एक्स्प्लोर

Nashik News : सांगा शेती करू कशी? कांद्याला कवडीमोड भाव, जगायचं कसं, नाशिकच्या शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल 

Nashik Farmer Suicide : कांद्याला कवडीमोल भाव, कर्जाचा डोंगर या विवंचनेतून नाशिक शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस (Nashik Rain) झालेला नाही. जिल्ह्यातील अनेक भागात नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकरी (Farmers) हवालदील झाले असून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. याच निराशेतून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याने टोकाचा निर्णय स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील देवळा (Deola) तालुक्यात एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या (Farmer Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. प्रताप बापू जाधव असे 36 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. मात्र, सततच्या नापिकीमुळे फारसे उत्पादन निघत नव्हते. त्यामुळे ते नैराश्यात गेले होते. तर दुसरीकडे इतरांकडून उसणवारीने घेतलेल्या पीक कर्जाचा (Crop Loan) डोंगरही वाढत चालला होता. याच विवंचनेतून जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. घराजवळच्या विहिरीत स्वतःला झोकून जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेने जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

दरम्यान सततची नापिकी आणि या वर्षी पावसाने ओढ दिल्याने हताश झालेल्या तरुण शेतकऱ्याने घराजवळच्या विहिरीत उडी मारत आत्महत्या केल्याची घटना देवळा तालुक्यातील सातवाईवाडी येथे घडली. आज सकाळच्या सुमारास ते घराबाहेर पडले असता, परत आलेच नाही. यानंतर कुटुंबियांनी सर्वत्र शाेध घेतला. परंतु, त्यांचा काही तपास लागला नाही. अशातच घराजवळील काही अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. जाधव हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे दिड एकर शेती आहे. कांदा लागवड (Onion Crop) करून त्याच्यासाठी मोठा खर्च केला, मात्र कांद्याला कवडीमोल भाव मिळाला, तर साठवलेला कांदा खराब झाल्याने घेतलेले कर्ज कसे फेडायचे आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा, या विवंचनेत असलेल्या तरुण शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत विहिरीत उडी मारत आपले जीवन संपविले. 

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक 

दरम्यान मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक असून यवतमाळ जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून तब्बल 93 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं समोर आलं आहे. तर जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढल्याचं या आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. यामध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक म्हणजे 40 शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं. तर जुलै महिन्यात  21 तर जून महिन्यात 32 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अतिवृष्टीमुळे या आत्महत्येचं प्रमाण वाढलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये एकूण 189 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं समोर आलं आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

Nana Patekar : ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या थांबतील, त्या दिवशी महाराष्ट्र एक नंबर होईल : नाना पाटेकर  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025Uddhav Thackeray Video | उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले? राम कदम यांची प्रतिक्रियाUddhav Thackeray : हरामखोर आहेत ते...उद्धव ठाकरेंचारोख कुणावर? पाहा संपूर्ण व्हिडीओ ABP MAJHA

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Embed widget