Yuzvendra Chahal-Dhanashree Verma: धनश्री वर्मा गोल्डडिगर...रोहित शर्माच्या पत्नीने ती पोस्ट Like केली; चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?
Yuzvendra Chahal-Dhanashree Verma: युझवेंद्र चहल ज्यावेळी वांद्रेतील कुटुंब न्यायालयात आला होता, त्यावेळी त्याच्या टी-शर्टने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma: भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. नुकताच युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा (Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce) यांचा घटस्फोट झाला. 20 मार्च 2025 रोजी मुंबईतील वांद्रे कुटुंब न्यायालयाने युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट मंजूर केला. दरम्यान, युझवेंद्र चहल ज्यावेळी वांद्रेतील कुटुंब न्यायालयात आला होता, त्यावेळी त्याच्या टी-शर्टने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
धनश्री आणि युझवेंद्र यांच्या मध्यस्थथीने पोटगीच्या अटींवरही अंतिम निर्णय घेण्यात आला. धनश्रीला चहलने 4.75 कोटी रुपये देण्याचं मान्य केल्याचं बोललं जात आहे. धनश्री वर्माने युजवेंद्र चहलकडून ४.७५ कोटी रुपयांची पोटगी घेतल्याबद्दल संबंधित एक पोस्ट हायलाइट केली आहे, ज्यामध्ये तिला गोल्ड डिगर म्हटलं आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, एक क्लिप व्हायरल झाली ज्यामध्ये युट्यूबर शुभंकर मिश्रा यांनी धनश्री वर्मावर टीका केली आणि म्हटलं की लोक तिला गोल्डडिगर म्हणतायत ते खरं आहे. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने देखील ही पोस्ट लाईक केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. 
युझवेंद्र चहलने धनश्रीला 4.75 कोटी रुपये देण्याचं केलं मान्य-
धनश्री आणि युझवेंद्र यांच्या मध्यस्थथीने पोटगीच्या अटींवरही अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानुसार धनश्रीला चहलने 4.75 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं. फेब्रुवारी 2024 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल करताना दोघांनी संयुक्त याचिका दाखल केली होती. त्यावेळी दोघांनी सहा महिन्यांचा कूलिंग-ऑफ कालावधी माफ करण्याची विनंती केली होती. परंतु कौटुंबिक न्यायालयाने ती विनंती नाकारली. युझवेंद्रने धनश्रीला मान्य केलेल्या रकमेपैकी 2.37 कोटी रुपये घटस्फोटाच्या निर्णयाआधीच आधीच दिले होते.
युझवेंद्र चहल अन् धनश्री वर्माचा घटस्फोट का झाला?
धनश्री आणि युझवेंद्र यांच्या विभक्त होण्यामागील खरे कारण ज्येष्ठ पत्रकार विकी लालवाणी यांनी सांगितले आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. धनश्री आणि युझवेंद्र वेगळे होण्याचे कारण म्हणजे धनश्रीची मुंबईत राहण्याची इच्छा होती. धनश्रीने युझवेंद्रला हरियाणामधील त्याचे घर सोडण्यास सांगितले होते. मात्र युझवेंद्र यासाठी तयार नव्हता. त्यामुळे हरियाणा आणि मुंबई युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटामागील कारण आहे, असं विकी लालवाणी यांनी पोस्टद्वारे सांगितले. दरम्यान, 22 डिसेंबर 2020 रोजी युझवेंद्र आणि धनश्री लग्नाच्या बेडीत अडकले होते.





















