Hyderabad Liberation Day 2022 Live: आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन, पाहा सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी
भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये हैदराबाद मुक्तिसंग्रामाला एक विशेष स्थान आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला, पण हैदराबाद मात्र निजामांच्या गुलामीत कायम होतं.
LIVE

Background
Marathwada Mukti Sangram : राष्ट्रध्वजाला बीड पोलिसांच्या वतीने मानवंदना
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बीडमध्ये आज राष्ट्रध्वजाला बीड पोलिसांच्या वतीने मानवंदना करण्यात आली. यावेळी बीड पोलिसांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने परेड संचलन केल. राज्याचे मंत्री संदिपान भुमरे यांनी या परेड संचलनाचं निरीक्षण करून पोलिसांच कौतुक केल आहे
या पर्यटसंचालनात बीड जिल्हा पोलीस दलातील पोलीस, होमगार्ड, एनसीसी पथक त्याचबरोबर सैनिक शाळेचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. दरवर्षी लाल किल्ल्यावर जी परेड होते त्याच पद्धतीचा अनुभव आज बीड जिल्हा पोलिसांनी केलेल्या परेडमधून पाहायला मिळाला. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी आणि ही परेड पाहण्यासाठी बीडमधील तरुण अनेक ज्येष्ठ नागरिकांनी हजेरी लावली होती
Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्तिसंग्रामात बलिदान देणाऱ्या लक्ष्मण परळकर यांच्या स्मारकाची दुरावस्था
बीडच्या वाघीरा गावामध्ये मराठवाडा मुक्तिसंग्रामात बलिदान देणाऱ्या लक्ष्मण परळकर यांच्या स्मारकांची दुरावस्था झाली आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याकडे तक्रार नोंदवली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील वाघेरा येथील लक्ष्मण मारुती परळकर यांनी देखील मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये आपलं हुतात्मे दिल होत. त्यांच्याच स्मरणार्थ वाघीरा गावात त्यांचं स्मारक उभारण्यात आलं. मात्र या हुतात्मा स्मारकाकडे प्रशासनच दुर्लक्ष झाला असून या ठिकाणी अक्षरश: जनावर बांधण्यात येत आहेत तर सर्वच ठिकाणी घाणीचे साम्राज्य पाहायला मिळतय.
मराठवाडा मुक्ती संग्राम झाला नसता तर देशाच्या नकाशात मध्यभागी एक इस्लामिक राष्ट्र उभं राहिलं असतं- प्रकाश महाजन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विद्यार्थ्यांकडून नोकर भरती झाली पाहिजे यासाठी घोषणाबाजी
नांदेड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विद्यार्थ्यांकडून नोकर भरती झाली पाहिजे यासाठी घोषणाबाजी करत निषेध करण्यात आलाय. नांदेड शहरातील श्रीनगर येथील भाजपच्या कार्यक्रम स्थळी विद्यार्थ्यांनी सरकारने पोलीस भरती, आरोग्य, नोकर भरती करण्यात यावी, यासाठी घोणबाजी केलीय.
हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे- राज ठाकरे
आज हैदराबाद मुक्ती संग्राम (Marathwada Mukti Sangram Din) दिन आहे. या निमित्तानं मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक निवेदन लिहित हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे, असं आवाहन केलं आहे. राज ठाकरेंनी म्हटलं आहे की, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
