एक्स्प्लोर

वैदिक धर्म म्हणजे विधवेचं मुंडण करणारा, संत परंपरा म्हणजे तिचा पुनर्विवाह, योग्य ते निवडण्याची वेळ: प्रकाश आंबेडकर

प्रबोधनकारांचा इतिहास बारकाईने केला असता त्यांनी वैदिक परंपरेवर आसूड ओढला, त्यांच्या लिखानातून त्यांनी समाजप्रबोधन केलं असं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

मुंबई : प्रबोधनकारांनी जातीच्या नावावर असणाऱ्या समाजव्यवस्थेवर आसूड ओढला, तो नाकारला, समता बंधूभाव आणि एकमेकांवर आपुलकी निर्माण  कशी होईल यावर लिखान केलं. आताच्या काळात धर्माचं भांडण सुरू झालेलं नाही तर लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असं भांडण सुरु आहे असं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. राजकीय पक्ष म्हणून आम्ही भुमिका घेऊ, मात्र मतदारांनी काय पाहिजे हे ठरवलं पाहिजे. इथल्या प्रत्येक माणसाने लोकशाही पाहीजे की हुकुमशाही हे ठरवलं पाहीजे असंही ते म्हणाले. प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते.

दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचं संपूर्ण डॉक्युमेंटेशन करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हे लोकार्पण होतंय. त्यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनुस्मृतीमध्ये, आपण मनूच्या कायद्यामध्ये अडकून पडणार आहोत की नवं काही घडवणार आहोत याचा विचार केला पाहिजे. एका बाजूला वैदिक परंपरा आणि दुसरी संतांची परंपरा उभी आहे. एका बाजूला विवाह आणि दुसऱ्या बाजूला पुनर्विवाह असा भाग आहे. वैदिक धर्म म्हणजे विधवांचं मुंडण करणारा तर संत परंपरा म्हणजे विधवांचे पुनर्विवाह करणारा, त्यामुळे लोकांनी काय निवडायचं ते ठरवावं. प्रबोधनकारांचा इतिहास बारकाईने केला असता त्यांनी वैदिक परंपरेवर आसूड ओढला आहे. उद्याच्या भवितव्याचा विचार करायचा असता हा धर्म सार्वजनिक कसा होईल याचा विचार केला. 

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिघांनीही धर्म नाकारला नाही. धर्म आवश्यक आहे, पण त्याच्या अधिन जाऊ नये असा त्यांचा समज होता. त्याचं धर्माशी भांडण नव्हतं, तर सामाजिक व्यवस्थेशी भांडण होतं. त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी प्रयत्न केला. आपण समता आणि बंधुभावाचा बळी दिला म्हणून राष्ट्र म्हणून उभं राहू शकलो नाही. प्रबोधनकारांनी जातीच्या नावावर असणाऱ्या समाजव्यवस्थेवर आसूड ओढला. तो नाकारला. समता बंधूभाव आणि एकमेकांबद्दल आपुलकी कशी निर्माण होईल यावर लिखान केलं. माणसं एकत्र येतात ती भाषा आणि संस्कृतीवर. याबद्दलच जर आपुलकी नसेल तर ती एकत्र येणार नाहीत. आता धर्मावर आधारित विचारसरणी पुढे नेण्यात अर्थ नाही. 

जात नावाची व्यवस्था हा एक देश बनला आहे असं सांगत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उत्तर भारतामध्ये काप म्हणजे जात पंचायत. देशात आता या काप पंचायतीचा पुरस्कार करण्याचा विचार पुढे येतोय. मग आपण नेमकं कुणाला पुढे नेतोय. आपण इतर धर्मामध्ये लोकशाही नाही असं म्हणतोय पण वैदिक धर्मात हुकूमशाहीच आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "जो वारीला जातोय त्याच्यामध्ये ही भेदाभेदीची संस्कृती येणार नाही, कारण सर्वजण समान आहेत अशी त्यामागे भावना आहे. समाजव्यवस्थेमध्ये असलेलं बंड म्हणजे 700 वर्षांपूर्वी सुरू झालेली वारी. चांगल्या भाषेमध्ये मांडणी करायचं म्हटलं तर वैदिक धर्म म्हणजे विधवेचं मुंडण करणारा धर्म तर संताचा धर्म म्हणजे तिचा पुनर्विवाह होय. यापैकी योग्य तो एक विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. आता वैदिक धर्म की वारकरी धर्म निवडण्याची वेळ आली आहे. धर्मनिरपेक्षता हा शब्द घटनेमध्ये नाही. त्याला बंदिस्त करता येत नाही. पीढी बदलत जाते तसा विचार बदलतोय, तसा या शब्दाचा अर्थ बदलतोय. प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे पण राज्याला धर्म राहिलेला नाही, तो बारकाईने लक्षात घेतला पाहिजे."

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime Dhananjay Deshmukh: मोठी बातमी! अंगरक्षकाची पिस्टल काढून धमकी दिली; दिवंगत सरपंच बंधू धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
अंगरक्षकाची पिस्टल काढून धमकी दिली; दिवंगत सरपंच बंधू धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
Vidhan Parishad Election 2026: पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!
पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
IPL 2026 RCB vs GT : आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने,फायनल कोणं जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं...
आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने, मॅच कोण जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं... 
Embed widget