शहिदांचा समावेश आहे. प्रभू दयाल यांनी 'पंजाबच्या सिंह' लाला लजपत राय यांच्या बलिदानावर किंवा भारताच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्रे उचलणाऱ्या अनेक तरुणांच्या बलिदानाबद्दल कधीही शंका घेतली नाही.

अलिकडच्या काही वर्षांत यातील बहुतेक कलाकृतींचा इतिहासकार आणि इतर विद्वान वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. ही चित्रं केवळ स्वातंत्र्य चळवळीची गोष्ट सांगत नाहीत, उलट त्यांनी राष्ट्राची एक ओळख निर्माण करण्यासाठी मदत केली. भारताच्या इतिहासाच्या या गंभीर वळणावर आता कोणत्या प्रकारची कला ही या प्रकारची कामगिरी करणार हे पाहणे बाकी आहे. 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
Mumbai University : मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते,  लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते, लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Raut Full Majha Vision 2024 : बाळासाहेब असते तर त्यांनी देशात मोदी विरोधात रान उठवलं असतंBachchu Kadu Tondi Pariksha : एका अटीवर शिंदेसह गुवाहाटीत गेलो! बच्चू कडूंचा सर्वात मोठा खुलासाUddhav Thackeray on PM Modi  : मुख्यमंत्री किती कोटींचा? उद्धव ठाकरे यांचा मोदींना थेट सवालABP Majha Headlines : 11 PM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
Mumbai University : मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते,  लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते, लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
तरुणांमध्ये हायपोथायरॉईड का वाढतोय, कारणं कोणती ? जाणून घ्या सविस्तर
तरुणांमध्ये हायपोथायरॉईड का वाढतोय, कारणं कोणती ? जाणून घ्या सविस्तर
आशियाई तायक्वांदो स्पर्धेत भारताला दुहेरी यश; पुमसेमध्ये रौप्यपदक
आशियाई तायक्वांदो स्पर्धेत भारताला दुहेरी यश; पुमसेमध्ये रौप्यपदक
गूड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून
गूड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून
पंजाबच्या माऱ्यासमोर रजवाडे ढेर, रियानची एकाकी झुंज, राजस्थानची 144 धावांपर्यंत मजल
पंजाबच्या माऱ्यासमोर रजवाडे ढेर, रियानची एकाकी झुंज, राजस्थानची 144 धावांपर्यंत मजल
Embed widget