Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?
Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
स्वर्गीय श्रीमती इंदिराजींची निवडणूक रद्द केली आणि सहा वर्षाची बंदी इंदिराजींवर निवडणूक लढण्याकरता घातली त्याच्यावर इंदिराजी सर्वोच्च न्यायालयात गेल्या तिथे जस्टिस केवी कृष्ण होते त्यांनी बाराच दिवसांनी 14 जून. निकाल दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की अल्लाहाबाद हायकोर्टाचा निकाल प्रथम दर्शनी आम्हाला योग्य वाटतो त्यामुळे आम्ही त्याच्यावर स्टे करणार नाही पण अंतिम निर्णय होतपर्यंत इंदिराजी सभागृहाच्या सदस्य राहतील तद्वतच प्रधानमंत्री राहतील पण सभागृहाच्या वोटिंग मध्ये किंवा कामकाजात त्यांना सहभागी होता येणार नाही. अशा प्रकारचा त्यांनी निकाल दिला. हा निकाल कधी दिला? 24 जून 1975. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 25 जून 1975 ला इमर्जन्सी लागली. या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर तो मान्य नाही, या देशामध्ये इमर्जन्सी लागली आणि 1971 मध्ये युद्धाच्या काळामध्ये मिसाचा तयार केला होता, मेंटेनन्स ऑफ इंटर्नल सिक्युरिटी. नानाभाऊ, आमचे जयंतराव मगाशी म्हणाले ना की आपण जो एक कायदा तयार केला जो जॉइंट सिलेक्ट कमिटीकडे आहे. तपासून घ्या तो कायदा. कुठल्याही मूलभूत अधिकाराच एवढे हनन होत असेल तर मी कायदा परत घेईल. पण हा जो कायदा होता ना मिसा. कुठलच कुठलाच मूलभूत अधिकार नाही. नो स्क्रुटिनी, नथिंग. मला वाटलं जितेंद्र अवळांना आत्ताच्या आता जेलमध्ये टाकायच आहे. तर तेव्हा टाकू शकत होतो. आता नाही. आणि ही इमर्जन्सी लागल्यानंतर आपण संविधान बचाव, संविधान बचाव म्हणता काय झालं होतं? मूलभूत अधिकार कायद्याने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मला सगळ्यात जास्त प्रिय मूलभूत अधिकार आहे, ते मूलभूत अधिकार सस्पेंड केले, अभिव्यक्तीच स्वातंत्र्य समाप्त केलं, माध्यम. आणि राज्य कायद्याने नाही, हुकुमाने चालेल अशा प्रकारची व्यवस्था ही त्या ठिकाणी तयार झाली होती, किशोर कुमार, किशोर कुमारांवर त्या ठिकाणी. गाण्यावर बंदी टाकली होती किशोर कुमारांना किशोर कुमारांनी फक्त इमरजन्सी योग्य नाही म्हटलं तर किशोर कुमारांना त्या आकाशवाणीवर बंदी टाकली आणि त्यांचे गाणे वाजवणे बंद केले होते त्याच्यात एवढे एक्सेस आहेत खरं तर ही ती जागा नाही सांगण्याची पण जॉर्ज फर्नांडीस यांच्या परिवाराशी त्या काळामध्ये जे काही झालेल आहे आजही मी सांगितलं तर माझ्या डोळ्यात पाणी येत आणि माझ्या अंगावर काटे त्या ठिकाणी उभे राहतात ही त्यावेळेची अवस्था होती. एक लाख पेक्षा जास्त विरोधी पक्षाच्या लोकांना जेलमध्ये टाकलं होतं. हे तुम्ही ईडी काय काय सांगता? एक लाख पेक्षा जास्त, माझे वडील दोन वर्ष जेलमध्ये होते, आमच्या काकू शोभाई दोन वर्ष जेलमध्ये होत्या, अनेक परिवार इथले अशी आहेत की जे जेलमध्ये होते, पुणकर साहेब आमचे जेलमध्ये होते. दोन दोन वर्ष त्या ठिकाणी केवळ मिसा लावून टाकला. काय तुमचा अपराध काय सांगायला कोणी तयार नाही, तुम्ही केलं काय कोणी सांगायला तयार नाही, केवळ तुम्ही विरोधी पक्षाचे. सदस्य आहे म्हणून या देशामध्ये बाबासाहेबांच संविधान गोठवून त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्याचे काम केलं होतं. त्याच वेळी खर म्हणजे सुरेश भटानी म्हटलं, उभा देश झाला आता एक बंदी शाळा, इथे देवकीचा पाना दुधाने जळाला, कसे पुण्य दुर्दैवी अरे कसे पाप भाग्यशाली, अरे पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवा मशाली.















